शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

अल-कायदाचे भूत

By admin | Updated: September 13, 2014 14:55 IST

भारतीय उपखंडात दहशतवादी कारवाया वाढवणार असल्याचा अल कायदा संघटनेचा इशारा आताच समोर यावा, हा ठरवून केलेला प्रकार आहे. एका संघटनेला संपवण्यासाठी दुसरी संघटना उभी करण्याचा हा बड्या देशांचा जुनाच प्रकार असावा किंवा अंतर्गत अशांततेतून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केलेली ही पाकिस्तान सरकारचीच खेळी असू शकते.

 दत्तात्रय शेकटकर

 
दहशतवाद भारताचा पिच्छा सोडायला तयार नाही. तसा तो सोडणारही नाही. दहशतवाद्यांच्या रडारवर भारत यापुढील काळातही राहणार आहेच. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा एक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये त्यांनी येणार्‍या काळात भारतीय उपखंडांमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यावर जोर देणार असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहताच भारतीय गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणा सजग आणि सतर्क झाल्या आहेत; परंतु हा व्हिडीओ नेमका आत्ता अचानक प्रसारित करण्यामागे काय कारणे असू शकतात, यांचा शोध घ्यायला हवा.  
हा व्हिडीओ आत्ताच समोर आला, त्याची निश्‍चितपणे काही कारणे आहेत. सर्वांत पहिले कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून अल कायदाचा जोर कमी होत चाललेला आहे. त्याच वेळी इसीस या दहशतवादी संघटनेचा प्रभाव विविध देशांमध्ये चांगलाच वाढतो आहे; किंबहुना ही संघटना आता अमेरिकेसाठी डोकेदुखी बनलेली आहे. इराक, सीरिया या देशांमध्ये त्यांचा प्रभाव वाढतो आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वी तालिबानला फुगवले आणि नंतर तेच त्यांच्यावर उलटले. आता तीच परिस्थिती या दहशतवादी संघटनेच्या बाबतीत दिसून येत आहे. सीरियाविरुद्ध कारवाया करण्यासाठी अमेरिकेने तेथील दहशतवादाला प्रोत्साहन दिले; परंतु आता तेच त्यांच्यावर उलटले आहे. आता ते इतके मोठे झाले, की त्यांनी अमेरिकेपुढेच एक आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांसह सौदी अरेबिया, बहारीन, कतार या कट्टर सुन्नी देशांना त्यांचा धोका मोठा आहे. त्यामुळे या नव्या दहशतवादी संघटनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता पाकिस्तानसह अन्य देशांनी पुन्हा एकदा अल कायदाचे नवे भूत उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी अरब व आफ्रिकन देशांमध्ये अल कायदाचे असलेले महत्त्व कमी झाले आहे. हा व्हिडीओ अचानक येण्यामागील जी पूर्वपीठिका आहे, त्यातील हे एक प्रमुख कारण आहे. 
आणखी एक कारण म्हणजे पाकिस्तान हा देश स्वत: एका विचित्र कोंडीमध्ये सापडला आहे. त्यांची अंतर्गत स्थिती फारच वाईट आहे. तेथील लष्कर आणि नवाझ शरीफ यांच्यामध्ये सातत्याने तणाव निर्माण होत आहे. अशातच पाकिस्तानने खैबर पख्तुनख्वा या प्रदेशामध्ये लष्करी कारवाई करून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतही त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे लोकांचे लक्ष या सद्य परिस्थितीतून विचलीत करण्यासाठी हा व्हिडीओ प्रसारित केलेला असू शकतो; कारण भारत हा शत्रू आहे, या एकाच मुद्दय़ावर पाकिस्तानसारखे राष्ट्र त्यांचे जनमत वळवू शकते, याची तेथील शासकांना नेमकी कल्पना आहे.
हा व्हिडीओ पाकिस्तान सीमेवरील कुठल्या तरी भागात यापूर्वीच काढला गेलेला असावा. आत्ताची वेळ साधून प्रदर्शित केला असावा, अशी शंका येण्यास पुरेपूर वाव आहे. ओसामा बिन लादेनविषयी माहिती नाही, असे सांगत असताना तो पाकिस्तानमध्येच सापडला. तसेच आत्ताही होण्याची दाट शक्यता आहे. काश्मीर प्रश्नाचेही एक कारण त्यामागे असू शकते. यापुढे काश्मीर प्रश्नाची केवळ काश्मिरी लोकांशीच चर्चा केली जाईल, असे भारताने जाहीर केले आहे. पाकिस्तानच्या केंद्रस्थानी काश्मीर असल्याने भारताला वचक बसावा, या हेतूनेही दहशतवादी संघटनांनी हा व्हिडीओ आत्ताच जाणीवपूर्वक प्रदर्शित केलेला असावा. 
