शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

दुष्काळावर मात करणार यवतमाळचा ‘विश्वासनगर’ पॅटर्न

By admin | Updated: August 18, 2014 00:29 IST

अपुऱ्या पावसाने राज्यातील १२३ तालुके दुष्काळाच्या छायेत सापडले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी उपाय योजना जाहीर तर झाल्यात पण त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून यवतमाळात विश्वासनगर

मोकळ्या जागेवर पुनर्भरण : ‘पाणी साठवा, गाव वाचवा अभियान’ रूपेश उत्तरवार - यवतमाळ अपुऱ्या पावसाने राज्यातील १२३ तालुके दुष्काळाच्या छायेत सापडले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी उपाय योजना जाहीर तर झाल्यात पण त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून यवतमाळात विश्वासनगर पॅटर्नचा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा परिषदेने ‘पाणी वाचवा, गाव वाचवा’ अभियान हाती घेतले आहे. या प्रयोगाची देशभरात अंमलबजावणी व्हावी म्हणून या प्रकल्पाचा प्रस्ताव येथील विवेकानंद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ.नितीन खर्चे यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. यवतमाळातील विश्वासनगराच्या खुल्या जागेवर जलसंधारणाचा प्रयोग राबविण्यात आला. पूर्वी हा भाग पाणी टंचाईचा भाग म्हणून ओळखला जायचा. या प्रयोगाने या भागाच्या जलस्त्रोतात मोठी वाढ झाली. त्यामुळे या भागाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली. या प्रयोगाची माहिती घेतली आणि जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्वावर काही गावांमध्ये तो राबविला जाणार आहे. यवतमाळातील मनिहार ले-आऊटमधून या प्रयोगाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रयोग टंचाईग्रस्त भागात राबविला जाणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रयोगाला मान्यता दिली होती. आता नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल हा प्रयोग राबविण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्हा परिषद प्रशासन ‘पाणी साठवा पाणी वाचवा’ अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने तयारी केली आहे.