शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या, करू नका!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 06:05 IST

कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नाहीत, याची योग्य जाणीव असणं हेच आजच्या काळातलं खरं शस्त्र!!

ठळक मुद्देलसीकरणामुळे लढाई अंतिम टप्यात आली असताना धीर सोडून मुळीच चालणार नाही. अजून थोडी वाट बघणं हेच आपल्या हातात आहे.

- डॉ.  नीलेश मोहिते

1) योग्य माहिती आणि तिचे योग्य विश्लेषण-

कोरोना जसजसा पसरू लागला, तसा तो आपल्याबरोबर विविध अफवाही पसरवू लागला. चुकीच्या, अपुऱ्या आणि अतिरंजक माहितीच्या माऱ्यामुळे खूप मानसिक समस्या निर्माण झाल्या. कोरोना झाला म्हणजे आता आपण मरणारच, या भीतीमुळे काही लोकांनी आत्महत्या केल्या किंवा काही लोकांना हार्टअटॅक सुद्धा आले. हे सगळं टाळण्यासाठी आपण योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. योग्य माहितीबरोबरच मिळालेल्या माहितीचं योग्य विश्लेषण सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याचवेळा भीतीचं मूळ कारण हे अपुरी आणि चुकीची माहिती हेच असतं.

2) काळजी सोडा

मला किंवा घरच्यांना कोरोना झाला तर काय होईल, याची अति जास्त काळजी करण्याच्या नादात आपण कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, हेच आपण विसरतो. जास्त चिंतेचा आपल्या शरीरावर परिणाम होऊन प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना होण्याचा धोका बळावतो. म्हणून काळजी घ्या, करू नका.

नियंत्रण

3) अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे बऱ्याच लोकांना आवश्यक औषधोपचार मिळाले नाहीत, त्यातले अनेक दगावले. त्यानंतर आपण आपल्या नातेवाईकांना वाचवू शकलो नाही, अशी अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, याची योग्य जाणीव नसणं.

4) धीर धरणं

गेल्या दीड वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांचे हाल झाले. आता सगळ्यांचा धीर सुटत चाललाय. आपण कधी यातून बाहेर येऊ असं झालंय. लसीकरणामुळे लढाई अंतिम टप्यात आली असताना धीर सोडून मुळीच चालणार नाही. अजून थोडी वाट बघणं हेच आपल्या हातात आहे.

5) तुलना करणं

तुलना करायचीच असेल, तर जे लोक आपल्यापेक्षा जास्त वाईट परिस्थितीतून जात आहेत, त्यांच्याबरोबर करा! माझ्या एका मित्राची आई कोरोनामुळे हे जग सोडून गेली. आमच्या अपेक्षेपेक्षा तो लवकर सावरला. कारण विचारलं, तेव्हा तो म्हणाला, त्याच्या शेजारी एका पाच वर्षाच्या मुलाचे आई, वडील दोन्ही गेले. तेव्हापासून त्याला जाणवायला लागलं, त्याच्यावरती झालेला मानसिक आघात हा त्या लहान मुलापेक्षा कित्येक पटीने कमी आहे.

6) नवीन जगाशी जुळवून घेणे

आपण रोज कोरोनाच्या नवीन नवीन प्रजातींबद्दल ऐकतो. आपला प्रभाव टिकून राहण्यासाठी बदलत्या परिस्थितीनुसार हा विषाणू स्वतःला बदलतो आणि नवीन नवीन रूपात आपल्यासमोर येतो. कारण या हुशार विषाणूला हे फक्त माहितेय की, ‘थांबला तो संपला’. मागच्या एका वर्षात आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी झटकन बदलल्या आणि हा बदल पचवणं बऱ्याच लोकांना कठीण जातंय. जुन्या गोष्टी कुरवाळत बसताना नवीन जगातल्या चांगल्या गोष्टींचा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोग करून घेणं कधीही चांगलं.

डोळ्यांना न दिसणारा हा हुशार विषाणू आपल्याला आयुष्यातला सर्वात मोठा धडा देतोय... थांबला तो संपला!

(लेखक कम्युनिटी सायकियाट्रीस्ट असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशाात 

मानसिक आरोग्य जनजागृती या विषयात कार्यरत आहेत)