शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

‘तरुणांनी वाचन वाढवावे’

By admin | Updated: June 30, 2016 02:32 IST

तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे.

सागर नेवरेकर,

मुंबई- तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे. वाचनाने ज्ञानात भर पडत असल्याने तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. मात्र तंत्रज्ञान युगात तरुणपिढीचे वाचन कमी झाले आहे, अशी खंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली. निमित्त होते ते साठ्ये महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेचे.विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात २७ ते २९ जून दरम्यान बीएमएम मराठी विभाग पुरस्कृत ‘दर्पण मिडीया क्लब’ आणि ‘साहित्य रसग्रहण क्लब’ने व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी गझलकार प्रदीप निफाडकर यांनी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे अभिनेते रमेश भाटकर आणि लाईफ कोच लीना परांजपे यांनी संवाद साधला.प्रदीप निफाडकर म्हणाले, वाचन हे खुप महत्वाचे आहे. वाचनाने कवी घडतो. गझलेसाठी वाचन महत्त्वाचे असते. तरुणांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. रमेश भाटकर म्हणाले, तरुणाईला समाजातील वास्तवाचे भान असावे. वाचनाला बंधन नसावे, जे मिळेल ते वाचत गेले पाहिजे. कोणत्या वयात काय वाचावे हे माहीत नसेल तर जाणकारांचा सल्ला घ्यावा. मराठी माध्यमातील मुलांनी इंग्रजी पुस्तकेही वाचली पाहिजेत. मराठी मुले इतर भाषांमध्ये मागे राहता कामा नयेत.लीना परांजपे म्हणाल्या, मुलांनी कुठल्याही भाषेची भीती बाळगता कामा नये. मुलांनी कोणती पुस्तके वाचली, त्यातून ते काय शिकले आणि त्या गोष्टी किती अमलात आणल्या, हे एकमेकांशी शेअर केले पाहिजे. जे क्षेत्र आपल्याला आवडते त्या क्षेत्रातील वाचन जरुर करावे. प्रेरणादायी पुस्तके वाचावीत. वाचन करताना संयम ठेवला पाहिजे. मुलांनी प्रेरणादायी पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी चांगले नसल्यास त्यांच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)