शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

चालत्या रेल्वेतून पडून तरुणाने गमावला पाय

By admin | Updated: November 3, 2016 05:31 IST

कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान खाली पडला. त्याला या अपघातात डावा पाय गमवावा लागला आहे.

कल्याण : भिवपुरी येथे राहणारा भुवनेश्वर अशोक दुबे हा दिवाळीनिमित्त मित्रांना भेटण्यासाठी कल्याणकडे आला होता. घरी परत जाण्यासाठी कल्याणहून कर्जत गाडी पकडली. गाडीला गर्दी असल्याने तो कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान खाली पडला. त्याला या अपघातात डावा पाय गमवावा लागला आहे. त्याच्यावर मुंबईतील शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी घडली. भुवनेश्वर हा १७ वर्षांचा असून त्याचे इयत्ता ९ वीपर्यंत शिक्षण झालेले आहे. तो दिवाळीनिमित्त मित्रांना भेटण्यास कल्याणला आला होता. त्याने पुन्हा भिवपुरीला जाण्यासाठी कर्जत गाडी पकडली. ४ वाजून ३० मिनिटांच्या कर्जत गाडीला गर्दी होती. गर्दी असल्याने तो कल्याण विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान गाडीतून खाली पडला. या अपघातातून तो बचावला खरा, पण त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. त्याच्या गाडीचे चाक गेल्याने डावा पाय गुडघ्याच्या वरपासून गमाविण्याची वेळ त्याच्यावर आली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी रुग्णवाहिका सेवा मोफत असतानादेखील तिच्या चालकाने त्याला तातडीने उपचारासाठी शीव रुग्णालयात हलविण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप भुवनेश्वरचे वडील अशोक दुबे यांनी केला. (प्रतिनिधी)>मुलाच्या भल्यासाठी बदलेले होते घर...भुवनेश्वरचे वडील अशोक दुबे हे मुलुंड कॉलनीत राहत होते. मुलगा भुवनेश्वर अभ्यास नीट करीत नाही. मित्राच्या सोबत असतो. त्यामुळे त्यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भिवपुरीला घर घेतले. भुवनेश्वर आधी मुलुंडच्या दयानंद शाळेत होता. नववीची परीक्षा असताना त्याचे डोके दुखत होते. तो आजारी होता. आता अपघात झाल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले आहे.