शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

दिवाळी-तिमिरातून तेजाकडे

By admin | Updated: November 8, 2015 17:59 IST

प्रकाशाची, उत्साहाची, चैतन्याची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा नुसता सण नाही तर मनातील नकारात्मक वृत्तींना विसरायला लावून जगण्यास प्रोत्साहित करणारा

 - शुभांगी कात्रेला

प्रकाशाची, उत्साहाची, चैतन्याची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी.  दिवाळी हा नुसता सण नाही तर मनातील नकारात्मक वृत्तींना विसरायला लावून जगण्यास प्रोत्साहित करणारा आनंदोत्सवच होय.
पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला त्याच्या श्वासाइतकीच मूलभूत गरज असते ती प्रकाशाची, प्रकाशाच्या धाग्यांशीच त्याचे जीवन बांधलेले असते. माणसाने प्रकाश तर स्वीकारलाच; पण त्याच प्रकाशाला, उत्सवाचे, पूजेचे स्वरूप प्राप्त करून दिले. उजेड आणि अंधार या द्वंद्वामध्ये तो प्रकाशपूजक ठरला. आपल्या जीवनाला व्यापून टाकणा:या उजेडाचे, प्रकाशाचे त्याने स्वागत करून उत्सवाच्या रूपाने दिवाळीसारख्या सणांमध्ये त्याचे रूपांतर केले. 
दिवाळी हा भारतीयांचा सर्वात आवडता व आनंददायी सोहळा. खरं तर दिवाळीने उजेडाला एक महान मंगल असे मूल्य दिले आहे. दिवाळीचा सण कुणी झोपडीच्या अंगणात इवलीशी पणती पेटवून, तर कुणी गर्भश्रीमंत हजार दिव्यांची माळ लावून हा सारा प्रकाश आपल्यात सामावून घेत असतो. कुणी रांगोळीचे हजार ठिपके काढून, तर कुणी आकाशदिवे लावून आपल्यातला उजेडच एका अर्थाने व्यक्त करत असतो. असा हा प्रकाशाचा सण आनंदाचा, अभिमानाचा आणि मनाला टवटवीत पालवी देणारा !
 दीपावलीचा सण आपल्याबरोबर अनेक सणांना घेऊन येतो. त्यात सारे जण आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघतात. आयुष्यातल्या समस्या, दु:ख, काळजी विसरायला लावतात. मनाला सकारात्मक रीतीने आयुष्याकडे पाहण्याची, आयुष्याला आनंदाने सामोरं जाण्याची प्रेरणा मिळते.  दिवाळीत सा:या आसमंतातील अंधकार दूर होतो, तसा आपल्या मनातील अंधकार, निराशा दूर होऊन मनात आनंदाच्या, नवीन विचारांच्या ज्योतील उजळतात. दिवाळी येताना आपल्याबरोबर मानवी संदेशही घेऊन येत असते. फटाक्यांच्या आवाजातही तो प्रत्येकाने  ऐकायला हवा. समाजातील अंध-अपंगांना मदतीच्या हाताचीही गरज आहे. तो हात आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आनंदाचे दीप पेटवताना आपणही संकल्प केला पाहिजे, की निराशा येणा:या मनाला आशेच्या ओलाव्यानं दूर करून नवीन हिरवळ स्वत:त व समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करीन.