शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

‘लोकमत’चे यदु जोशी रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:44 IST

पत्रकारिता समाजाचा आरसा असून, त्यात खूप मोठी विश्वासार्हता आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना चुकीचे असेल तर लिहिलेच पाहिजे; मात्र स्पर्धेच्या घाईत कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.

सोलापूर : पत्रकारिता समाजाचा आरसा असून, त्यात खूप मोठी विश्वासार्हता आहे. पत्रकारांनी पत्रकारिता करताना चुकीचे असेल तर लिहिलेच पाहिजे; मात्र स्पर्धेच्या घाईत कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकमतचे विशेष प्रतिनिधी (मुंबई) यदू जोशी यांना पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने तर ज्येष्ठ पत्रकार संजय पाठक यांना स्व. बाबूराव जक्कल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी तावडे बोलत होते. हिराचंद नेमचंद येथील अ‍ॅम्फी थिएटर येथे झालेल्या सोहळ्यास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते.पत्रकारिता ही एक मोठी जबाबदारी आहे. पत्रकारिता हे एक स्वीकारलेले व्रत असून, समाजव्यवस्थेवर प्रहार करताना सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे. ज्या बातमीत तथ्य आहे ती देऊन चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढला पाहिजे. प्रामाणिक पत्रकारांची संख्या वाढली पाहिजे. शासन अनेक चांगल्या गोष्टी राबवत आहे, त्या समाजासमोर आणल्यास चांगल्या भावना निर्माण होतील. सकारात्मक बातम्या सर्वसामान्य जनतेचा आत्मविश्वास वाढवतात, असेही तावडे यांनी सांगितले.