शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

मैदानी खेळाची दशा आणि दिशा

By admin | Updated: October 18, 2014 14:28 IST

आशियायी स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, ही अर्थातच अभिमानाची बाब. मिळालेले यश टिकवणे हे मात्र आणखी मोठे आव्हान असते. या क्षेत्रातील नव्या आव्हानांचा वेध घेता हे स्थान टिकवून ठेवण्यासाठीच खरा कस लागणार हे उघड आहे.

- विश्‍वास चरणकर

 
गेल्या महिन्यात इंचियोन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे भारतीय कबड्डीच्या इतिहासात आणखी एका सुवर्णक्षणाची नोंद झाली. 
कबड्डी हा भारताच्या मातीतील खेळ आहे. भारताने ही जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे या खेळात आपली ‘मास्टरी’ असणे स्वाभाविक आहे, पण ही मास्टरी आणखी किती दिवस टिकणार? हा प्रश्न या निमित्ताने आला आहे. कारण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुरवातीच्या काही मिनिटात इराणने ज्या पध्दतीने भारताला जेरीस आणले होते, ते पाहता या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात येते. 
हॉकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, तीच आता कबड्डीमध्ये होवू पहात आहे. कबड्डुीची आपण जगाला ओळख करुन दिली. आज आपण नंबर वन आहोत, पण यापुढेही राहू याची काय शाश्‍वती? राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग ३४ वर्षे महाराष्ट्राचा झेंडा फडकत होता. १९३६च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने प्रदर्शनिय सामना खेळून जगाला या खेळाची ओळख करुन दिली. मध्यम चणी, लवचिक आणि तितकीच चपळ असणारी महाराष्ट्रीय माणसाची अंगकाठी या खेळासाठी बनली आहे, असे वाटते. ही नैसर्गिक देणगीच महाराष्ट्राला या खेळात अव्वल बनवित होती.
महाराष्ट्रातील गावोगावी, गल्लोगल्ली ही कबड्डीचे संघ निर्माण झाले होते.  पण उत्तर भारतीय खेळाडूंनी या खेळात रस घ्यायला सुरवात केली आणि महाराष्ट्राचे ग्रह बदलले. उत्तर भारतीय गडी हा अंगापिंडाने मजबूत, उंचीला ताडमाड आणि ताकदीला रेड्यासारखा. या खेळाडूंनी कबड्डीचे तंत्र आत्मसात केले आणि लवकरच कबड्डीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. 
महाराष्ट्रीय खेळाडू या खेळाकडे फारच संकुचित वृत्तीने पाहतो. शाळेत असताना बोर्डाच्या परिक्षेत नापास झालो तर २५ गुण मिळावेत म्हणून कबड्डी खेळणारा खेळाडू शाळेबरोबरच कबड्डीही मागे टाकून जातो. त्यातूनही कोणी जर पुढे आलाच तर त्याचे लक्ष्य शिवछत्रपती पुरस्कार मिळविणे इथंपर्यंतच र्मयादित राहतं. या उलट आज उत्तर भारतात विशेषत: हरियानामध्ये वडील मुलग्याला सांगतात, ‘बेटा, तुझे इंडिया के लिए खेलना है, और अर्जुन अँवार्ड लेना है।’ विस्तीर्ण पसरेल्या शेतातील घराजवळ कबड्डीचे मैदान तयार केले जाते. घरातील सर्व मुले येथे कबड्डी खेळताना दिसतील. आज हरीयानात पानिपत, सोनिपत, रोहटक आणि भिवानी अशी चार साईची प्रशिक्षण केंद्रे आहेत. या चारही केंद्रामध्ये मॅट उपलब्ध आहे. तेथे वर्षभर कबड्डीचा सराव केला जातो. आपल्याकडे मात्र फक्त स्पर्धेला मॅट मिळते. वर्षभर मातीत सराव करणारे खेळाडू स्पर्धेत मॅटवर कसे टिकतील? याचा विचार केला जात नाही. 
महाराष्ट्रातील कबड्डील नवचैतन्य आणावयाचे असेल तर गावागावातील मंडळ संस्कृती पुन्हा जिवंत केली पाहिजे. गाव तेथे मंडळ आणि मंडळ तेथे मॅट अशी सोय झाली तर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा झेंडा पुन्हा डौलाने फडकण्यास हरकत नाही. 
आज कोणतीही राष्ट्रीय मोठी स्पर्धा असो तेथे हरियाणाचे निम्मे खेळाडू वेगळय़ा संघातून  खेळत असतात. भारताच्या राष्ट्रीय संघात उत्तर भारतीयांचे प्रमाण जास्त असते. त्यांनी कुस्ती जगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. पण उत्तर भारतीय खेळाडू आणि इराणी खेळाडू यांची शरीरयष्टी एकाच धाटणीची. प्रश्न फक्त होता फक्त कौशल्याचा. ते त्यांना आता चांगले आत्मसात केले आहे. त्यामुळे ते वेगाने प्रगती करीत आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने आत्ताच सतर्क व्हायला हवे. 
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये 
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)