शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

यंदा ६०० गावांत तीव्र टंचाई

By admin | Updated: March 29, 2017 03:33 IST

दमदार पावसामुळे यंदा भूगर्भाची तहान भागल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून टंचाईची तीव्रता

पुणे : दमदार पावसामुळे यंदा भूगर्भाची तहान भागल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून टंचाईची तीव्रता अत्यंत कमी जाणवेल, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालावरुन स्पष्ट  होत आहे. गेल्या वर्षीच्या सोळा  हजार गावांच्या तुलनेत यंदा ३ हजार ४९६ गावांत टंचाईची स्थिती असून त्यातील ६०० गावांमध्येच टंचाईची तीव्रता एप्रिलमध्ये अधिक जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. भूजल विभागाने राज्यातील ३ हजार ९२० विहिरींच्या पाहणीवरुन निरीक्षण नोंदविले आहे. ३५३ तालुक्यांपैकी १६६ तालुक्यांतील ३ हजार ४९६ गावांतील पातळीत १ मीटरपेक्षा अधिक घट झाली असून, त्यात १ ते २ मीटरने पाणी पातळीत घट झालेली २ हजार ५०९ गावे आहेत. तर, तीन मीटरपेक्षा पाणीपातळीत अधिक घट झालेली गावांची संख्या ३०६ इतकी आहे. पाणी पातळीत तीन मीटरपेक्षा अधिक घट झालेल्या गावांमध्ये टंचाईची झळ अधिक बसेल. त्या खालोखाल २ ते ३ मीटर घट असलेल्या गावांना पाण्याची कमतरता जाणवेल. धुळ््यात पाणी पातळीत घट धुळे जिल्ह्यात पाणी पातळीत सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील १२३, साक्री ८३, सिंदखेड ११९ आणि शिरपूरमधील १३४ गावांमधील पाणी पातळीत १ मीटरहून अधिक घट नोंदविण्यात आली आहे. पाठोपाठ औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील ९९ आणि कन्नड तालुक्यातील ९२ गावांतील पाणी पातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)