शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

यंदा आंबा सामान्यांसाठी लवकर ‘गोड’ होणार

By admin | Updated: February 1, 2016 00:58 IST

गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात जानेवारी महिन्यातच ६० पेटी रत्नागिरी हापूस दाखल झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच चालू हंगामातील आंब्याची आवक सुरळीतपणे सुरू होईल,

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात जानेवारी महिन्यातच ६० पेटी रत्नागिरी हापूस दाखल झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच चालू हंगामातील आंब्याची आवक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज फळबाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून सामान्यांना सहजपणे चाखता न येणारा आंबा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यताही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.रत्नागिरी येथील पावस गावातील शेतकऱ्यांच्या ६० आंब्याच्या पेट्या फळबाजारातील व्यापारी शिवलाल भोसले यांच्याकडे रविवारी दाखल झाल्या. गेल्या २० दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात आंब्याच्या पेट्या पुण्यात दाखल होत आहेत. परंतु, जानेवारी महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंबा दाखल झाला आहे. याबाबत शिवलाल भोसले म्हणाले, की यंदा आंब्याला पोषक असणारे वातावरण आहे. अवकाळी पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळे आंब्याचा मोहर गळून पडलेला नाही. त्यामुळे जानेवारीतच ६० पेटी आंबा बाजारात दाखल झाला. एरवी मार्च-एप्रिल महिन्यात आंब्याची आवक सुरू होते. परंतु, यंदा फेब्रुवारी महिना अखेरपासूनच आवक सुरू होण्याची शक्यता आहे, असे नमूद करून भोसले म्हणाले, की पावस येथील हापूस आंबा मोठ्या आकाराचा आणि दर्जेदार आहे. सध्या चार ते सहा डझनाला २ हजार ५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. आंब्याची आवक वाढल्यामुळे पुढील काळात आंब्याचे भाव कमी होतील. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना आंब्याची चव चाखता येईल. पावस गावातील आंबा उत्पादक शेतकरी भाई शिंदे म्हणाले, की माझ्या फळबागेतील आंबा आज पुण्यात दाखल झाला. फेब्रुवारी महिन्यात आंब्याची आवक सुरळीतणे सुरू होईल, असे काही व्यापाऱ्यांना वाटत असले तरी; झाडांना उशिरा पालवी फुटल्यामुळे यंदाही आंब्याची आवक मार्च महिन्यातच सुरळीतपणे सुरू होईल. काही झाडांना लवकर मोहर आला होता,अशा काही झाडांची फळे तोडून बाजारात आणली जात आहेत.