शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

यंदा वारीचा मार्ग ‘निर्मल’

By admin | Updated: June 13, 2016 07:03 IST

आषाढीनिमित्त संत तुकोबाराय आणि ज्ञानोबा माउलींच्या पालख्यांमध्ये लाखो वारकरी भक्तिभावाने विठूनामाचा गजर करीत मार्गस्थ होतात.

यदु जोशी,

मुंबई- आषाढीनिमित्त संत तुकोबाराय आणि ज्ञानोबा माउलींच्या पालख्यांमध्ये लाखो वारकरी भक्तिभावाने विठूनामाचा गजर करीत मार्गस्थ होतात. या पालख्या निघून गेल्या की, उघड्यावर शौचास बसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी आणि त्यातून रोगराईदेखील पसरते. मात्र, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून राज्य शासन दोन्ही मार्गांवर ‘निर्मल वारी’ ही अनोखी योजना राबविणार आहे. तुकोबारायांच्या पालखीच्या मुक्कामाच्या १४ ठिकाणी प्रत्येकी ३००, माउलींच्या पालखी मुक्कामाच्या ११ ठिकाणी ५०० शौचालये, पंढरपूरमध्ये एक हजार, तर दोन्ही पालख्या जेथे एकत्र येतात, त्या वाखरीमध्ये ५०० शौचालये बसविण्यात येणार आहेत. तेथे जमणारा मैला जवळच्या सॉलिड ट्रिटमेंट प्लँटमध्ये नेऊन टाकला जाईल. जिथे असे प्लँट नसतील, तिथे एखाद्या शेतामध्ये खड्डा खणून वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाईल आणि त्यातून खत तयार केले जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर अलीकडेच या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानचाच हा एक भाग असेल, असे त्यांनी सांगितले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. राज्य शासन आणि पुण्यातील सेवा सहयोग ही संस्था यांचा हा संयुक्त उपक्रम असेल. देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे, सेवा सहयोगचे प्रकल्प संचालक नरेंद्र वैशंपायन, माजी खासदार प्रदीप रावत, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय, रा.स्व.संघाच्या महाराष्ट्र प्रांताचे संपर्क प्रमुख संदीप जाधव यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून हा उपक्रम साकारला आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर अशा शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.>१० हजार स्वयंसेवकांची फळीवारकऱ्यांनी या शौचालयांचाच वापर करावा, असे आवाहन प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे. कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, तसेच शौचालयांची व्यवस्था नीट व्हावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी २०० स्वयंसेवक तैनात असतील. अशा १० हजार स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लोणी व यवत येथे आणि काही दिवस पंढरपूरमध्येही प्रायोगिक तत्त्वावर या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.