शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मनाशी तुम्ही कधी बोलता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 06:05 IST

सतत काळ्या ढगाच्या छायेत वावरणाऱ्या मनाला आपली इच्छा काय आहे, ते निर्विवादपणे सांगणे हे फार-फार आवश्यक असते.

ठळक मुद्देआपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल काहीतरी अशा इच्छा असतात ज्या प्रत्यक्षात येत नाहीत, येऊ शकत नाहीत. त्या जाणण्याची आत्ता संधी आहे.

- वंदना अत्रेलखनौहून देहराडूनला रेल्वेने निघालेल्या अरुणीमा सिन्हाच्या गळ्यातील साखळी आणि सामानचोरण्याच्या इराद्याने तिघेजण डब्यात शिरले. सावध झालेल्या अरुणीमाने झटकन साखळीखेचली पण पुढे काय घडते आहे ते समजायच्या आत त्या तिघांनी तिला गाडीच्या डब्याबाहेरफेकून दिले होते ! वेगाने धावणारी गाडी रुळावर पडलेल्या अरुणीमाच्या पायावरून गेली आणितिला आपला एक पाय गमवावा लागला.. ! ही घटना घडली १२ एप्रिल २०११ या दिवशी. त्यानंतरदोनच वर्षांनी, २१ मे २०१३ या दिवशी अरुणीमा जगातील सर्वोच्च शिखरावर, एव्हरेस्टवर होती.एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी ती पहिली भारतीय विकलांग महिला ठरली ...!सहजासहजी विश्वास बसू नये अशीच ही कथा. अशक्यवाटणाऱ्या गोष्टी करणारी अशी माणसे फक्त बातम्यांमध्येच नसतात. आपल्या अवतीभोवती सुद्धा कितीतरीदिसतातच की. या माणसांबद्दल आपण ऐकतो, वाचतो तेव्हा आपण काय विचार करतो? अप्राप्यवाटणाऱ्या गोष्टी करून दाखवणाऱ्या या लोकांना देवत्व बहाल करून टाकतो आणि त्यांची पूजाकरायला लागतो. हे फार सोपे असते. पण कधीतरी, काही प्रश्न स्वतःला विचारून बघितले तर?अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करणारी अशी काही वेगळी शक्ती असते का? असेलतर, काही विशेष माणसांनाच ती मिळालेली असते का? कोण करते या माणसांची निवड? आपल्यातही शक्ती आहे याचा शोध त्यांना कसा लागतो? हे प्रश्न आपल्याला अशा एका टप्प्यावर आणतातजिथे, एकच खणखणीत उत्तर आपल्याला मिळते. स्वतःकडेच बोट दाखवणारे. लख्खकन प्रकाशपडावा तसे जाणवते, जी इच्छाशक्ती पुराणातील हनुमानात आणि आजच्या अरुणीमामध्ये आहे,इच्छाशक्तीचा तोच जोमदार प्रवाह आपल्या प्रत्येकात आहे. किंबहुना, या पृथ्वीतलावर राहणाऱ्या आपल्याप्रत्येकाला निसर्गाने इच्छाशक्तीचे एक अद्भुत वरदान दिले आहे. जे-जे असाध्य आणि अशक्य, ते साध्यकरण्यासाठी मदत करणारी शक्ती.. !- फक्त ही शक्ती देणाऱ्या निसर्गाचा चतुरपणा असा की, याइच्छाशक्तीला आपोआप कार्यरत करणारी, जागृत करणारी व्यवस्था मात्र आपल्या शरीरात नाही.. ! समोरअसलेली परिस्थिती बघून जाणीवपूर्वक तिचा वापर करावा लागतो, तिला आवाहन करावे लागते !अगदी सध्या सुरु असलेल्या कोरोनाचेच उदाहरण घेऊन सांगायचे तर काय करू शकतो आपण?आजारापासून दूर, निरोगी राहण्याची आपल्या सर्वांची इच्छा आहे पण मला निरोगी आणि सुदृढ राहायचेआहे या इच्छेचा रोज स्वतःशी उच्चार तरी आपण करतो? दिवसभरात आपल्या मनात भीतीचे, चिंतेचे,स्वतःच्या आरोग्याबद्दल शंका घेणारे असे कित्येक विचार येऊन गेलेले असतात. विशेषतः, अशाआव्हानांच्या काळात तर भय आणि काळजी या विचारांचा एक गडद काळा ढग सतत मनावर रेंगाळतअसतो. आपल्याला अस्वस्थ करीत असतो. सतत या काळ्या ढगाच्या छायेत वावरणाऱ्या मनाला आपलीइच्छा निर्विवादपणे सांगणे हे फार-फार आवश्यक असते. त्यामुळे दिवसातून किमान एकदा का होईना“आज मी निरोगी आणि सुदृढ आहे, आणि तसेच राहू इच्छितो / ते ” हे स्पष्टपणे स्वतःलाच सांगायला हवे..!त्याचा उच्चार करायला हवा.- अर्थात अशी केवळ इच्छा व्यक्त करणे म्हणजे इच्छाशक्ती जागृत करणेनाही. कोणत्याही इच्छेला प्रयत्नांची जोड नसेल तर ती इच्छा म्हणजे स्वप्नाचा बुडबुडा ठरू शकतो ! “ मीलता मंगेशकर इतके उत्तम गाते आहे ” अशी निव्वळ इच्छा करून कसे चालेल? त्यासाठी मला उत्तमाकडेनेणारा रियाझ करायला नको का? त्यामुळे कोणतीही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला विचारांची आणिकृतीची जोड द्यावी लागते. ती कशी देता येईल? ते पुढील लेखात...जाता-जाता रिकामपणातील एक उद्योग-आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल काहीतरीअशा इच्छा असतात ज्या प्रत्यक्षात येत नाहीत, येऊ शकत नाहीत. त्या जाणण्याची आत्ता संधी आहे.कशी? घरात जी कोणी माणसे आहेत त्या प्रत्येकाने स्वतःच्या इच्छांची आधी आपल्यापुरती यादीकरायची. त्यानंतर कुटुंबात जी कोणती सार्वजनिक जागा आहे ( अनेक कुटुंबांमध्ये असणारा व्हाईट बोर्डकिंवा पाटी ) त्यावर प्रत्येकाने आपल्या मनातील आजवर अपूर्ण राहिलेल्या दोन इच्छा लिहायच्या.घरातील सर्वांना त्या वाचता आल्या पाहिजेत. त्याने काय होईल? आपल्याच कुटुंबातील माणसांच्यामनातील, आजवर न कळलेल्या, अपूर्ण इच्छा तर कळतील ! त्यातून खूप काही घडू शकेल. काय?तुम्हीच विचार करा...(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)vratre@gmail.com