शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

अगोदर शेतकऱ्याला जगवा, मग ‘स्वाभिमाना’चे बघू - डॉ. यशवंतराव थोरात

By admin | Updated: March 18, 2016 16:53 IST

राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू अशी प्रतिक्रिया नाबार्डचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.यशवंतराव थोरात यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्राचा विकास दर उणे 2.7 टक्के असताना राज्य पुढे कसे जाणार अशी विचारणा त्यांनी केली.
थोरात म्हणाले,‘राज्य सरकारने बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद केली हे महत्वाचे नाही. तुम्ही जी तरतूद करता त्यातील एक एक रुपया त्या क्षेत्रासाठी किती प्रामाणिकपणे खर्च होणार हे जास्त महत्वाचे आहे. मला नुसते आकडे आणि तरतूदी नकोत. त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. आज मराठवाडा,विदर्भात माणसे व जनावरेही पाण्यावाचून मरत आहेत. त्यांना पहिल्यांदा प्यायला पाणी  द्या. त्याला जगविण्यासाठी तुम्ही ‘वॉर फुटिंग’वर काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. कारण माणूसच जगला नाही तर त्याचा स्वाभिमान कसा जागृत करणार याचा विचार व्हावा. जो शेतकरी आज मरायला लागला आहे, त्यासाठी काही तरतूदी केल्या आहेत. जो श्रीमंत आहे, त्याला तुमच्या मदतीची गरज नाही. परंतू जो मधला शेतकरी आहे, त्याच्यासाठी सरकारने केलेल्या योजनांचा लाभ मिळवताना तोंडाला फेस येतो. म्हणून शेतीतील जाणत्या लोकांची मदत घेवून ज्या तरतूदी तुम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत, त्या खरेच त्यांच्यार्पयत पोहोचल्या का याचा आढावा घेतला गेला पाहिजे. असे सामाजिक लेखापरीक्षण झाल्याशिवाय नुसत्या तरतूदी काय कामाच्या नाहीत.’