शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
3
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
4
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
5
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
7
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
8
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
9
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
10
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
11
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
12
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
13
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
17
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
18
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
19
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
20
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था

अगोदर शेतकऱ्याला जगवा, मग ‘स्वाभिमाना’चे बघू - डॉ. यशवंतराव थोरात

By admin | Updated: March 18, 2016 16:53 IST

राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू अशी प्रतिक्रिया नाबार्डचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.यशवंतराव थोरात यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्राचा विकास दर उणे 2.7 टक्के असताना राज्य पुढे कसे जाणार अशी विचारणा त्यांनी केली.
थोरात म्हणाले,‘राज्य सरकारने बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद केली हे महत्वाचे नाही. तुम्ही जी तरतूद करता त्यातील एक एक रुपया त्या क्षेत्रासाठी किती प्रामाणिकपणे खर्च होणार हे जास्त महत्वाचे आहे. मला नुसते आकडे आणि तरतूदी नकोत. त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. आज मराठवाडा,विदर्भात माणसे व जनावरेही पाण्यावाचून मरत आहेत. त्यांना पहिल्यांदा प्यायला पाणी  द्या. त्याला जगविण्यासाठी तुम्ही ‘वॉर फुटिंग’वर काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. कारण माणूसच जगला नाही तर त्याचा स्वाभिमान कसा जागृत करणार याचा विचार व्हावा. जो शेतकरी आज मरायला लागला आहे, त्यासाठी काही तरतूदी केल्या आहेत. जो श्रीमंत आहे, त्याला तुमच्या मदतीची गरज नाही. परंतू जो मधला शेतकरी आहे, त्याच्यासाठी सरकारने केलेल्या योजनांचा लाभ मिळवताना तोंडाला फेस येतो. म्हणून शेतीतील जाणत्या लोकांची मदत घेवून ज्या तरतूदी तुम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत, त्या खरेच त्यांच्यार्पयत पोहोचल्या का याचा आढावा घेतला गेला पाहिजे. असे सामाजिक लेखापरीक्षण झाल्याशिवाय नुसत्या तरतूदी काय कामाच्या नाहीत.’