शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

यंदा गणेशभक्तांकरिता कोकणात ८५० जादा बस

By admin | Updated: July 22, 2016 02:41 IST

कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.

पंकज रोडेकर,

ठाणे- गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत सुमारे ८५० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक३०० गाड्या बोरीवली डेपोतून सुटणार असून या बसगाड्यांचे आरक्षण महिनाऊर अगोदर घरबसल्या मोबाइल अ‍ॅपवरून करता येणार आहे. गुहागरला जाण्याकरिता आरक्षण करण्यासाठी सर्वाधिक गर्दी आहे. त्यालाच प्रवाशांची पहिली पसंती आहे.गणपती बाप्पांचे ५ सप्टेंबरला आगमन होत आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकरिता एसटीकडून गतवर्षी दीडशे बसगाड्यांचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात, तरीसुद्धा ८५ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन यंदा ठाणे विभागातील ८ डेपोंमधून ८५० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. याखेरीज, जादा बसफेऱ्या सोडण्याची शक्यताही विभागाने वर्तवली आहे. या ८ डेपोंतून ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर संगणकाद्वारे उपलब्ध करून दिले आहे. ४० दिवस अगोदर ग्रुपचे आरक्षण करता येणार आहे. त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधावा लागणार आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी खाजगी एजंटमार्फतदेखील आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली असून परतीचा प्रवास हा १० ते १५ सप्टेंबरदरम्यान असणार आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासाकरिता प्रवासाची तारीख निश्चित करून एसटी बसने प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.।मोबाइल अ‍ॅपचाही वापरपरिवहन महामंडळाने अलीकडेच लांब व मध्यम लांब पल्ला तसेच लघु पल्ला मार्गावरील फेऱ्यांच्या आगाऊ आरक्षणासाठी मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. टरफळउ टङ्मु’्रू फी२ी१५ं३्रङ्मल्ल अस्रस्र चा वापर करून वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर तत्पर सेवा मिळणार आहे. हे अ‍ॅप रेल्वेच्या धर्तीवर असल्याने नागरिकांनी त्याचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.