त्या व्हिडीओमध्ये इंडियन सब कॉन्टीनेन्टल असा उल्लेख आहे. भारतामध्ये दहशतवादी कारवायांसाठी लक्ष केंद्रित करणार, असे त्यांनी म्हटले असले, तरी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की दहशतवादी संघटनांनी भारतात यापूर्वीपासूनच काम सुरू केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रसारित करण्यामागील कारण सर्वांचेच लक्ष विचलित करणे, हे असू शकते. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारतात काश्मीरमध्ये अल कायदाचे नेटवर्क पूर्वीपासून आहेच. सिमी, इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी कारवाया सुरूच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये नवीन असे काहीही नाही. या व्हिडीओचा एक अर्थ असा असू शकतो, की ज्या संघटना पूर्वीपासून कार्यरत आहेत, त्या संघटना यापुढील काळात अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत जोर कमी झालेल्या अल कायदाला नवसंजीवनी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले असू शकतात. 
बांगलादेशातून आपल्याकडे विविध कुरापती सुरू आहेतच. ब्रह्मदेशामध्ये रोहंगिया मुस्लिम हा नवा मुस्लिम गट तयार होत आहे. ब्रह्मदेशाच्या सीमा मलेशिया, इंडोनेशियाला लागून आहेत. त्यामुळे या सार्‍या भागांतील दहशतवादी संघटना एकत्र आल्या, तर मात्र भारतासह अनेक देशांसाठी तो निश्‍चितपणे धोका असणार आहे. असे झाले, तर ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत अशा सर्वच देशांमध्ये दहशतवादी कारवाया वाढून इंडोनेशिया ते इस्राईल यामध्ये दहशतवाद सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. अल कायदाचे प्रमुख शत्रू अमेरिका, भारत आणि इस्राईल हेच असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळेच भारताला कायम सतर्क व सजग राहावे लागणार आहे. 
जुलै २0१३मध्ये असाच एक दहशतवादी व्हिडीओ प्रसारित झाला होता व त्याद्वारे भारतीय तरुणांनी ग्लोबल जिहादमध्ये यावे, असे आवाहन केले होते. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ठाणे, हैदराबाद, केरळ, तमिळनाडू या भागांतील तरुणांना जिहादच्या नावाखाली दहशतवादासाठी बळी पाडले जात असल्याचे दिसून येत आहे. हा फार मोठा धोका आहे; कारण दहशतवादी संघटना आहेतच. पण, त्यांना मदत करणार्‍या यंत्रणा आहेत तरी कुठल्या?, या भारतीय तरुणांना व्हीसा देतो तरी कोण?, त्यांना इराकमध्ये न्यायला कोण गेले होते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत. याचाच अर्थ दहशतवादी कारवायांचे काम अतिशय गुप्तपणे सुरू आहे व ते आपल्या जवळ येऊन ठेपले आहे. या गेलेल्या तरुणांमधील २ टक्के तरुण जरी दहशतवादी बनले, तरी तो देशासाठी फार मोठा धोका ठरेल. यासाठीच भारताने तरुण पिढीकडे फार बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. दहशतवादी संघटनांना कधीही कमी लेखण्याची चूक करू नये. या संघटना वा त्यातील दहशतवादी संपले म्हणून दहशतवाद संपत नसतो. दहशतवादी मानसिकतेवर प्रहार गरजेचा असतो. तो आपण करायला हवा. धर्म, जात हे दहशतवादाला जोडणे चूक आहे. त्यातून एक चुकीचा संदेश समाजात जातो. दहशतवादाकडे वळलेल्या तरुणाचे सरासरी वय ७ वर्षांचे असते. तेव्हा या मार्गाकडे वळणार्‍या तरुणांचे प्रबोधन गरजेचे आहे. जिहाद नक्की कुणाविरुद्ध हेदेखील एकदा तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. दहशतवादाचा सामना करत असताना अनावश्यक पावले मात्र उचलू नयेत. प्रत्यक्ष युद्ध हा दहशतवाद संपवण्याचा मार्ग नाही. काउंटर टेरेरिझमनेच दहशतवादाचा सामना करता येईल; परंतु त्यासाठी लढाई हवी, ती दहशतवादी मानसिकतेशी; कारण सार्‍याचे मूळ आहे ते तिथे. 
भारतावर दहशतवादी हल्ला झाला नाही, याचा अर्थ असा नाही, की दहशतवाद संपला. आपण यापुढील काळात कायमच सतर्क व सजग राहणे गरजेचे आहे. समाजात एकी असेल, तर अल कायदासारख्या कितीही दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या, तरी काहीही वाईट करू शकत नाहीत; पण अल कायदाचे हे भूत उतरवायचे असेल, तर डोळे उघडून सगळीकडे सजगतेने पाहायला हवे आणि समाज म्हणून एकसंध व्हायला हवे. 
(लेखक नवृत्त लेफ्टनंट कर्नल असून, दहशतवाद व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे 
अभ्यासक आहेत.)