शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

यंदा ६०० गावांत तीव्र टंचाई

By admin | Updated: March 29, 2017 03:33 IST

दमदार पावसामुळे यंदा भूगर्भाची तहान भागल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून टंचाईची तीव्रता

पुणे : दमदार पावसामुळे यंदा भूगर्भाची तहान भागल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून टंचाईची तीव्रता अत्यंत कमी जाणवेल, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालावरुन स्पष्ट  होत आहे. गेल्या वर्षीच्या सोळा  हजार गावांच्या तुलनेत यंदा ३ हजार ४९६ गावांत टंचाईची स्थिती असून त्यातील ६०० गावांमध्येच टंचाईची तीव्रता एप्रिलमध्ये अधिक जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. भूजल विभागाने राज्यातील ३ हजार ९२० विहिरींच्या पाहणीवरुन निरीक्षण नोंदविले आहे. ३५३ तालुक्यांपैकी १६६ तालुक्यांतील ३ हजार ४९६ गावांतील पातळीत १ मीटरपेक्षा अधिक घट झाली असून, त्यात १ ते २ मीटरने पाणी पातळीत घट झालेली २ हजार ५०९ गावे आहेत. तर, तीन मीटरपेक्षा पाणीपातळीत अधिक घट झालेली गावांची संख्या ३०६ इतकी आहे. पाणी पातळीत तीन मीटरपेक्षा अधिक घट झालेल्या गावांमध्ये टंचाईची झळ अधिक बसेल. त्या खालोखाल २ ते ३ मीटर घट असलेल्या गावांना पाण्याची कमतरता जाणवेल. धुळ््यात पाणी पातळीत घट धुळे जिल्ह्यात पाणी पातळीत सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील १२३, साक्री ८३, सिंदखेड ११९ आणि शिरपूरमधील १३४ गावांमधील पाणी पातळीत १ मीटरहून अधिक घट नोंदविण्यात आली आहे. पाठोपाठ औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील ९९ आणि कन्नड तालुक्यातील ९२ गावांतील पाणी पातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)