शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जिल्हा परिषदा भाजपामुक्त?

By admin | Updated: March 9, 2017 04:43 IST

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने

- यदु जोशी, मुंबई

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने शिवसेनेला बरोबर घ्यायचे आणि काँग्रेसने बाहेरून वा तटस्थ राहून पाठिंबा द्यायचा, असे नवीन समीकरण आता समोर आले आहे. ‘आम्ही दोघे एकत्र येऊन सत्ता स्थापन होतेय अशा ठिकाणी अन्य कुणाची मदत घेण्याचा प्रश्न नाही. अशा जिल्ह्यांबाबत उस्मानाबाद व आणखी एखादी जिल्हा परिषद सोडून आमची आघाडी जवळपास नक्की झाली आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. आम्ही एकत्र येऊनही सत्ता मिळत नाही अशा ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे आणि काँग्रेसने मतदानात भाग न घेता अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यावा, असा विचार सुरू झाला असल्याचे तो म्हणाला.असे झाल्यास बीड, जालना, हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, कोल्हापूर व सांगलीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली. ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. अन्य आठ महापालिकांमध्ये सत्ता भाजपाकडे असेल हेही निश्चित आहे. (विशेष प्रतिनिधी) शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपा आशावादीजिल्हा परिषदांत शिवसेना व भाजपा एकत्र येतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला.आता ते जिल्हा परिषदांत आम्हाला तसाच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत त्यांनी दिले.- तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेत ‘कर्जमाफी नाही तर कामकाज नाही’, असे बजावत जोरदार घोषणाबाजी केली. - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली.तर भाजपाकडे तीनच जि.प.आता जिल्हा परिषदेबाबत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल. भाजपा-शिवसेना एकत्र आले तर २५ पैकी १४ जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता राहील. मात्र, भाजपाला बाजूला ठेवण्याचे अन्य या तिघांनी ठरविल्यास भाजपाची केवळ लातूर, वर्धा, चंद्रपूर या तीनच जिल्ह्यात सत्ता येईल. शिवसेनेच्या भूमिकेला त्यामुळेच महत्त्व आले आहे. गेल्यावेळी विदर्भातील चार जिल्हा परिषदांमध्ये भाजपा - राष्ट्रवादीची आघाडी होती. यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार असतील तर आम्ही अप्रत्यक्ष पाठिंब्याचा विचार करू शकतो, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.