शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
4
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
5
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
6
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
7
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
8
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
9
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
10
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
11
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
12
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
13
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
14
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
15
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
16
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
17
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
18
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
19
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
20
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...

जिल्हा परिषदा भाजपामुक्त?

By admin | Updated: March 9, 2017 04:43 IST

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने

- यदु जोशी, मुंबई

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने शिवसेनेला बरोबर घ्यायचे आणि काँग्रेसने बाहेरून वा तटस्थ राहून पाठिंबा द्यायचा, असे नवीन समीकरण आता समोर आले आहे. ‘आम्ही दोघे एकत्र येऊन सत्ता स्थापन होतेय अशा ठिकाणी अन्य कुणाची मदत घेण्याचा प्रश्न नाही. अशा जिल्ह्यांबाबत उस्मानाबाद व आणखी एखादी जिल्हा परिषद सोडून आमची आघाडी जवळपास नक्की झाली आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. आम्ही एकत्र येऊनही सत्ता मिळत नाही अशा ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे आणि काँग्रेसने मतदानात भाग न घेता अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यावा, असा विचार सुरू झाला असल्याचे तो म्हणाला.असे झाल्यास बीड, जालना, हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, कोल्हापूर व सांगलीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली. ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. अन्य आठ महापालिकांमध्ये सत्ता भाजपाकडे असेल हेही निश्चित आहे. (विशेष प्रतिनिधी) शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपा आशावादीजिल्हा परिषदांत शिवसेना व भाजपा एकत्र येतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला.आता ते जिल्हा परिषदांत आम्हाला तसाच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत त्यांनी दिले.- तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेत ‘कर्जमाफी नाही तर कामकाज नाही’, असे बजावत जोरदार घोषणाबाजी केली. - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली.तर भाजपाकडे तीनच जि.प.आता जिल्हा परिषदेबाबत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल. भाजपा-शिवसेना एकत्र आले तर २५ पैकी १४ जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता राहील. मात्र, भाजपाला बाजूला ठेवण्याचे अन्य या तिघांनी ठरविल्यास भाजपाची केवळ लातूर, वर्धा, चंद्रपूर या तीनच जिल्ह्यात सत्ता येईल. शिवसेनेच्या भूमिकेला त्यामुळेच महत्त्व आले आहे. गेल्यावेळी विदर्भातील चार जिल्हा परिषदांमध्ये भाजपा - राष्ट्रवादीची आघाडी होती. यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार असतील तर आम्ही अप्रत्यक्ष पाठिंब्याचा विचार करू शकतो, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.