शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

बोलावा विठ्ठल.

By admin | Updated: July 18, 2015 13:47 IST

महाराष्ट्राला जशी लावणी, पोवाडय़ांची परंपरा आहे तशीच अभंगांचीही. हे अभंग सुरांच्या माध्यमातून खुलवण्याच्या अफाट शक्यता भीमसेनजी-किशोरीताई यांच्यासारख्या कलाकारांना जाणवल्या आणि सुरू झाली अभंगवाणीची एक रसाळ परंपरा. आज हीच परंपरा तरूण स्वरांनी बहरली आहे.

वंदना अत्रे
 
सावळ्या विठ्ठलाचे रूप प्रत्येकाच्या मनात असते. आपले-आपले असे खास. विठ्ठल म्हणताच डोळ्यांपुढे लगेच उभे राहणारे, जिवाला लळा लावणारे. कोणाला तो पंढरीच्या वाटेवर असणा:या चिंब निसर्गात दिसतो, तर कोणाला पंढरपूरच्या मंदिराच्या उंच सोनेरी कळसात. कोणाला तो भेटतो गोपीचंदनाच्या गंधात, तुळशीच्या माळात आणि कोणाला त्याची हाक ऐकू येते एखाद्या आर्त अभंगात. जसा ज्याचा ध्यास तसा त्याचा विठ्ठल. आणि म्हणूनच पंढरीच्या वारीसाठी भले दिंडय़ा पताका घेऊन, टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर लाखो वारकरी निघाले तरी त्या पंढरीच्या वाटेवर मात्र जो-तो आपापल्या विठ्ठलासोबत असतो. एकेकटा. आणि गच्च भरलेल्या सभागृहात रंगमंचावर विठ्ठलनामाचा गजर टिपेला पोचला असताना, तिथे धावून येणारा विठ्ठल जेवढा जनात असतो, तेवढाच प्रत्येकाच्या मनातही असतो. गळ्यातून उमटणा:या प्रत्येक स्वराबरोबर त्याचे रूप पालटत असते. दिवसभर अंगावर रिमङिाम बरसत राहणा:या पावसाबरोबर, अनवाणी पावलांचा सारा शीण, सा:या देहभुकांचे भान विसरून पंढरीच्या विठ्ठलाकडे नेणारी वाट तुडवणो ज्या माङयासारख्या दुबळ्या भक्तांना ङोपत नाही त्यांच्यावर या अभंगांनी केवढी कृपा केली आहे. त्या विठ्ठलाची सगळी, अगदी सगळी रूपे त्यात वर्णिली आहेत. आणि ही रूपे जेव्हा संगीताच्या सुरावटीत गुंफून कानावर पडतात तेव्हा मंजि:यांचे पोपटी-जांभळे तुरे असलेल्या तुळशीच्या गच्च हाराचा सुगंध भोवती दरवळू लागतो. रिंगण धरीत, घोडा नाचवीत, मजल दरमजल करीत पंढरीची वारी करण्याची परंपरा जेवढी जुनी तेवढीच अभंगांच्या वाटेने विठ्ठलाचे डोळा भरून दर्शन घेण्याची ही परंपरा जुनी आणि रसाळ. म्हणूनच तर पंडित भीमसेन जोशी किंवा पंडिता किशोरीताई अमोणकर यांच्यासारख्या चोख शास्त्रीय परंपरेतील गायकांनासुद्धा या अभंगांचे बोट धरून या विठ्ठल वाटेवर जावेसे वाटले. त्यामुळे आषाढी म्हटले की आठवते पंढरपूर आणि आठवते अभंगवाणी. काल होऊन गेलेल्या (आणि आजही असलेल्या !) भीमसेनजींची आणि आजच्या राहुल देशपांडेंची, जयतीर्थ मेवुंडीची.. 
महाराष्ट्राला जशी लावणी, पोवाडय़ांची परंपरा आहे तशी अभंगांचीपण एक समृद्ध अशी परंपरा आहे. या अभंगांचे सौंदर्य त्यांच्या शब्दात आहे पण त्या शब्दांनी आपल्या हाताचे बोट पकडले आहे ते कोवळ्या अशा भक्तिभावाचे. हे अभंग सुरांच्या माध्यमातून खुलवण्याच्या अफाट शक्यता जेव्हा भीमसेनजी- किशोरीताई यांच्यासारख्या कलाकारांना जाणवल्या तेव्हा महाराष्ट्रात सुरू झाली अभंगवाणीची एक रसाळ परंपरा. ही परंपरा एखाद्या कलाकाराबरोबर काळाआड जाऊन विस्मृतीत जमा होणार का, अशी भीती महाराष्ट्रातील रसिकांना वाटत असताना एकदम रसिकांसमोर आला तो ‘बोलावा विठ्ठल’सारखा  कार्यक्रम. या कार्यक्रमाने या परंपरेला एक तरु ण ताजा चेहरा दिला. अभंग तेच, त्याला दिलेले सूर तेच आणि त्यामागे असलेला