शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आपणच घोटतोय वसुंधरेचा गळा!

By admin | Updated: July 5, 2015 03:00 IST

मान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि

- डॉ. राजेंद्र सिंह(लेखक मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)शब्दांकन - सचिन लुंगसेमान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि त्यानंतर मध्य भारतात पावसाचा खंड पडणे, याच घटना होत असताना पहाडांवर अतिवृष्टी होऊन पूर येणे, अशा गोष्टी सलग घडत आहेत. याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला असेल आणि होतही असेल. परंतु याची पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नेमके आपण तेच तपासत नाही आणि येथेच गल्लत होते. मान्सून दाखल होण्यास झालेला विलंब, पाकिस्तानातील उष्णतेची लाट, मान्सूनने देश व्यापल्यानंतर पडलेला खंड, पहाडांवर होणारी अतिवृष्टी आणि ‘एल निनो’चा प्रभाव, या सगळ्या घटनांशी जागतिक तापमान वाढीचा संबंध नाही, असे कोणीही कितीही ओरडून सांगत असले तरी जागतिक तापमानवाढीमुळेच वातावरणात हे बदल होत आहेत, हे मी ठामपणे सांगू इच्छित आहे.आपण यापूर्वीही जागतिक तापमानवाढीच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. मान्सूनचा एक पॅटर्न असतो. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर बदल अपेक्षित असतात, असे सांगण्यात येत असले तरी त्यामागची पार्श्वभूमी कोणीही समजावून घेत नाही. ऋतुचक्र बदलले आहे, बदलते आहे, हे आपण समजावून घेत नाही. आपण निसर्गाशी खेळतो आहोत. पाकमध्ये आलेली उष्णतेची लाट हे त्याचेच उदाहरण आहे. आपल्याकडे जेव्हा उन्हाळा होता तेव्हा देशात आलेल्या उष्णतेच्या लाटेने सुमारे ५०० जणांचा बळी गेला होता. बळींमध्ये दक्षिण भारतातील नागरिकांचे प्रमाण अधिक होते. आता पाकिस्तानात आलेल्या हजारएक बळी गेले.जागतिक तापमानवाढ ही समस्या काही आज निर्माण झालेली नाही. आपण आपल्या वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा गळा घोटला आहे, प्रदूषण वाढवले आहे, हिरवळ नष्ट केली आहे. आपण निसर्गाला जे देतो तेच निसर्ग आपणाला परत करीत असतो. जागतिक तापमान वाढ हा त्याचाच परिणाम आहे. जमिनीवरील झाडे नष्ट होतात. जमीन वाळवंटासारखी होते. जमिनीतील पाणी कमी होते. तेव्हा आपण त्यावर उपाय करण्याऐवजी समस्या आणखी वाढवत जातो. मध्य भारत असो किंवा आणखी काही. विदर्भ आणि मराठवाड्यात नेमके हेच झाले आहे. म्हणून तिथे पाऊस कमी आणि उष्णता वाढली आहे. जागतिक स्तरावरही सर्वच देशांना तापमानवाढीची झळ बसते आहे. दक्षिण आशियातील राष्ट्रांनाही जागतिक तापमान वाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे आजारी पडलेल्या वसुंधरेला बरे करण्याची गरज आहे. पृथ्वीवरची नष्ट झालेली हिरवळ वाढविण्याची गरज आहे. आपण आपली जीवनशैली (लाइफ स्टाइल) बदलण्याची गरज आहे. असे झाले तर आपण निसर्गाशी एकरूप होऊ. जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होऊ तेव्हा कुठे निसर्ग आपणाला तारेल.