शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शाळांच्या सहली ‘पुस्तकाच्या गावी’

By admin | Updated: June 6, 2017 05:56 IST

शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेटच्या काळात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात यावर तोडगा काढला जाणार आहे. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून सरकारने जाहीर केलेल्या भिलारमध्ये शालेय सहली नेण्यासाठी मुख्याध्यापक संघटना पुढाकार घेणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी शालेय सहलींसाठी ऐतिहासिक स्थळांची, ज्ञान मिळेल अशा स्थळांची निवड करण्यात यावी, असा जीआर शासनाने काढला होता. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहली कुठे जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आता त्यात भिलार गावाचे नाव पुढे आहे. गेल्या काही वर्षांत शालेय सहलींच्या स्वरूपात बदल झाला होता. वॉटर पार्क, रिसॉर्ट अशा ठिकाणी सहली नेण्याचा शाळांचा कल असायचा, पण मजा-मस्ती सोडल्यास विद्यार्थ्यांना या सहलीतून काहीही शिकायला मिळत नव्हते. त्यामुळे शासनातर्फे हा जीआर काढण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने निसर्ग आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणाऱ्या महाबळेश्वरजवळील भिलार गावाची निवड ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून केली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून भिलार गावी सहली नेण्याचा विचार मुख्याध्यापकांनी मांडला आहे. पुुस्तकांच्या गावात कथा, कादंबरी, ललित लेखन, क्रीडाविषयक ज्ञान, विज्ञान, वैचारिक आणि अन्य अनेक ग्रंथ व पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, वाचकांची तिथे वाचनासह राहण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन, वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षक, शिक्षक परिषदेच्या वतीने पुढाकार घेऊन, शाळांच्या सहली भिलार येथे काढण्यासाठी शाळांमध्ये जागृती करणार असल्याचे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.पुस्तकांच्या गावाला ६ जून रोजी शिक्षक भेट देणार आहेत. मुंबईतल्या शाळांतले काही शिक्षक या भेटीत सहभागी होणार आहेत. >महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघाने पुस्तकाचे गाव याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी ‘पुस्तकाच्या गावा’वर विशेषांकही काढला आहे. लवकरच या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.