शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

या वर्षी डाळींना तडका महागाईचा

By admin | Updated: December 28, 2015 07:51 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर २०१५मध्ये जून महिन्यापासून डाळींचे भाव भडकायला लागले. पहिल्या वर्षात महागाईवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आले होते.

योगेश बिडवई,  मुंबईकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर २०१५मध्ये जून महिन्यापासून डाळींचे भाव भडकायला लागले. पहिल्या वर्षात महागाईवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आले होते. मात्र, जून महिन्यापासून डाळींच्या भावात विक्रमी वाढ झाली. एक प्रकारे डाळींचा त्यातही तूरडाळीचा भडका उडाला. डिसेंबर २०१४मध्ये ६० ते ६५ रुपये किलो असलेली तूरडाळ २३० रुपयांवर गेली. उडीद, मूग, हरभरा डाळीनेही शंभरी पार केली. डाळीचे दर आटोक्यात येण्यासाठी सरकारने आटोकाट प्रयत्न केले असले, तरी अद्यापही डाळींच्या किमती नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यातच, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, डाळीची वाढती मागणी आणि घटते उत्पादन, यामुळे २०१६ मध्येदेखील डाळीचे भाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. सप्टेंबरनंतर कांद्यानेही चाळीशी पार केल्याने महागाईत भर पडली. कांदा व्यापाऱ्यांनी नफेखोरी करून, तब्बल ८ हजार कोटींची लूट केल्याचा अंदाज नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला. कांद्याचे भाव काहीसे नियंत्रणात येताच, डाळी भडकल्या. २०१४मध्ये देशात डाळींचे उत्पादन कमी झाले होते. मात्र, आयातीच्या माध्यमातून केंद्राने डाळींचे दर नियंत्रणात ठेवले होते. नोव्हेंबर २०१४मध्ये महागाई दर शून्य टक्क्यांवर म्हणजेच, गेल्या सहा वर्षांच्या नीचांकावर येऊन ठेपला होता, यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही. कडधान्याची मागणी व पुरवठा याचे भारतातील गणित कायम व्यस्त राहिले आहे. एकीकडे देशात हरित क्रांती झाली, त्यात केवळ गव्हाचे उत्पादन वाढले. मात्र, कृषी धोरणात कडधान्याच्या उत्पादन वाढीकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. सप्टेंबरमध्ये डाळींच्या भावाने उच्चांक गाठल्यानंतर केंद्र सरकारने साठेबाजांवर धाडसत्र सुरू केले. त्यानंतर राज्य सरकारनेही धाडी टाकल्या. त्यात हजारो टन डाळ जप्त झाली. ती शंभर रुपये किलोने विकण्याची घोषणाही झाली. मात्र, ती सत्यात उतरली नाही. रेशनवर डाळ देण्याचे केवळ आश्वासन वारंवार देण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, ते सर्वांनाच माहीत आहे. डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. त्यानंतर आयातही झाली. मात्र, डाळींचे दर काही उतरले नाहीत. सरकारने डाळीला क्विंटलमागे २७५ रुपये हमीभाव दिला आहे. त्यामुळे त्यांचा बाजारात पुरवठा वाढेल, अशी अपेक्षा आहे.भारतात डाळींचे १.८ ते १.९ कोटी टन उत्पादन होते. त्यामुळे देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी ३० ते ४० लाख टन मालाची आयात करावी लागते. > 1964-65साली देशाची लोकसंख्या ४७.४ होती, तर कडधान्याचे उत्पादन १२.४२ दशलक्ष टन होते. आता देशाची लोकसंख्या १२५ कोटींपेक्षा अधिक असताना, कडधान्याचे उत्पादन २० दशलक्ष टन एवढेही नाही. त्या वर्षाची स्थिती लक्षात घेतली, तर आज कडधान्याचे उत्पादन किमान ३२ दशलक्ष टन असायला हवे होते. थोडक्यात, कडधान्याच्या उत्पादनातील तूट ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.