शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

तरीही फक्त २ हजार किमी रस्त्यांवर ‘बार’मुक्ती

By admin | Updated: April 18, 2017 05:50 IST

राष्ट्रीय, राज्य महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आले तरी राज्यातील ४४ हजार किमीपैकी केवळ २ ते अडीच हजार किलोमीटरच्या रस्त्यांलगतचे बीअरबार

मुंबई : राष्ट्रीय, राज्य महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आले तरी राज्यातील ४४ हजार किमीपैकी केवळ २ ते अडीच हजार किलोमीटरच्या रस्त्यांलगतचे बीअरबार आणि दारू दुकाने ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या कचाट्यातून सुटू शकतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. या महामार्गांपासून ५०० मीटरच्या आतील बीअरबार न्यायालयीन निर्णयाचा फटका बसल्याने काही दिवसांपासून बंद आहेत. महापालिका, नगरपालिकांनी ठराव केला तर त्यांच्या हद्दीतील महामार्गांचे हस्तांतरण त्यांना केले जाऊ शकेल, असे परिपत्रक राज्य शासनाने २००१ मध्ये काढले होते. त्याचा आधार घेऊन काही ठिकाणी रस्त्यांचे हस्तांतरणही केले जात आहे. राज्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांची लांबी सुमारे ९० हजार किलोमीटर आहे आणि त्यातील सुमारे २ ते अडीच हजार किमीचेच रस्ते हे महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीतून जातात. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेतला तरी महामार्गांवरील सर्व बीअरबार सुरू होण्याची शक्यता नाही. फार कमी प्रमाणात ते सुरू होतील. काही महापालिका आणि नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील रस्ते त्यांना हस्तांतरीत करण्याची मागणीचे ठराव केले असून ते शासनाकडे पाठविले आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची हमी ज्या महापालिका आणि नगरपालिका देतील त्यांनाच रस्ते हस्तांतरीत करण्याची परवानगी दिली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या या स्पष्टोक्तीनंतर राज्यातील महामार्गांलगतचे सर्व बीअरबार सुरू होऊ शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्पादन शुल्कापासूनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार आहे. (विशेष प्रतिनिधी)