शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थ मुक्ती

By admin | Updated: July 9, 2016 17:22 IST

अधल्या-मधल्यांच्या जोखडातून मान काढून घेत आपल्या शेतमालाचा भाव खणखणीत वाजवून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कहाण्या..

अधल्या-मधल्यांच्या जोखडातून 
मान काढून घेत आपल्या शेतमालाचा 
भाव खणखणीत वाजवून घेणाऱ्या 
शेतकऱ्यांच्या कहाण्या..
 
शेतकऱ्याने शेतात घाम गाळावा, असेल ती पुंजी ओतावी, नसेल तर कर्जाचा भार डोक्यावर घ्यावा, पाऊस-पाण्याची तगमग सोसावी आणि एवढे करून हाती येईल ते पीक मुकाट बाजार समित्यांच्या दारी घेऊन जावे. रुमाल टाकून होणारे ‘भाव’ हतबलतेने पाहावे, पावलोपावली तोलाई/हमाली/अडतीच्या पावत्या फाडत जाव्या, उरेल ते ‘मोल’ मुकाट्याने गाठी बांधावे आणि गावचा रस्ता धरावा. कधी विक्रीचा खर्चच उत्पन्नापेक्षा डोक्यावर चढण्याची नामुष्की आली, तर टमाट्याच्या गाड्या, भाजीची पोती रस्त्यावरच ओतून देऊन रिकाम्या हातानेच परतावे!
- एकीकडे शेतकऱ्याची ही अवस्था,
आणि हे अन्नधान्य / भाजीपाला ज्याच्या घरी जाणार, तो शेवटचा ग्राहकही महागाईने जेरीला आलेला. त्याच्या मुलाबाळांच्या तोंडी ताज्या भाजी-फळांचे घास लागणे भलते महाग! ना पिकवणाऱ्याच्या गाठी पैसा, ना ग्राहकाला दिलासा अशी तिकडम!
- शेतकरी आणि उपभोक्ता ग्राहक या दोघांसाठीही कायम तोट्याच्या ठरत आलेल्या या व्यवहाराची पुनर्रचना करणारा निर्णय महाराष्ट्रात नुक्ताच झाला. बाजार समित्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांची सुटका करणाऱ्या या निर्णयाचे वेगवेगळे पैलू आणि त्यातली गुंतागुंत समोर येऊ लागताच त्यावरून विविध वादविवादांचे मोहोळही उठले आहे. बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात, व्यापारी नाराज, रोजगारावर गदा आल्याने हमाल संतापलेले आणि ‘नकोशा’ झालेल्या बाजार समित्यांचा जाच सुटला, तरी ‘पर्याय’ काय, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी भांबावलेले, असे सारे गोंधळाचे चित्र आहे.
बाजार समितीत न नेता शेतमाल देशभरात कुठेही विकण्याचा खुलेपणा अचानकच अंगावर आल्याने शेतकऱ्यांचे बावचळलेपण ‘यापेक्षा होते तेच बरे’ असे म्हणण्याच्या हतबलतेपर्यंत पोचलेले दिसते. खुल्या बाजारपेठेला तोंड देण्याचे मार्ग शोधणे आणि आपल्या शेतमालासाठी विक्रीच्या पर्यायी यंत्रणा / साखळ्या उभ्या करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नव्हे, हे तर खरेच!
- पण महाराष्ट्रातल्याच काही हिकमती शेतकऱ्यांनी हे आव्हान कितीतरी आधीच पेलून दाखवलेले आहे.