शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औषधांचा रोग

By admin | Updated: April 23, 2016 13:45 IST

‘लोकमत’ने उघडकीला आणलेल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातल्या ‘औषध खरेदी घोटाळ्या’नंतर अधिकारी निलंबीत झाले, चौकश्यांचे सत्र सुरू झाले असले, तरी हा विषय इथे संपत नाही. ..तो इथून सुरू होतो आणि औषध-उपचारांसाठी वणवणत हिंडणोच नशिबी आलेल्या गोरगरीबांच्या दारात पोचतो. राज्यभरात खळबळ उडवून देणा:या या शोधमालिकेच्या निमित्ताने राज्यातल्या आरोग्य सेवेच्या अनारोग्याची चिकित्सा

 सरकारी दवाखान्यांमध्ये अगतिकतेने येणा:या गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणारा

 
- अतुल कुलकर्णी
 
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला. त्यानुसार 11 कोटी लोकसंख्येच्या राज्यात 23.32 टक्के लोक झोपडीत राहणारे आहेत आणि 17.35 टक्के जनता दारिद्रय़रेषेखाली आहे. हेच लोक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यभर पसरलेल्या यंत्रणोतून उपचार घेतात. या विभागाचे खरे लाभार्थी हेच गोरगरीब आहेत, जे कोणाचाही वशिला नसताना किमान उपचार मिळावेत ही अपेक्षा ठेवून राज्यातल्या सरकारी दवाखान्यात जातात. तिथे उपचार मिळाले नाहीत तर ही माणसे वर्तमानपत्रच्या कार्यालयात बातम्या द्यायला जात नाहीत; तिथेच समोर दिसेल त्या डॉक्टरच्या हातापाया पडत उपचार करण्याची अगतिक विनवणी करत राहतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे हे विदारक वास्तव आहे. 
- मात्र मुंबईत बसून आरोग्याचा गाडा हाकणारे अधिकारी या वास्तवापासून कोसो दूर! एकीकडे गावोगावच्या रुग्णांना पाहिजे ती औषधे मिळत नाहीत, कुत्र चावल्याची लस असो की साप चावल्यावर द्यायचे औषध असो; प्रत्येक जिल्ह्यात तुडवडा आहे. दुसरीकडे ज्यांची काहीच गरज नाही अशी करोडो रुपयांची औषधे पडून राहतात, त्यांच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण होतात. 
औषधांची गरज खालून वर्पयत यायला हवी आणि त्यानुसार पुरवठा. मात्र आपल्याकडे गरजही मुंबईतच ठरते, खरेदीही मुंबईत होते आणि खालच्या अधिका:यांना मात्र (अनावश्यक) औषधे आलीच आहेत तर रुग्णांना देण्याशिवाय आणि आवश्यक औषधांवाचून त्यांना दवाखान्याबाहेर पिटाळण्याशिवाय पर्याय उरत नाही.
डॉ. अभय बंग यांनी एक प्राथमिक आरोग्य केंद्र चालवण्यास घेतले होते. त्यांनी न मागता त्यांना तापावरच्या पाच लाख गोळ्या पाठवण्यात आल्या. त्यांनी नकार दिला, तर सांगितले गेले की वरून आल्या आहेत, घ्याव्या लागतील. 
..काही महिन्यांनी त्या गोळ्यांची एक्सपायरी डेट उलटून गेली. डॉ. बंग यांनी गावातच एक खड्डा करून त्या गोळ्या त्यात पुरून नष्ट केल्या आणि नंतर स्वत:हून चालवायला घेतलेले प्राथमिक आरोग्य केंद्रही परत देऊन टाकले. या परिस्थितीत आज काहीही फरक पडलेला नाही. 
सार्वजनिक आरोग्य विभागाची ही हेळसांड मंत्र्यांनीच केलेली नाही, तर सचिव, संचालकांपासून सगळ्यांनीच केली आहे. आपण कसेही वागलो तरी आपणास कोणतीही शिक्षाच होत नाही ही भावना त्यातून बळावली आणि या विभागाला निष्क्रियतेचा, बेपर्वाईचा, अक्ष्यम्य असहिष्णुतेचा आजार कायमचा जडला आहे. ज्यांनी रुग्ण तपासायचे, उपचार करायचे ते खरेदीत मग्न आहेत. ज्यांनी खरेदीवर नियंत्रण ठेवायचे त्यांना या विषयाचा गंध नाही. 
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दवाखान्यासमोर ट्रक उभे आहेत आणि त्यातली औषधे कुणी उतरवून घेत नाही, हा मिळालेला पहिला ‘धागा’. त्या आधाराने खोदकाम केल्यावर गरगरवून टाकणारे तपशील हाती आले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 297 कोटींच्या वारेमाप आणि मनमानी खरेदीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीला आणले. गदारोळ उडाला.  निलंबने झाली. चौकशा लागल्या.
..पण प्रकरण संपले नाही, ते सुरू झाले आहे.