शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

आपणच घोटतोय वसुंधरेचा गळा!

By admin | Updated: July 5, 2015 03:00 IST

मान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि

- डॉ. राजेंद्र सिंह(लेखक मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)शब्दांकन - सचिन लुंगसेमान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि त्यानंतर मध्य भारतात पावसाचा खंड पडणे, याच घटना होत असताना पहाडांवर अतिवृष्टी होऊन पूर येणे, अशा गोष्टी सलग घडत आहेत. याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला असेल आणि होतही असेल. परंतु याची पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नेमके आपण तेच तपासत नाही आणि येथेच गल्लत होते. मान्सून दाखल होण्यास झालेला विलंब, पाकिस्तानातील उष्णतेची लाट, मान्सूनने देश व्यापल्यानंतर पडलेला खंड, पहाडांवर होणारी अतिवृष्टी आणि ‘एल निनो’चा प्रभाव, या सगळ्या घटनांशी जागतिक तापमान वाढीचा संबंध नाही, असे कोणीही कितीही ओरडून सांगत असले तरी जागतिक तापमानवाढीमुळेच वातावरणात हे बदल होत आहेत, हे मी ठामपणे सांगू इच्छित आहे.आपण यापूर्वीही जागतिक तापमानवाढीच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. मान्सूनचा एक पॅटर्न असतो. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर बदल अपेक्षित असतात, असे सांगण्यात येत असले तरी त्यामागची पार्श्वभूमी कोणीही समजावून घेत नाही. ऋतुचक्र बदलले आहे, बदलते आहे, हे आपण समजावून घेत नाही. आपण निसर्गाशी खेळतो आहोत. पाकमध्ये आलेली उष्णतेची लाट हे त्याचेच उदाहरण आहे. आपल्याकडे जेव्हा उन्हाळा होता तेव्हा देशात आलेल्या उष्णतेच्या लाटेने सुमारे ५०० जणांचा बळी गेला होता. बळींमध्ये दक्षिण भारतातील नागरिकांचे प्रमाण अधिक होते. आता पाकिस्तानात आलेल्या हजारएक बळी गेले.जागतिक तापमानवाढ ही समस्या काही आज निर्माण झालेली नाही. आपण आपल्या वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा गळा घोटला आहे, प्रदूषण वाढवले आहे, हिरवळ नष्ट केली आहे. आपण निसर्गाला जे देतो तेच निसर्ग आपणाला परत करीत असतो. जागतिक तापमान वाढ हा त्याचाच परिणाम आहे. जमिनीवरील झाडे नष्ट होतात. जमीन वाळवंटासारखी होते. जमिनीतील पाणी कमी होते. तेव्हा आपण त्यावर उपाय करण्याऐवजी समस्या आणखी वाढवत जातो. मध्य भारत असो किंवा आणखी काही. विदर्भ आणि मराठवाड्यात नेमके हेच झाले आहे. म्हणून तिथे पाऊस कमी आणि उष्णता वाढली आहे. जागतिक स्तरावरही सर्वच देशांना तापमानवाढीची झळ बसते आहे. दक्षिण आशियातील राष्ट्रांनाही जागतिक तापमान वाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे आजारी पडलेल्या वसुंधरेला बरे करण्याची गरज आहे. पृथ्वीवरची नष्ट झालेली हिरवळ वाढविण्याची गरज आहे. आपण आपली जीवनशैली (लाइफ स्टाइल) बदलण्याची गरज आहे. असे झाले तर आपण निसर्गाशी एकरूप होऊ. जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होऊ तेव्हा कुठे निसर्ग आपणाला तारेल.