भावही तोच, विठ्ठल भेटीसाठी आतूर असा. पण साद मात्र तरुण मुखातून आलेली! प्रयत्न वेगळे होते आणि त्यात धोकेही नक्की होतेच. भीमसेनजींच्या दमदार घोटीव आवाजाचे गारुड असलेल्या मराठी रसिकांना अभंगवाणी गाणारा हा तरुण स्वर किती भावेल अशी शंका कदाचित हा प्रयोग सुरू करणारे पंचम निषादचे शशीभाई व्यास यांना वाटली असेलही; पण पहिल्याच प्रयत्नावर रसिकांनी पसंतीची मोहर उमटवली आणि ‘बोलावा विठ्ठल’ गावोगावच्या रसिकांना पंढरीची वारी घडवू लागला. बघता बघता या प्रयोगाने दहा वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. 
अभंगवाणीविषयी बोलताना या प्रयोगाची दखल नक्कीच घ्यावी लागते याचे कारण काय? एक तर या स्वरांना एक तरुण तडफदार ऊर्जा मिळाली जी आपल्या वाटेने या अभंगांचा आणि त्यातील भावाचा शोध घेऊ बघते आहे. भौतिक समृद्धी नावाच्या भ्रमाचा फुगा एकीकडे आपले पाय जमिनीवरून उचलत असताना आणि सारे भोवताल धूसर होत असताना या अभंगातील आर्त भाव आणि स्वर आपल्याला पुन्हा या मातीवर आणतात. आणि मातीवर आणणारे ते स्वर आजचे, तरु ण आहेत हे दिसते तेव्हा ही परंपरा पुढे चालू राहण्याचे आश्वासन मिळते. जे अभंग भीमसेनजींच्या स्वरात, अभिषेकीच्या ढंगात ऐकले ते जेव्हा राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, सावनी शेंडे किंवा आनंद भाटे यांच्या तोंडून ऐकताना आपल्या मनात एकीकडे असते ते भीमसेनजी किंवा अभिषेकी यांच्या स्वरांचे स्मरण; पण त्या कलाकृतीतून दिसणा:या स्वरांच्या नव्या आकृती बघताना वाटते, अरे स्वराची ही नवी, वेगळी आकृती पण छान आहे की! ही यापूर्वी कधी बघितली नव्हती.. स्वरांचा हा नवा आविष्कार हे या अभंगवाणीचे सामथ्र्य आहे. मराठी ही रूढार्थाने मातृभाषा नसलेल्या 
रंजनी गायत्री जेव्हा आपल्या दाक्षिण्यात ढंगात ‘बोलावा विठ्ठल’ म्हणतात तेव्हा विठ्ठलाचे एक वेगळे स्वरूप दिसत असते. 
या अभंगवाणीला लाभलेल्या या तरु ण स्वरांनी एक फार महत्त्वाची गोष्ट साधली आहे आणि ती म्हणजे तरु ण श्रोत्यांना या विठ्ठलनामाची ओढ निर्माण करण्याचे ! देवाचे नाव तरुण पिढीने घेणो जणू निषिद्ध आहे अशा समजुतीत (की भ्रमात?) बहुसंख्य तरुण जगत असताना ते अभंगवाणीकडे वळले ते त्यात सहभागी होत असलेल्या तरुण दमाच्या कलाकारांमुळे. या कलाकारांची नव्या दमाची गायकी भले या तरुण श्रोत्यांना या मंचापर्यंत आणत असेल; पण हा श्रोता तिथे रमतो तो मात्र त्या अभंगातील भावामुळे. गोडव्यामुळे. आणि हा गोडवा फक्त त्या शब्दातून व्यक्त नसावा, त्या पलीकडे त्या रचनांमध्ये काहीतरी अशी जादू आहे ज्यामुळे हा ‘विठ्ठल’ आता मराठी मातीच्या सीमा ओलांडून देशभरात गेला आहे. कानडा विठ्ठलु पंजाबी, तामिळी. गुजराती अशा कितीतरी भाषेतील रसिकांपर्यंत आज तो निव्वळ पोचला नाही तर त्याने ‘वेड मज लावियले’ अशी या रसिकांची अवस्था केली आहे.  स्वरांना कुठे त्यांची भाषा असते आणि भक्तीला? भाषा आणि जात, वर्ण आणि देश हे सगळे सोडून ते स्वर आणि तो भक्तिभाव फक्त तुमच्या थेट हृदयापर्यंत जात असतो. 
पावसाची झड आता कधीही सुरू होईल. त्यात भिजत वारकरी कधीच चंद्रभागेच्या वाळवंटी निघाले आहेत. आणि स्वरांची दिंडीही वाजत गाजत चहू दिशांनी विठ्ठलाला कवेत घेण्यासाठी निघाली आहे..
           
 
 
(लेखिका शास्त्रीय संगिताच्या आस्वादक 
व ज्येष्ठ पत्रकार आहेत.)