शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

तुरीची शासकीय खरेदी सुरूच राहणार

By admin | Updated: June 1, 2017 03:39 IST

राज्य शासनाच्या ३१ मे या दुसऱ्यांदा दिलेल्या अंतिम मुदतीनंतरही राज्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाच्या ३१ मे या दुसऱ्यांदा दिलेल्या अंतिम मुदतीनंतरही राज्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. मात्र मुदत संपलेली असली तरी राज्य शासनाच्या मार्फत तुरीची शासकीय खरेदी सुरूच राहील. शेतकऱ्यांची तूर पडून राहणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल. अशी ग्वाही पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मंगळवारपर्यंत राज्यात ५७ लाख क्विंटलची शासकीय तूर खरेदी झाली होती. विदर्भात अकोला जिल्ह्यातील पाचही नाफेड केंद्रांवर एक लाख ५२ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अकोला जिल्ह्यात ८०हजार क्विंटल खरेदी झाली. नागपूरमध्ये आतापर्यंत २८,९१६ क्विंटल एकूण खरेदी झाली. २० हजार क्विंटल माल खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. १९०० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ केंद्रांवर १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची ४.५ लाख क्विंटल तूरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. वाशिम जिल्ह्यातील पाच नाफेड कें द्रांवर चार लाख ८३ हजार ६५३ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. ३० मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर यापुढेही खरेदी केली जाणार असल्याचे बाजार समितीच्या सचिवाने स्पष्ट केले.खान्देशात शेकडो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, नंदुरबार व शहादा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू होते. हमदनगर जिल्ह्यात अडीच लाख क्विंटल खरेदी झाली, असे नाफेडचे जिल्हा विपणन अधिकारी जी.एन. मगरे यांनी सांगितले. मराठवाड्यातही माल पडूनउस्मानाबाद जिल्ह्यात १ लाख २६ हजार क्विंटल खरेदी झाली. सुमारे २ हजार शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल माल मापाविना पडून आहे. बीडमध्ये साडेचार लाख क्विंटल खरेदी झाली तर ४० हजार क्विंटल माल विक्रीस आला आहे. बुधवारी मुदत संपलेली असली तरी राज्य शासनाच्या मार्फत तुरीची खरेदी सुरूच राहील. शेतकऱ्यांची तूर पडून राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल. - सुभाष देशमुख, पणन व सहकार मंत्री