शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आपणच घोटतोय वसुंधरेचा गळा!

By admin | Updated: July 5, 2015 03:00 IST

मान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि

- डॉ. राजेंद्र सिंह(लेखक मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)शब्दांकन - सचिन लुंगसेमान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि त्यानंतर मध्य भारतात पावसाचा खंड पडणे, याच घटना होत असताना पहाडांवर अतिवृष्टी होऊन पूर येणे, अशा गोष्टी सलग घडत आहेत. याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला असेल आणि होतही असेल. परंतु याची पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नेमके आपण तेच तपासत नाही आणि येथेच गल्लत होते. मान्सून दाखल होण्यास झालेला विलंब, पाकिस्तानातील उष्णतेची लाट, मान्सूनने देश व्यापल्यानंतर पडलेला खंड, पहाडांवर होणारी अतिवृष्टी आणि ‘एल निनो’चा प्रभाव, या सगळ्या घटनांशी जागतिक तापमान वाढीचा संबंध नाही, असे कोणीही कितीही ओरडून सांगत असले तरी जागतिक तापमानवाढीमुळेच वातावरणात हे बदल होत आहेत, हे मी ठामपणे सांगू इच्छित आहे.आपण यापूर्वीही जागतिक तापमानवाढीच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. मान्सूनचा एक पॅटर्न असतो. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर बदल अपेक्षित असतात, असे सांगण्यात येत असले तरी त्यामागची पार्श्वभूमी कोणीही समजावून घेत नाही. ऋतुचक्र बदलले आहे, बदलते आहे, हे आपण समजावून घेत नाही. आपण निसर्गाशी खेळतो आहोत. पाकमध्ये आलेली उष्णतेची लाट हे त्याचेच उदाहरण आहे. आपल्याकडे जेव्हा उन्हाळा होता तेव्हा देशात आलेल्या उष्णतेच्या लाटेने सुमारे ५०० जणांचा बळी गेला होता. बळींमध्ये दक्षिण भारतातील नागरिकांचे प्रमाण अधिक होते. आता पाकिस्तानात आलेल्या हजारएक बळी गेले.जागतिक तापमानवाढ ही समस्या काही आज निर्माण झालेली नाही. आपण आपल्या वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा गळा घोटला आहे, प्रदूषण वाढवले आहे, हिरवळ नष्ट केली आहे. आपण निसर्गाला जे देतो तेच निसर्ग आपणाला परत करीत असतो. जागतिक तापमान वाढ हा त्याचाच परिणाम आहे. जमिनीवरील झाडे नष्ट होतात. जमीन वाळवंटासारखी होते. जमिनीतील पाणी कमी होते. तेव्हा आपण त्यावर उपाय करण्याऐवजी समस्या आणखी वाढवत जातो. मध्य भारत असो किंवा आणखी काही. विदर्भ आणि मराठवाड्यात नेमके हेच झाले आहे. म्हणून तिथे पाऊस कमी आणि उष्णता वाढली आहे. जागतिक स्तरावरही सर्वच देशांना तापमानवाढीची झळ बसते आहे. दक्षिण आशियातील राष्ट्रांनाही जागतिक तापमान वाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे आजारी पडलेल्या वसुंधरेला बरे करण्याची गरज आहे. पृथ्वीवरची नष्ट झालेली हिरवळ वाढविण्याची गरज आहे. आपण आपली जीवनशैली (लाइफ स्टाइल) बदलण्याची गरज आहे. असे झाले तर आपण निसर्गाशी एकरूप होऊ. जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होऊ तेव्हा कुठे निसर्ग आपणाला तारेल.