शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भाजपला पराभूत करता येत नाही, हा निव्वळ गैरसमज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 06:05 IST

भाजप पराभूत होत नाही असे मुळीच नाही; विरोधक त्यांचा पराभव करण्यात कमी पडतात ! तृणमूल काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही गोव्यामध्ये हे चित्र बदलून दाखवणार आहोत !

ठळक मुद्देसर्व हिंदू भाजपला मते देत नाहीत. भाजप पराभूत होत नाही असे मुळीच नाही; विरोधक त्यांचा पराभव करण्यात कमी पडतात !

राजकीय रणनीतीकार 

प्रशांत किशोर यांची मुलाखत

गोव्यासारख्या छोट्या राज्याच्या विधानसभेत तृणमूल काँग्रेस पक्षाने प्रवेश केला आहे. पक्षाची इतकी शक्ती गोव्यासारख्या राज्यात का खर्च केली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करता येते हे ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये दाखवून दिले. भाजपला नमवता येतच नाही हा काहीजणांचा समज त्यांनी खोटा ठरवला आहे. गोव्यातही तृणमूलच्या या क्षमतेवर पक्षाला शिक्कामोर्तब करायचे आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला यशस्वीपणे टक्कर देतो, त्या मणिपुर, उत्तराखंड वगैरे राज्यांमध्ये आम्ही गेलेलो नाही. गोव्यात विरोधी पक्ष अस्तित्वहीन आहे, म्हणून तृणमूलला यावे लागले.

गोव्याविषयी तुमचा अभ्यास, अंदाज काय आहे?

आम्ही गोव्यात व्यापक सर्वेशन करत आहोत. पश्चिम बंगालमध्येदेखील हीच प्रक्रिया होती.. लोकांचे खरे प्रश्न समजून घेऊन त्या आधारे प्राधान्यक्रम ठरवणे. आम्ही येत्या डिसेंबरमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी तृणमूलचा चेहरा जाहीर करू. मतदारांना नेतृत्वाविषयी स्पष्टता हवी असते. आम्ही मतदारांना संभ्रमात ठेवणार नाही. आमचे संघटनात्मक कामही निवडणुकीपूर्वी उभे राहील.

साधारणत: १२० दिवसांत तृणमूलला गोव्यात सत्तेपर्यंत पोहचता येईल का?

मी यापूर्वी देशातील बड्या नेत्यांसाठी, मुख्यमंत्र्यांसाठी काम केले आहे. नरेंद्र मोदी यांना २०१४ साली भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून जाहीर केले गेले व मग पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ! त्यावेळीही अवघ्या शंभर दिवसांत भारतातील शंभर कोटींहून अधिक लोकांच्या तोंडातून मोदी, मोदी असा नारा गाजू लागला. गोवा तर एकदम छोटे राज्य आहे. आम्हाला १००-१२० दिवस पुरेसे आहेत.

तुमच्या कामाची पद्धत कशी असते?

आमची कामाची पद्धत लष्करासारखी असते. शेकडो माणसे फिल्डवर असतात. आम्ही लष्कराप्रमाणे वर्षाचे साडेतीनशे दिवस युद्धाची पूर्वतयारी करतो व फक्त दहा दिवसच युद्ध करतो. दहा दिवसांत आम्ही सोक्षमोक्ष लावतो. मात्र त्या दहा दिवसांसाठी वर्षभर अत्यंत कठोर परिश्रम घेत पूर्वतयारी केलेली असते. राजकारण हे आता अर्धवेळ करायचे काम राहिलेले नाही. आम्हाला गोव्यात येऊन अवघे काही दिवस झाले, पण गोमंतकियांच्यामध्ये सध्या तृणमूलचीच चर्चा तरी आहे. गोव्यात ५० टक्के नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाईल. ज्यांनी आयुष्यात कधीच निवडणूक लढवली नाही, अशा व्यक्ती तुम्हाला तृणमूलच्या चिन्हावर यावेळी गोव्यात रिंगणात उतरलेल्या दिसतील.

भाजपला पराभूत करता येते हाच संदेश तुम्ही देशभरात देऊ पाहता, पण तुम्ही काँग्रेसची हानी करत आहात; असे वाटत नाही का?

ही काँग्रेसची हानी कशी? जिथे काँग्रेस पक्षाचे काम कमी पडते तिथे आम्ही काम करतो, पण आम्ही भाजपचे मतदार आहेत त्यांनाही लक्ष्य करतो. गोव्यातील तृणमूलमध्ये अनेक हिंदू नेते असतील. अनेक हिंदू पाठीराखे असतील. सर्व जाती-धर्मांचे लोक असतील. गोव्यात ६५ टक्के हिंदू मतदार असले तरी, भाजपला कधीच ३५ टक्क्यांहून अधिक मते मिळत नाहीत. २०१२ साली एकदाच भाजपला ३५ टक्के मते मिळाली होती. एरव्ही त्यांना त्याहून कमी मते मिळतात. याचाच अर्थ असा की, सर्व हिंदू भाजपला मते देत नाहीत. भाजप पराभूत होत नाही असे मुळीच नाही; विरोधक त्यांचा पराभव करण्यात कमी पडतात !

आम्ही गोव्यात कुणाशी युती करणार नाही. स्वबळावर लढणार आहोत. गोव्यातील एक-दोन प्रादेशिक पक्ष जे कधी काँग्रेस किंवा भाजपच्या गोटात गेले नाहीत ते तृणमूलमध्ये विलीन होऊ शकतात. आम्ही गोवा विधानसभेच्या एकूण चाळीसपैकी पस्तीस जागा लढवू. आम्हाला बहुतेक जागा जिंकायच्या आहेत, जेणेकरून आम्ही हे सगळे आमदार एकत्र ठेवू शकू. गोव्यातील राजकीय अस्थिरता आम्हाला संपवायची आहे.

मुलाखत : सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा