शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बलात्कारपीडितांना तुम्ही भिकारी समजू नका

By admin | Updated: March 2, 2017 04:59 IST

बलात्कारित स्त्रियांना भरपाई देऊन सरकार त्यांच्यावर उपकार करत नाही

मुंबई : बलात्कारित स्त्रियांना भरपाई देऊन सरकार त्यांच्यावर उपकार करत नाही. भरपाई देणे सरकारचे कर्तव्यच आहे. अशा स्त्रियांची सरकार भिकारी समजून बोळवण करू शकत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या निर्दयी वृत्तीचे वाभाडे काढले. बलात्कारपीडितांना भरपाई देण्याच्या योजनेचे नाव ‘मनोधैर्य’ असे आहे. याचा अर्थ सरकारने त्यांचे मनोबल वाढेल, असे वागायला हवे, पण सरकार उलट वागत असल्याचे दिसते, असेही न्यायालय म्हणाले.‘मनोधैर्य’ योजनेखाली ३ लाख रुपयांची भरपाई मिळावी, यासाठी बोरीवलीच्या १४ वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीने केलेल्या याचिवेर सुनावणी करताना मुख्य न्या. डॉ. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सरकारला धारेवर धरले. एका माणसाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्याला फसविले, असे मुुलीचे म्हणणे आहे. गेल्या आॅक्टोबरमध्ये याचिका केल्यानंतर तिला भरपाई म्हणून एक लाख रुपये दिले आहेत. मात्र, हा प्रकार संमतीने झाल्याचे वाटत असल्याने तिला दोन लाखांपेक्षा जास्त भरपाई देता येणार नाही, असे सरकारने सांगितले.सरकारची ही भूमिका ऐकून न्यायालय म्हणाले की, ही मुलगी १४ वर्षांची आहे. आपण काय करतो आहोत, याचे भान ठेवून त्याच्या परिणामांचा विचार करण्याएवढी प्रगल्भता तिच्याकडून अपेक्षित धरता येणार नाही. तीव्र नाराजी व्यक्त करीत मुख्य न्यायाधीश म्हणाल्या की, सरकार या विषयाकडे कशा प्रकारे पाहते हेच कळेनासे झाले आहे. ही वृत्ती कमालीची भावनाभून्य व निर्दयी आहे. अशा विषयांत सरकारने मन आणि भावना जागेवर ठेवून निर्णय घ्यायला सुरुवात केल्याखेरीज काहीही होणार नाही, राज्य सरकारला उद्देशून न्या. डॉ. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी म्हणाले की, बलात्कारांच्या अशा प्रकरणांमध्ये तुम्ही मनापासून विचार करायला हवा. असा संवेदनाशून्य दृष्टिकोन घेऊन चालणार नाही. बलात्कारपीडित या भिकारी नाहीत व भरपाई देता म्हणजे तुम्ही त्यांना काही भीक घालत नाही, हे लक्षात ठेवा भरपाई मिळणे हा त्यांचा हक्कच आहे. (प्रतिनिधी)>तुमच्या घरात झाले तर?मुंबई उपनगर जिल्ह्याचे एक उपजिल्हाधिकारी बुधवारच्या सुनावणीच्या वेळी हजर होते. त्यांना उद्देशून न्यायालयाने विचारले की, तुमच्या घरातल्यांपैकी कोणाच्या बाबतीत अशी घटना घडली तर तुम्हाला काय वाटेल?