शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मध्यस्थ मुक्ती

By admin | Updated: July 10, 2016 10:12 IST

अधल्या-मधल्यांच्या जोखडातून मान काढून घेत आपल्या शेतमालाचा भाव खणखणीत वाजवून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कहाण्या..

अधल्या-मधल्यांच्या जोखडातून 
मान काढून घेत आपल्या शेतमालाचा 
भाव खणखणीत वाजवून घेणाऱ्या 
शेतकऱ्यांच्या कहाण्या..
 
शेतकऱ्याने शेतात घाम गाळावा, असेल ती पुंजी ओतावी, नसेल तर कर्जाचा भार डोक्यावर घ्यावा, पाऊस-पाण्याची तगमग सोसावी आणि एवढे करून हाती येईल ते पीक मुकाट बाजार समित्यांच्या दारी घेऊन जावे. रुमाल टाकून होणारे ‘भाव’ हतबलतेने पाहावे, पावलोपावली तोलाई/हमाली/अडतीच्या पावत्या फाडत जाव्या, उरेल ते ‘मोल’ मुकाट्याने गाठी बांधावे आणि गावचा रस्ता धरावा. कधी विक्रीचा खर्चच उत्पन्नापेक्षा डोक्यावर चढण्याची नामुष्की आली, तर टमाट्याच्या गाड्या, भाजीची पोती रस्त्यावरच ओतून देऊन रिकाम्या हातानेच परतावे!
- एकीकडे शेतकऱ्याची ही अवस्था,
आणि हे अन्नधान्य / भाजीपाला ज्याच्या घरी जाणार, तो शेवटचा ग्राहकही महागाईने जेरीला आलेला. त्याच्या मुलाबाळांच्या तोंडी ताज्या भाजी-फळांचे घास लागणे भलते महाग! ना पिकवणाऱ्याच्या गाठी पैसा, ना ग्राहकाला दिलासा अशी तिकडम!
- शेतकरी आणि उपभोक्ता ग्राहक या दोघांसाठीही कायम तोट्याच्या ठरत आलेल्या या व्यवहाराची पुनर्रचना करणारा निर्णय महाराष्ट्रात नुक्ताच झाला. बाजार समित्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांची सुटका करणाऱ्या या निर्णयाचे वेगवेगळे पैलू आणि त्यातली गुंतागुंत समोर येऊ लागताच त्यावरून विविध वादविवादांचे मोहोळही उठले आहे. बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात, व्यापारी नाराज, रोजगारावर गदा आल्याने हमाल संतापलेले आणि ‘नकोशा’ झालेल्या बाजार समित्यांचा जाच सुटला, तरी ‘पर्याय’ काय, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी भांबावलेले, असे सारे गोंधळाचे चित्र आहे.
बाजार समितीत न नेता शेतमाल देशभरात कुठेही विकण्याचा खुलेपणा अचानकच अंगावर आल्याने शेतकऱ्यांचे बावचळलेपण ‘यापेक्षा होते तेच बरे’ असे म्हणण्याच्या हतबलतेपर्यंत पोचलेले दिसते. खुल्या बाजारपेठेला तोंड देण्याचे मार्ग शोधणे आणि आपल्या शेतमालासाठी विक्रीच्या पर्यायी यंत्रणा / साखळ्या उभ्या करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नव्हे, हे तर खरेच!
- पण महाराष्ट्रातल्याच काही हिकमती शेतकऱ्यांनी हे आव्हान कितीतरी आधीच पेलून दाखवलेले आहे.