शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

यंदा ‘कट आॅफ’ घसरला

By admin | Updated: July 12, 2017 05:01 IST

गेल्या काही वर्षांच्या परंपरेनुसार, यंदाही अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही वर्षांच्या परंपरेनुसार, यंदाही अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने नव्वदी पार केली आहे. सोमवारी रात्री उशिराने जाहीर झालेल्या अकरावीच्या पहिल्या यादीत नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ हा नव्वद टक्क्यांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदाचा कटआॅफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते तीन टक्क्यांनी घसरला. अकरावीच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत दीड लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतिक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, सोमवारी सायंकाळी ५ वाजता पहिली यादी जाहीर होणार होती. पण नायसा कंपनीने दुपारपासून काम सुरू करूनही ते वेळेत पूर्ण केले नाही. डेटा अपलोड झाला नसल्याने शेवटी रात्री १ वाजता आॅनलाइन यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकरावी प्रवेशासाठी तब्बल २ लाख ३६ हजार १४३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. यापैकी पहिल्या यादीत १ लाख ५६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. काही नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ ९४ टक्के इतका आहे. यंदा तिन्ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने कटआॅफचा नवीन उच्चांक स्थापित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण तसे झाल्याचे दिसून आले नाही. अनेक विद्यार्थ्यांनी रुईया, झेविअर्स, एन.एम.सारख्या महाविद्यालयांना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. एकीकडे पहिल्या यादीत प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक असणाऱ्या ७५ ते ८० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही पहिल्या यादीत क्रमांक लागला आहे. यंदा कोट्यातील जागांवर थेट झालेले प्रवेश, एसएससी निकालात ९० हून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची कमी झालेली संख्या याचा परिणाम यादीवर झाला. >विद्यार्थ्यांनी रात्र जागून काढली : दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांचे १० जुलैला सायंकाळी जाहीर होणाऱ्या पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले होते. सोमवारी सायंकाळपासून विद्यार्थी आणि पालक यादीकडे डोळे लावून बसले होते. दुपारपासून कंपनीने डेटा अपलोड करण्याचे काम सुरू केले. पण डेटा अपलोड होत नव्हता. त्यामुळे अखेर रात्री साडेबारानंतर सर्व डेटा अपलोड करण्यात कंपनीला यश आल्यानंतर रात्री १ वाजता पहिली यादी जाहीर झाली. >५३ हजार जणांना मिळाली पहिली पसंतीपहिल्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ हजार ८०३ इतकी आहे. तर दुसरा पसंतिक्रम दिलेले महाविद्यालय २५ हजार ९५० विद्यार्थ्यांना मिळाले. तिसऱ्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय १८ हजार २९२ आणि चौथ्या पसंतिक्रमाचे महाविद्यालय १४ हजार ३१२, तर पाचव्या क्रमांकाचे पसंतिक्रमाचे महाविद्यालय ११ हजार ८८७ विद्यार्थ्यांना मिळाले आहे.शाखानिहाय विद्यार्थीकला - १५,९१२विज्ञान - ४७,४२७वाणिज्य - ९२,०८३एमसीव्हीसी - १,०८५ (द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी)एकूण - १,५६,५०७कोटा प्रवेश व्यवस्थापन - १,५३१इनहाउस - ११,२९९अल्पसंख्याक - १९,५७४एमसीव्हीसी - ७३एकूण कोटा प्रवेश - ३२,४७७महाविद्यालयांमधील शाखानिहाय पहिली यादीकला महाविद्यालय कटआॅफसेंट झेवियर्स ९४ रामनिवास रुईया९०.६जय हिंद ८९.८वझे - केळकर ८३.८मिठीबाई ८३.८रूपारेल ८२.८विल्सन ७८.२बिर्ला ७७.६वाणिज्यमहाविद्यालय कटआॅफएच.आर. ९१.४जोशी-बेडेकर९०.४०वझे - केळकर ८९.६जय हिंद ८९.४केसी८८.८०एम. एल. डहाणूकर ८८.४रूपारेल ८७.५७साठे८६.२विज्ञानमहाविद्यालय कटआॅफरामनिवास रुईया९२.८०वझे- केळकर ९२.६बांदोडकर९२.४रुपारेल ९१.२ सेंट झेवियर्स ८९.८के.सी.८५.४०मिठीबाई ८५.१७जयहिंद ८४.६