शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

‘जलपरी’चे बिल घेतले परत!

By admin | Updated: May 14, 2016 03:23 IST

रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत चार कोटी रुपयांचे बिल झाल्याचे सांगत तत्काळ दोन कोटी चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटताच

नितीन अग्रवाल, नवी दिल्ली दुष्काळाचे चटके सहन करत असलेल्या लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा केला खरा. पण, रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत चार कोटी रुपयांचे बिल झाल्याचे सांगत तत्काळ दोन कोटी चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटताच, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार हे बिल माफ करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत अखंड पाणीपुरवठा करत राहू असे आश्वासनही रेल्वेने दिले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, लातूर प्रशासनाने विचारणा केल्यामुळेच पाण्याचे हे बिल देण्यात आले. पण रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हे बिल आम्ही मागे घेतले आहे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. रेल्वेने तत्काळ टँकर मागवत ते सोलापूर आणि पुणे विभागात पाठविले आणि जलपरीची व्यवस्था केली. पहिले दहा दिवस लातूर आणि मिरजच्या प्रशासनाला पाइपलाइन टाकण्यासाठी लागले. त्यानंतर ५० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. आतापर्यंत रेल्वेने सहा कोटी लीटरपेक्षा अधिक पाणी पोहोचविले आहे. लातूरला पाणीपुरवठा केल्याबाबत रेल्वेने चार कोटींचे बिल दिल्यानंतर या प्रकारावर रेल्वेला टीकेला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने बिल परत घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जाते. बिल माफ झाले : जिल्हाधिकारी पांडुरंग पोले२३ दिवसांचे २.४ कोटी रुपयांचे बिल आले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे बिल भरण्यासंदर्भात कळविले होते. मात्र बिल रेल्वेने माफ केले असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले.पाण्याची गरज आहे, तोपर्यंत पाणीपुरवठा केला जावा. या प्रकरणात आर्थिक प्रश्नावरून अडवणूक होता कामा नये. - सुरेश प्रभू