शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

मैदानी खेळाची दशा आणि दिशा

By admin | Updated: October 18, 2014 14:28 IST

आशियायी स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, ही अर्थातच अभिमानाची बाब. मिळालेले यश टिकवणे हे मात्र आणखी मोठे आव्हान असते. या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा वेध घेता हे स्थान टिकवून ठेवण्यासाठीच खरा कस लागणार हे उघड आहे.

- विश्‍वास चरणकर

 
गेल्या महिन्यात इंचियोन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे भारतीय कबड्डीच्या इतिहासात आणखी एका सुवर्णक्षणाची नोंद झाली. 
कबड्डी हा भारताच्या मातीतील खेळ आहे. भारताने ही जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे या खेळात आपली ‘मास्टरी’ असणे स्वाभाविक आहे, पण ही मास्टरी आणखी किती दिवस टिकणार? हा प्रश्न या निमित्ताने आला आहे. कारण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुरवातीच्या काही मिनिटात इराणने ज्या पध्दतीने भारताला जेरीस आणले होते, ते पाहता या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात येते. 
हॉकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, तीच आता कबड्डीमध्ये होवू पहात आहे. कबड्डुीची आपण जगाला ओळख करुन दिली. आज आपण नंबर वन आहोत, पण यापुढेही राहू याची काय शाश्‍वती? राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग ३४ वर्षे महाराष्ट्राचा झेंडा फडकत होता. १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने प्रदर्शनिय सामना खेळून जगाला या खेळाची ओळख करुन दिली. मध्यम चणी, लवचिक आणि तितकीच चपळ असणारी महाराष्ट्रीय माणसाची अंगकाठी या खेळासाठी बनली आहे, असे वाटते. ही नैसर्गिक देणगीच महाराष्ट्राला या खेळात अव्वल बनवित होती.
महाराष्ट्रातील गावोगावी, गल्लोगल्ली ही कबड्डीचे संघ निर्माण झाले होते.  पण उत्तर भारतीय खेळाडूंनी या खेळात रस घ्यायला सुरवात केली आणि महाराष्ट्राचे ग्रह बदलले. उत्तर भारतीय गडी हा अंगापिंडाने मजबूत, उंचीला ताडमाड आणि ताकदीला रेड्यासारखा. या खेळाडूंनी कबड्डीचे तंत्र आत्मसात केले आणि लवकरच कबड्डीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. 
महाराष्ट्रीय खेळाडू या खेळाकडे फारच संकुचित वृत्तीने पाहतो. शाळेत असताना बोर्डाच्या परिक्षेत नापास झालो तर २५ गुण मिळावेत म्हणून कबड्डी खेळणारा खेळाडू शाळेबरोबरच कबड्डीही मागे टाकून जातो. त्यातूनही कोणी जर पुढे आलाच तर त्याचे लक्ष्य शिवछत्रपती पुरस्कार मिळविणे इथंपर्यंतच र्मयादित राहतं. या उलट आज उत्तर भारतात विशेषत: हरियानामध्ये वडील मुलग्याला सांगतात, ‘बेटा, तुझे इंडिया के लिए खेलना है, और अर्जुन अँवार्ड लेना है।’ विस्तीर्ण पसरेल्या शेतातील घराजवळ कबड्डीचे मैदान तयार केले जाते. घरातील सर्व मुले येथे कबड्डी खेळताना दिसतील. आज हरीयानात पानिपत, सोनिपत, रोहटक आणि भिवानी अशी चार साईची प्रशिक्षण केंद्रे आहेत. या चारही केंद्रामध्ये मॅट उपलब्ध आहे. तेथे वर्षभर कबड्डीचा सराव केला जातो. आपल्याकडे मात्र फक्त स्पर्धेला मॅट मिळते. वर्षभर मातीत सराव करणारे खेळाडू स्पर्धेत मॅटवर कसे टिकतील? याचा विचार केला जात नाही. 
महाराष्ट्रातील कबड्डील नवचैतन्य आणावयाचे असेल तर गावागावातील मंडळ संस्कृती पुन्हा जिवंत केली पाहिजे. गाव तेथे मंडळ आणि मंडळ तेथे मॅट अशी सोय झाली तर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा झेंडा पुन्हा डौलाने फडकण्यास हरकत नाही. 
आज कोणतीही राष्ट्रीय मोठी स्पर्धा असो तेथे हरियाणाचे निम्मे खेळाडू वेगळय़ा संघातून  खेळत असतात. भारताच्या राष्ट्रीय संघात उत्तर भारतीयांचे प्रमाण जास्त असते. त्यांनी कुस्ती जगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. पण उत्तर भारतीय खेळाडू आणि इराणी खेळाडू यांची शरीरयष्टी एकाच धाटणीची. प्रश्न फक्त होता फक्त कौशल्याचा. ते त्यांना आता चांगले आत्मसात केले आहे. त्यामुळे ते वेगाने प्रगती करीत आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने आत्ताच सतर्क व्हायला हवे. 
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये 
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)