शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘तरुणांनी वाचन वाढवावे’

By admin | Updated: June 30, 2016 02:32 IST

तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे.

सागर नेवरेकर,

मुंबई- तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे. वाचनाने ज्ञानात भर पडत असल्याने तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. मात्र तंत्रज्ञान युगात तरुणपिढीचे वाचन कमी झाले आहे, अशी खंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली. निमित्त होते ते साठ्ये महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेचे.विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात २७ ते २९ जून दरम्यान बीएमएम मराठी विभाग पुरस्कृत ‘दर्पण मिडीया क्लब’ आणि ‘साहित्य रसग्रहण क्लब’ने व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी गझलकार प्रदीप निफाडकर यांनी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे अभिनेते रमेश भाटकर आणि लाईफ कोच लीना परांजपे यांनी संवाद साधला.प्रदीप निफाडकर म्हणाले, वाचन हे खुप महत्वाचे आहे. वाचनाने कवी घडतो. गझलेसाठी वाचन महत्त्वाचे असते. तरुणांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. रमेश भाटकर म्हणाले, तरुणाईला समाजातील वास्तवाचे भान असावे. वाचनाला बंधन नसावे, जे मिळेल ते वाचत गेले पाहिजे. कोणत्या वयात काय वाचावे हे माहीत नसेल तर जाणकारांचा सल्ला घ्यावा. मराठी माध्यमातील मुलांनी इंग्रजी पुस्तकेही वाचली पाहिजेत. मराठी मुले इतर भाषांमध्ये मागे राहता कामा नयेत.लीना परांजपे म्हणाल्या, मुलांनी कुठल्याही भाषेची भीती बाळगता कामा नये. मुलांनी कोणती पुस्तके वाचली, त्यातून ते काय शिकले आणि त्या गोष्टी किती अमलात आणल्या, हे एकमेकांशी शेअर केले पाहिजे. जे क्षेत्र आपल्याला आवडते त्या क्षेत्रातील वाचन जरुर करावे. प्रेरणादायी पुस्तके वाचावीत. वाचन करताना संयम ठेवला पाहिजे. मुलांनी प्रेरणादायी पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी चांगले नसल्यास त्यांच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)