शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

तरुण प्रेक्षक..? छे... गाडी वळली समीक्षेकडे!

By admin | Updated: February 22, 2016 02:32 IST

नाट्यसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी ‘गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे?’ हा परिसंवाद रंगला आणि त्यात या विषयाशी संबंधित चर्चा झाली; परंतु परिसंवादाला अनेकदा विषयांतराची जी बाधा होते,

- राज चिंचणकर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी (ठाणे) नाट्यसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी ‘गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे?’ हा परिसंवाद रंगला आणि त्यात या विषयाशी संबंधित चर्चा झाली; परंतु परिसंवादाला अनेकदा विषयांतराची जी बाधा होते, त्याला हा परिसंवादही अपवाद ठरला नाही. तरुण प्रेक्षकांचे काय करायचे, यावर यात चर्चा होताहोता मूळ विषयावरून या परिसंवादाची गाडी आजकालच्या समीक्षेवर जाऊन घसरली. त्यावरूनच मग अधिक चर्वितचर्वण केले गेले. त्यामुळे गेला परिसंवाद कुणीकडे, असा प्रश्न उपस्थित झाला. या परिसंवादात ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, लेखक-दिग्दर्शक राजन बने, युवा रंगकर्मी अद्वैत दादरकर, नाट्यसमीक्षक जयंत पवार यांच्याशी दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला. प्रेमानंद गज्वी : रंगभूमीवर तरुणांचे प्रश्न अभावानेच आले आहेत. एखादा अपवाद वगळता तरुणांशी संबंधित विषय रंगभूमीवर दिसतच नाहीत; मग तरुणवर्ग नाटकाकडे वळणार कसा? व्यावसायिक नाटकांकडे तरुण वळत नसले, तरी एकांकिका मात्र सगळ्या हाऊसफुल्ल असतात. पण, स्पर्धेनंतर या एकांकिकांतले लेखक पुढे कुठे जातात, हा प्रश्नच आहे. त्यांच्यापुढे सामाजिक जीवनातील प्रश्न असतात आणि तेही महत्त्वाचे असतात, हेही त्याचे कारण असू शकेल. केवळ तरुणच नव्हे; तर आज नाटकांना एकंदरच प्रेक्षक आहे कुठे, हासुद्धा प्रश्नच आहे. नाटकाकडे वळण्यासाठी प्रेक्षकांवर आता कम्पल्शन करायला हवे. जयंत पवार : रंगभूमीला तरुण प्रेक्षक आहे, असे मला वाटते. पण, हा मुद्दा लक्षात घेताना केवळ व्यावसायिक नाटकांचा विचार केला जाऊ नये. कारण, व्यावसायिक नाटकांकडे तरुणवर्ग वळलेला दिसत नसला, तरी एकांकिका किंवा प्रायोगिक नाटकांना तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे. आज तरुणांच्या अंगाने नाटके लिहिली गेली पाहिजेत, तसेच त्यांच्यासाठी मिनी नाट्यगृहे निर्माण करणेही गरजेचे आहे. बाहेरच्या समाजात जो तरुणवर्ग वाढतोय, तो व्यावसायिक नाटकांना यायला पाहिजेच, असे काही नाही. आजकाल घरांतही तरुणांची एक वेगळी स्पेस असते. हे लक्षात घेतले तर आज रंगभूमीवर सादर होणाऱ्या कौटुंबिक प्रकारच्या नाटकांना तरुणवर्ग येईलच, अशी अपेक्षा करता येणार नाही. आजच्या तरुणांनी स्वत:चा असा रंगमंच निर्माण केलेला आहे आणि तरुणवर्ग तिथे जात असतो. अद्वैत दादरकर : तरुणवर्गाला आकर्षित करण्यात नाटके कमी पडत आहेत. जरी तरुणांवरचे एखादे नाटक लिहिले, तर त्याला निर्माते मिळत नाहीत. निर्मात्यांचा भर हा कौटुंबिक नाटकांवर असतो. अशा या स्थितीत युवा नाटककारांच्या पुढे संभ्रम निर्माण झाला आहे. पण, जरी तरुण प्रेक्षक नाटकांना येत नसला, तरी आज नाटकांना येणारा चाळीशीचा प्रेक्षक हा मनाने तरुण होत असल्याचे मला वाटते. एकांकिका स्पर्धांतून खूप चांगले काम तरुणवर्गाकडून केले जात आहे. फक्त आजच्या तरुणांत डेप्थची कमतरता जाणवते. पूर्वीच्या नाटकांच्या तुलनेत आजच्या रंगकर्मींच्या भूमिकांतून एकंदर जगणे जोशात व्यक्त होताना दिसत नाही. पण, स्पर्धात्मक रंगभूमीतून तरुण प्रेक्षक आजही मिळत आहेतच. त्यामुळे मी अजिबात निराशावादी नाहीय. नाटकांच्या प्रयोगांची माहिती मिळण्याचे साधन आजही वृत्तपत्रे हेच आहे. पण, आजचा तरुण रोजचे वर्तमानपत्रही वाचत नाही. त्यामुळे आजची पिढी ज्या आधुनिक माध्यमांना जवळ करते, त्याचा विचार नाटकांच्या जाहिरातींसाठी करायला हवा. राजन बने : माझ्या मते सगळेच प्रेक्षक हे तरुण असतात. कोणत्याही विचारांची चौकट मोडून जगणारा प्रेक्षक हा तरुणच असतो. आज टीव्ही मालिकांकडे तरुण अधिक आकर्षित झाला आहे. पण, तरुणांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडता कामा नये. आजचा तरुणवर्ग हा आत्मकेंद्रित झालेला दिसतो. स्वत:चे काम करून झाल्यावर इतरांच्या नाट्यकृती ही मंडळी पाहतच नाहीत. नाटक आणि तरुणवर्ग हा मुद्दा एका बाजूला असतानाच निर्मात्यांच्या आघाडीवर काही वेगळेच सुरू असलेले दिसते. आजचे निर्माते हे फायनान्सर झाले आहेत. अशा निर्मात्यांपेक्षा रंगभूमीला तरुण निर्मात्यांची अधिक गरज आहे.