शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या वर्षी ६० हजार शौचालये बांधण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 20:48 IST

जिल्ह्यात शौचालये बांधण्याचे प्रमाण वाढू लागले आहे़ जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून ही मोहिम पुढे रेटली आहे़

राजेंद्र अहिरे: संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार- शिवाजी सुरवसे सोलापूर, दि. ५ : जिल्ह्यात शौचालये बांधण्याचे प्रमाण वाढू लागले आहे़ जिल्हा परिषदेतील स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून ही मोहिम पुढे रेटली आहे़ गतवर्षी ३३ हजार ८४२ शौचायले बांधलेल्या सोलापूर जिल्ह्याने यंदाच्या वर्षी ६० हजार ७१३ शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे़ त्यामुळे येत्या दोन वर्षात संपूर्ण सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त होईल असा विश्वास जि़प़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता कक्ष) राजेंद्र अहिरे यांनी ह्यलोकमतह्ण ला सांगितले़प्रश्न: बेसलाईन सर्व्हेमधील आकडेवारी आणि सध्याची शौचालयाची परिस्थिती याबाबत काय सांगाल ?-शौचायल बांधण्याची चळवळ जिल्ह्यात रुजू होत आहे़ २०१२ साली केलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्ह्यात पाच लाख ६४५७ कुटूंबे होती़ त्यापैकी २ ला ९१ हजार ९९ कुटूंबांकडे वैयक्तिक शौचालये नव्हती़ सध्याची आकडेवारी पाहिली तर यामध्ये निश्चित चांगला बदल दिसेल़ सध्या गेल्या चार वर्षात सुमारे ८० हजार शौचालये बांधली आहेत़प्रश्न: यंदाच्या वर्षी किती शौचायले बांधणार आहात त्यासाठी काय नियोजन केले आहे ?-सन २०१६-१७ या वर्षात ६० हजार ७१३ वैयक्तिक शौचायले बांधण्याचे नियोजन केले आहे़ गतवर्षातील १३ हजार शौचालयांचे कामे सुरू आहेत तर निर्मलग्राम झालेल्या गावांत १६ हजार शौचायले बांधावयाची आहेत त्यामुळे तसा विचार केला तर या वर्षभरात आम्हाला सुमारे ९० हजार शौचालये बांधावयाची आहेत़प्रश्न: शौचालये बांधणाऱ्यांना वेळेवर अनुदान दिले जात नाही अशा तक्रारी आहेत ?-तसे काही नाही़ काही ठिकाणी बँकांच्या चुका असल्यामुळे वेळ होतो़ जिथे तक्रारी असतील तिथल्या बँका आम्ही बदलून देत आहेत़ ग्रामसेवक, गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत सिईओ यांनी देखील सूचना दिल्या आहेत़ शौचालये बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २२ कोटी मिळाले आहेत़ आम्ही केंद्राकडे ८० कोटींची मागणी केली आहे़ प्रश्न: सोलापूर जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त कधी होईल ?-अद्याप २ ला १८ हजार ६१९ जणांकडे शौचालये नाहीत़ यंदाच्या वर्षी ९० हजार शौचालये बांधण्याचे नियोजन आहे़ त्यामुळे हागणदारीमुक्त गाव कृती आराखडा तयार केला आहे़ त्यानुसार संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे़ सिईओ डोंगरे यांनी देखील जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यामुळे यावर्षी निम्मा जिल्हा हागणदारीमुक्त होईल उर्वरीत येत्या दीड ते दोन वर्षात संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त केला जाईल़ यंदाच्या वर्षी बांधावयाची शौचालये कंसात शौचालये नसलेले कुटूंबे-अक्कलकोट -३३७७ (१९६८८)-बार्शी-४७७९ (२८२४८)-करमाळा-४४४२ (२१५४९)-माढा-४६२५ (२७०५८)-माळशिरस-४७१२ (४६८२९)-मंगळवेढा- ३१३१ (१६५६६)-मोहोळ-३७४८ (२९८२६)-पंढरपूर-१९१९२ (३५०६७)-सांगोला-५३९४ (३३०२०)-उत्तर सोलापूर-४२६७ (१३८७९)-दक्षिण सोलापूर-३०४६ (१५९४०)एकूण ६०७१३ (२८७६७०)