शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

झेडीपीत ३५९ रुजू नाहीत

By admin | Updated: June 13, 2016 03:25 IST

पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

हितेन नाईक,

पालघर- ठाणे जिल्ह्याच्या विभाजना नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.परंतु पालघर मध्ये त्यातील प्रथमत: ३५९ कर्मचाऱ्यांनी रुजू होण्यास नकार देऊन आपल्या कर्मचारी संघटनांमार्फत प्रशासनावर दबाव टाकण्यास प्रारंभ केला असून त्याला ठाण्यातून मिळणाऱ्या राजकीय पाठबळा मुळे अजूनही हे कर्मचारी पालघर जिल्ह्यात हजर झालेले नाहीत. याचा फटका जिल्हा परिषदे च्या विकासत्मक कामांना बसत आहे. पालकमंत्र्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष या संदर्भात एकजुटीने प्रयत्न करतांना दिसत नसल्याने हया विरोधात शिवसेना आपल्या स्टाइल ने आंदोलन उभे करेल असा इशारा जि.प.सदस्य प्रकाश निकम यांनी दिला आहे.स्वतंत्र पालघर जिल्हा परिषद् अस्तित्वात आल्या नंतर ठाणे व पालघरमध्ये किती अधिकारी, कर्मचारी असावेत हे शासन पातळीवर निश्चित करण्यात आले होते. त्यातील बिंदु नामावली नुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पालघर मध्ये बदल्या करण्याचे आदेश निघाले होते.परंतु पालघर मध्ये जाणे गैरसोयीचे असल्याचे कारण सांगून हया कर्मचाऱ्यांनी पालघर मध्ये जाण्यास नकार दिला होता. या बाबत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री,आयुक्त पातळीवर बैठकाही झाल्या आहेत.त्या नुसार ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा परिषदेमध्ये वर्ग झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुजू झालेच पाहिजे असे आदेश निघाल्याचेही समजते. मात्र अजूनही हे कर्मचारी स्वेच्छा निवृती घेण्याच्या धमक्या देत रुजू होण्याबाबत चालढकल करीत आहेत.शासकीय यंत्रणांनी जलद काम करावे असे अपेक्षीत असतांना बालविकास प्रकल्प,महिला बालविकास, समाजकल्याण, पाणीपुरवठा इ.महत्वपूर्ण विभागाच्या ४७९ पैकी ३५९ कर्मचाऱ्यांची आॅर्डर निघून ही ते पालघरमध्ये रुजू होण्यास तयार नाहीत असे त्यांनी सांगितले.>खासदारांच्या दबावामुळे घडले सारे?खासदार कपिल पाटील यांच्या दबावामुळे ठाणे जि.प. कर्मचाऱ्यांना सोडत नाही. तसेच पालक मंत्री विष्णू सवरा आणि जि.प.अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या धरसोड प्रवृतीमुळे हे घडत असल्याचे त्यानी लोकमतशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हया प्रकरणात लक्ष घालावे आणि दोन वर्षापासून भिजत पडलेला हा प्रश्न निकालात काढावा. येत्या १५ दिवसात कर्मचारी पालघरमध्ये कामावर हजर झाले नाहीत तर सेना जिल्हा प्रमुख,जि.प.उपाध्यक्ष,गटनेते यांच्या सह शिवसेना स्टाइल ने आंदोलन उभारण्याचा इशारा ही निकम यांनी दिला आहे.