शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारपीडितांना तुम्ही भिकारी समजू नका

By admin | Updated: March 2, 2017 04:59 IST

बलात्कारित स्त्रियांना भरपाई देऊन सरकार त्यांच्यावर उपकार करत नाही

मुंबई : बलात्कारित स्त्रियांना भरपाई देऊन सरकार त्यांच्यावर उपकार करत नाही. भरपाई देणे सरकारचे कर्तव्यच आहे. अशा स्त्रियांची सरकार भिकारी समजून बोळवण करू शकत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या निर्दयी वृत्तीचे वाभाडे काढले. बलात्कारपीडितांना भरपाई देण्याच्या योजनेचे नाव ‘मनोधैर्य’ असे आहे. याचा अर्थ सरकारने त्यांचे मनोबल वाढेल, असे वागायला हवे, पण सरकार उलट वागत असल्याचे दिसते, असेही न्यायालय म्हणाले.‘मनोधैर्य’ योजनेखाली ३ लाख रुपयांची भरपाई मिळावी, यासाठी बोरीवलीच्या १४ वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीने केलेल्या याचिवेर सुनावणी करताना मुख्य न्या. डॉ. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सरकारला धारेवर धरले. एका माणसाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याला फसविले, असे मुुलीचे म्हणणे आहे. गेल्या आॅक्टोबरमध्ये याचिका केल्यानंतर तिला भरपाई म्हणून एक लाख रुपये दिले आहेत. मात्र, हा प्रकार संमतीने झाल्याचे वाटत असल्याने तिला दोन लाखांपेक्षा जास्त भरपाई देता येणार नाही, असे सरकारने सांगितले.सरकारची ही भूमिका ऐकून न्यायालय म्हणाले की, ही मुलगी १४ वर्षांची आहे. आपण काय करतो आहोत, याचे भान ठेवून त्याच्या परिणामांचा विचार करण्याएवढी प्रगल्भता तिच्याकडून अपेक्षित धरता येणार नाही. तीव्र नाराजी व्यक्त करीत मुख्य न्यायाधीश म्हणाल्या की, सरकार या विषयाकडे कशा प्रकारे पाहते हेच कळेनासे झाले आहे. ही वृत्ती कमालीची भावनाभून्य व निर्दयी आहे. अशा विषयांत सरकारने मन आणि भावना जागेवर ठेवून निर्णय घ्यायला सुरुवात केल्याखेरीज काहीही होणार नाही, राज्य सरकारला उद्देशून न्या. डॉ. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी म्हणाले की, बलात्कारांच्या अशा प्रकरणांमध्ये तुम्ही मनापासून विचार करायला हवा. असा संवेदनाशून्य दृष्टिकोन घेऊन चालणार नाही. बलात्कारपीडित या भिकारी नाहीत व भरपाई देता म्हणजे तुम्ही त्यांना काही भीक घालत नाही, हे लक्षात ठेवा भरपाई मिळणे हा त्यांचा हक्कच आहे. (प्रतिनिधी)>तुमच्या घरात झाले तर?मुंबई उपनगर जिल्ह्याचे एक उपजिल्हाधिकारी बुधवारच्या सुनावणीच्या वेळी हजर होते. त्यांना उद्देशून न्यायालयाने विचारले की, तुमच्या घरातल्यांपैकी कोणाच्या बाबतीत अशी घटना घडली तर तुम्हाला काय वाटेल?