शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

यंदा शाळांच्या सहली ‘पुस्तकाच्या गावी’

By admin | Updated: June 6, 2017 05:56 IST

शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेटच्या काळात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात यावर तोडगा काढला जाणार आहे. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून सरकारने जाहीर केलेल्या भिलारमध्ये शालेय सहली नेण्यासाठी मुख्याध्यापक संघटना पुढाकार घेणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी शालेय सहलींसाठी ऐतिहासिक स्थळांची, ज्ञान मिळेल अशा स्थळांची निवड करण्यात यावी, असा जीआर शासनाने काढला होता. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहली कुठे जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आता त्यात भिलार गावाचे नाव पुढे आहे. गेल्या काही वर्षांत शालेय सहलींच्या स्वरूपात बदल झाला होता. वॉटर पार्क, रिसॉर्ट अशा ठिकाणी सहली नेण्याचा शाळांचा कल असायचा, पण मजा-मस्ती सोडल्यास विद्यार्थ्यांना या सहलीतून काहीही शिकायला मिळत नव्हते. त्यामुळे शासनातर्फे हा जीआर काढण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने निसर्ग आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणाऱ्या महाबळेश्वरजवळील भिलार गावाची निवड ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून केली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून भिलार गावी सहली नेण्याचा विचार मुख्याध्यापकांनी मांडला आहे. पुुस्तकांच्या गावात कथा, कादंबरी, ललित लेखन, क्रीडाविषयक ज्ञान, विज्ञान, वैचारिक आणि अन्य अनेक ग्रंथ व पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, वाचकांची तिथे वाचनासह राहण्याची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन, वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षक, शिक्षक परिषदेच्या वतीने पुढाकार घेऊन, शाळांच्या सहली भिलार येथे काढण्यासाठी शाळांमध्ये जागृती करणार असल्याचे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.पुस्तकांच्या गावाला ६ जून रोजी शिक्षक भेट देणार आहेत. मुंबईतल्या शाळांतले काही शिक्षक या भेटीत सहभागी होणार आहेत. >महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघाने पुस्तकाचे गाव याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी ‘पुस्तकाच्या गावा’वर विशेषांकही काढला आहे. लवकरच या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.