शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. नोकर भरतीवर ‘संभ्रम’

By admin | Updated: November 29, 2014 00:14 IST

मराठा आरक्षण स्थगिती : परिचर, ग्रामसेवक भरती प्रक्रियेला ब्रेक

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर --मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणाच्या प्रवेशात दिलेल्या आरक्षणाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने येथील जिल्हा परिषद नोकरभरती प्रक्रियेसंबंधी प्रशासन संभ्रमावस्थेत सापडले आहे. नियमानुसार परिचर, ग्रामसेवक या दोन संवर्गांमध्ये १६ टक्के मराठा आरक्षणाप्रमाणे प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्थगितीमुळे या दोन्ही संवर्गांच्या पुढील भरती प्रक्रियेला सध्या ‘ब्रेक’ लागला आहे. पुढील कार्यवाही कशी करावी, यासंबंधी मार्गदर्शन व्हावे, अशी विनंती सामान्य प्रशासनाने शासनाकडे केली आहे. लेखी विनंती करूनही पाच-सहा दिवस झाले तरी अजून मार्गदर्शन सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे भरतीसंबंधी काय निर्णय घ्यावे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. पर्यायाने न्यायालयाच्या कचाट्यात आरक्षण सापडल्याचा पहिला फटका जिल्हा परिषद नोकर भरतीला बसला आहे. गेल्या आघाडी सरकारने मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणाच्या प्रवेशात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार अंमलबजावणी सुरू झाली. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेने रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, आरोग्यसेवक यासह विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो भरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणामध्ये एकापेक्षा अधिक जागा असलेल्यांमध्ये ग्रामसेवक आणि परिचर संवर्गांचा समावेश होतो. त्यामुळे जिल्हा परिषद या दोन संवर्गांसाठीच १६ टक्केप्रमाणे आरक्षणानुसार प्रक्रिया राबवत आहे. या दोन्ही संवर्गांच्या परीक्षा होऊन एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. दरम्यान, ग्रामसेवक संवर्गाचा निकाल लागला असून, परिचरचा निकाल लागलेला नाही. मेरीटनुसार निवड झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्याच्या टप्प्यात ग्रामसेवकची, तर निकालाच्या टप्प्यात परिचरची प्रक्रिया आहे. या दरम्यान १५ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणालाच अंतरिम स्थगिती दिल्यामुळे भरती प्रक्रिया ज्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे, तेथेच थांबवण्यात आली आहे. या दोन संवर्गांच्या भरतीसंबंधी प्रशासनामध्येही गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळेच शासनाकडून मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ झाले आहे. अंतरिम आदेशाच्या विरोधातील दाव्याबाबत सुनावणी होऊन न्यायालयाने नव्याने निर्णय दिल्यानंतर शासनालाही भरती प्रक्रियेसंबंधी आदेश द्यावे लागणार आहेत. त्यामुळे न्यायालय आणि शासन या दोन स्तरावर कार्यवाही होणार असल्यामुळे त्वरित भरतीसंबंधीत पुढील आदेश मिळण्याची शक्यता कमी आहे. अनेक उमेदवारजिल्हा परिषदेत येऊन, तसेच फोनवरून संपर्क साधून पुढील कार्यवाही कधी? अशी विचारणा करीत आहेत. परंतु, शासनाकडून पुढील आदेश आल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल, असे उत्तर प्रशासन देत आहे. यामुळे उमेदवार मराठा आरक्षणाच्या स्थगितीसंबंधी पुढील काय निर्णय होणार? त्यानंतर शासनाकडून काय सूचना मिळणार? याची प्रतीक्षा करीत आहेत.न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे ग्रामसेवक आणि परिचर संवर्गाची प्र्रक्रिया आता ज्या टप्प्यात आहे, त्या टप्प्यात थांबविण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी शासनाकडून पुढील मार्गदर्शन मागितले आहे. सूचना आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.- सी. एन. वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन).