शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

तरुणाने भागवली गावाची तहान

By admin | Updated: September 19, 2015 23:05 IST

मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो...

- लक्ष्मण मोरे, पुणे

मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो... एका गावाला पिण्यासाठी पाणीच नाही, अशी माहिती त्याला कळते. अन् स्वत:च्या पगारातून पैसे देत हा तरुण गावासाठी महिनाभर पाण्याचा टँकर सुरू करण्याची जबाबदारी घेतो. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर अनेक जण आपापल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहेत. विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे. ४०वर्षीय नेरकर पुण्यातील नऱ्हे येथील एका कंपनीत वित्त विभागात व्यवस्थापक आहेत. दुष्काळाच्या बातम्यांनी ते व्यथित झाले. काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. दुष्काळग्रस्तांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांकडेही विचारणा केली. तेव्हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर गावाला पिण्यासाठी पाणीच नसल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी तातडीने पारनेरमधील विजयकुमार लाहोटी यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवून संपर्क साधला. सुरुवातीला गावात धान्य, चारा पाठविण्याची त्यांनी तयारी दर्शविली. परंतु धान्यापेक्षा पाणी फार महत्त्वाचे आहे, असे लाहोटी यांनी सांगितले. त्यावर नेरकरांनी एक महिनाभर गावाला पाणी देण्याचे वचन दिले. गावात लगेच टँकर सुरू करा, असे सांगत त्यांनी लाहोटी यांच्या बँक खात्यावर पहिल्याच दिवशी साडेसात हजार रुपये जमादेखील केले. त्यानंतर लगेच गावात टँकर आला. १५ दिवसांपासून टँकरद्वारे पारनेरकरांची तहान भागविली जात आहे. आपल्यापर्यंत पोहोचणारे पाणी कोणाकडून येते, याची अनेक गावकऱ्यांना माहितीही नाही.- नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे. पारनेरमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे. लोकांना आणि जनावरांना प्यायला पाणी नाही. विशाल नेरकरांनी दिलेली भेट अनमोल आहे. दररोज सात हजार लीटर पाणी गावामध्ये टँकरद्वारे दिले जाते. प्रत्येक गल्लीमध्ये एक दिवसाआड पाण्याचा टँकर पाठवून लोकांना समप्रमाणात पाण्याचे वाटप केले जात आहे. - विजयकुमार लाहोटी, पारनेर, जि. जालनामदत करण्यासाठी फार काही भव्यदिव्य करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही यंत्रणा सोबतीला नसली, तरी आपल्या परीने छोटी मदत करता येते. दुष्काळग्रस्तही आपलेच बांधव आहेत. त्यांचे दु:ख सर्वांनी थोडेथोडे वाटून घेतले तर ते कमी होईल. - विशाल नेरकर