शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

झेडीपीत ३५९ रुजू नाहीत

By admin | Updated: June 13, 2016 03:25 IST

पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

हितेन नाईक,

पालघर- ठाणे जिल्ह्याच्या विभाजना नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.परंतु पालघर मध्ये त्यातील प्रथमत: ३५९ कर्मचाऱ्यांनी रुजू होण्यास नकार देऊन आपल्या कर्मचारी संघटनांमार्फत प्रशासनावर दबाव टाकण्यास प्रारंभ केला असून त्याला ठाण्यातून मिळणाऱ्या राजकीय पाठबळा मुळे अजूनही हे कर्मचारी पालघर जिल्ह्यात हजर झालेले नाहीत. याचा फटका जिल्हा परिषदे च्या विकासत्मक कामांना बसत आहे. पालकमंत्र्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष या संदर्भात एकजुटीने प्रयत्न करतांना दिसत नसल्याने हया विरोधात शिवसेना आपल्या स्टाइल ने आंदोलन उभे करेल असा इशारा जि.प.सदस्य प्रकाश निकम यांनी दिला आहे.स्वतंत्र पालघर जिल्हा परिषद् अस्तित्वात आल्या नंतर ठाणे व पालघरमध्ये किती अधिकारी, कर्मचारी असावेत हे शासन पातळीवर निश्चित करण्यात आले होते. त्यातील बिंदु नामावली नुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पालघर मध्ये बदल्या करण्याचे आदेश निघाले होते.परंतु पालघर मध्ये जाणे गैरसोयीचे असल्याचे कारण सांगून हया कर्मचाऱ्यांनी पालघर मध्ये जाण्यास नकार दिला होता. या बाबत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री,आयुक्त पातळीवर बैठकाही झाल्या आहेत.त्या नुसार ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा परिषदेमध्ये वर्ग झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुजू झालेच पाहिजे असे आदेश निघाल्याचेही समजते. मात्र अजूनही हे कर्मचारी स्वेच्छा निवृती घेण्याच्या धमक्या देत रुजू होण्याबाबत चालढकल करीत आहेत.शासकीय यंत्रणांनी जलद काम करावे असे अपेक्षीत असतांना बालविकास प्रकल्प,महिला बालविकास, समाजकल्याण, पाणीपुरवठा इ.महत्वपूर्ण विभागाच्या ४७९ पैकी ३५९ कर्मचाऱ्यांची आॅर्डर निघून ही ते पालघरमध्ये रुजू होण्यास तयार नाहीत असे त्यांनी सांगितले.>खासदारांच्या दबावामुळे घडले सारे?खासदार कपिल पाटील यांच्या दबावामुळे ठाणे जि.प. कर्मचाऱ्यांना सोडत नाही. तसेच पालक मंत्री विष्णू सवरा आणि जि.प.अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या धरसोड प्रवृतीमुळे हे घडत असल्याचे त्यानी लोकमतशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हया प्रकरणात लक्ष घालावे आणि दोन वर्षापासून भिजत पडलेला हा प्रश्न निकालात काढावा. येत्या १५ दिवसात कर्मचारी पालघरमध्ये कामावर हजर झाले नाहीत तर सेना जिल्हा प्रमुख,जि.प.उपाध्यक्ष,गटनेते यांच्या सह शिवसेना स्टाइल ने आंदोलन उभारण्याचा इशारा ही निकम यांनी दिला आहे.