शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

तरुणाने भागवली गावाची तहान

By admin | Updated: September 19, 2015 23:05 IST

मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो...

- लक्ष्मण मोरे, पुणे

मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो... एका गावाला पिण्यासाठी पाणीच नाही, अशी माहिती त्याला कळते. अन् स्वत:च्या पगारातून पैसे देत हा तरुण गावासाठी महिनाभर पाण्याचा टँकर सुरू करण्याची जबाबदारी घेतो. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर अनेक जण आपापल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहेत. विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे. ४०वर्षीय नेरकर पुण्यातील नऱ्हे येथील एका कंपनीत वित्त विभागात व्यवस्थापक आहेत. दुष्काळाच्या बातम्यांनी ते व्यथित झाले. काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. दुष्काळग्रस्तांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांकडेही विचारणा केली. तेव्हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर गावाला पिण्यासाठी पाणीच नसल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी तातडीने पारनेरमधील विजयकुमार लाहोटी यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवून संपर्क साधला. सुरुवातीला गावात धान्य, चारा पाठविण्याची त्यांनी तयारी दर्शविली. परंतु धान्यापेक्षा पाणी फार महत्त्वाचे आहे, असे लाहोटी यांनी सांगितले. त्यावर नेरकरांनी एक महिनाभर गावाला पाणी देण्याचे वचन दिले. गावात लगेच टँकर सुरू करा, असे सांगत त्यांनी लाहोटी यांच्या बँक खात्यावर पहिल्याच दिवशी साडेसात हजार रुपये जमादेखील केले. त्यानंतर लगेच गावात टँकर आला. १५ दिवसांपासून टँकरद्वारे पारनेरकरांची तहान भागविली जात आहे. आपल्यापर्यंत पोहोचणारे पाणी कोणाकडून येते, याची अनेक गावकऱ्यांना माहितीही नाही.- नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे. पारनेरमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे. लोकांना आणि जनावरांना प्यायला पाणी नाही. विशाल नेरकरांनी दिलेली भेट अनमोल आहे. दररोज सात हजार लीटर पाणी गावामध्ये टँकरद्वारे दिले जाते. प्रत्येक गल्लीमध्ये एक दिवसाआड पाण्याचा टँकर पाठवून लोकांना समप्रमाणात पाण्याचे वाटप केले जात आहे. - विजयकुमार लाहोटी, पारनेर, जि. जालनामदत करण्यासाठी फार काही भव्यदिव्य करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही यंत्रणा सोबतीला नसली, तरी आपल्या परीने छोटी मदत करता येते. दुष्काळग्रस्तही आपलेच बांधव आहेत. त्यांचे दु:ख सर्वांनी थोडेथोडे वाटून घेतले तर ते कमी होईल. - विशाल नेरकर