शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

तरीही फक्त २ हजार किमी रस्त्यांवर ‘बार’मुक्ती

By admin | Updated: April 18, 2017 05:50 IST

राष्ट्रीय, राज्य महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आले तरी राज्यातील ४४ हजार किमीपैकी केवळ २ ते अडीच हजार किलोमीटरच्या रस्त्यांलगतचे बीअरबार

मुंबई : राष्ट्रीय, राज्य महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आले तरी राज्यातील ४४ हजार किमीपैकी केवळ २ ते अडीच हजार किलोमीटरच्या रस्त्यांलगतचे बीअरबार आणि दारू दुकाने ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या कचाट्यातून सुटू शकतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. या महामार्गांपासून ५०० मीटरच्या आतील बीअरबार न्यायालयीन निर्णयाचा फटका बसल्याने काही दिवसांपासून बंद आहेत. महापालिका, नगरपालिकांनी ठराव केला तर त्यांच्या हद्दीतील महामार्गांचे हस्तांतरण त्यांना केले जाऊ शकेल, असे परिपत्रक राज्य शासनाने २००१ मध्ये काढले होते. त्याचा आधार घेऊन काही ठिकाणी रस्त्यांचे हस्तांतरणही केले जात आहे. राज्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांची लांबी सुमारे ९० हजार किलोमीटर आहे आणि त्यातील सुमारे २ ते अडीच हजार किमीचेच रस्ते हे महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीतून जातात. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेतला तरी महामार्गांवरील सर्व बीअरबार सुरू होण्याची शक्यता नाही. फार कमी प्रमाणात ते सुरू होतील. काही महापालिका आणि नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील रस्ते त्यांना हस्तांतरीत करण्याची मागणीचे ठराव केले असून ते शासनाकडे पाठविले आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची हमी ज्या महापालिका आणि नगरपालिका देतील त्यांनाच रस्ते हस्तांतरीत करण्याची परवानगी दिली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या या स्पष्टोक्तीनंतर राज्यातील महामार्गांलगतचे सर्व बीअरबार सुरू होऊ शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्पादन शुल्कापासूनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार आहे. (विशेष प्रतिनिधी)