शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:03 IST

१७२५ शेतकऱ्यांची नोंदणी; २ हजार हेक्टरवर होणार तुतीची लागवड

- रुपेश उत्तरवार यवतमाळ : कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आता रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी होत आहे. शासनाने या जिल्ह्यात ५०० हेक्टरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असताना २ हजार हेक्टरवर लागवडीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. अन्य जिल्ह्यात लागवडीचे प्रमाण केवळ १०० ते १५० हेक्टर आहे. त्यामुळे रेशीम शेतीत यवतमाळ अव्वल ठरले आहे.गुलाबी बोंडअळीने राज्यात कपाशीचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशीला पर्याय म्हणून शेतकºयांनी रेशीम लागवडीचा प्रयोग सुरू केला आहे. दोन हजार हेक्टरवर रेशीम (तुती) लागवडीसाठी शेतकºयांनी अर्ज केले आहे. तर १७२५ शेतकºयांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशनही केले आहे. ६५० हेक्टरवर लागवड आटोपली आहे. सप्टेंबरपर्यंत उर्वरित क्षेत्रात लागवड होणार आहे.रेशीम विक्रीचे केंद्र हैदराबाद अथवा बंगळुरू या ठिकाणीच आहे. यामुळे रेशीम लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी आहे. यवतमाळ शहरात हे केंद्र उभे राहिल्यास लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता जात असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम कोषाचा दर क्विंटलला ३५ हजार रुपये आहे.एका एकरात दीड क्विंटल उत्पन्न मिळते. वर्षभरात चार वेळा पीक घेता येते. यातून चार ते पाच क्विंटल उत्पन्न मिळते. सध्याच्या दरानुसार हे उत्पन्न दोन लाखांच्या घरात जाते.६५० हेक्टरवर लागवड आटोपली. त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