शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

...तर वर्ष वाया जाणार नाही !

By admin | Updated: June 9, 2015 04:18 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. परीक्षेचा ८०/२० पॅटर्न आणि बेस्ट आॅफ फाइव्हमुळे गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या निकालाचा टक्का वाढत आहे. त्यातही या परीक्षेत कमाल दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीची सवलत दिली आहे.सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी एटीकेटीची सवलत देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये तात्पुरता प्रवेश मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण विषय घेऊन आॅक्टोबर २०१५मध्ये आयोजित मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ट होणे अनिवार्य आहे. यामध्ये पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास मार्च २०१६च्या परीक्षेमधील संधी अंतिम राहील. या संधीमध्येही एटीकेटी प्राप्त विषयांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास त्याचा अकरावीचा प्रवेश रद्द करण्यात येईल. राज्य शासनाच्या ३० नोव्हेंबर २०११च्या निर्णयानुसार राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळाडू विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस अनुत्तीर्ण होतील, अशाच खेळाडू विद्यार्थ्यांना २५ गुणांपर्यंत सवलत दिली आहे.रात्र शाळेचा निकाल दहावी परीक्षेसाठी रात्र शाळेतून नोंदणी केलेल्या ४ हजार ७७६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ८१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 61.33%लागला आहे. एकट्या मुंबई विभागातून रात्र शाळाअंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार १३० होती. मुंबई विभागातील १ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.उत्तरपत्रिकेची छायांकित प्रतविद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जातील. आॅनलाइन निकालानंतर संबंधित विभागीय मंडळाकडे निकालापासून २९ जूनपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.गुणपडताळणीची सुविधाज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची आहे, मूळ गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसह विहित नमुन्यात, विहित शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे १५ ते २५ जून या कालावधीतपर्यंत अर्ज करावयाचा आहे.श्रेणी/गुणसुधार योजनाश्रेणी/ गुणसुधार (क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम) योजनेंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी सप्टेंबर/आॅक्टोबर २०१५ किंवा मार्च २०१६ पुन्हा परीक्षा देता येईल.सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) निकषसहा अनिवार्य विषयांपैकी अधिक टक्केवारी असलेल्या पाच विषयांचे एकूण गुण व टक्केवारी गुणपत्रिकेत दर्शविण्यात आलेली आहे. मात्र उत्तीर्णतेचे निकष व अन्य सवलती प्रचलित पद्धतीनुसार ठेवल्या आहेत.अपंगांनीही घेतली भरारीअपंग विद्यार्थ्यांनीही भरारी घेतली असून, हा निकाल ८७.४६ टक्के लागला. त्यामध्ये अंध विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली असून, ९३.९१% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६,१४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण ५ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ८८७ अंध विद्यार्थी होते. त्यापैकी ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्चमधील परीक्षेपासून गतिमंद असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या प्रत्येक तासाला २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आला. तसेच गतवर्षी मार्चच्या परीक्षेपासून सिकलसेल व थॅलेसिमिया असलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात येत आहे.