शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

इंग्रजांनी लिहिलेला इतिहास चुकीचा

By admin | Updated: January 7, 2017 01:10 IST

इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले

वाघोली : अठरापगड जाती असलेल्या मराठ्यांच्या कर्तबगारीचा इतिहास जगाला कळू नये म्हणून इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले, असे प्रतिपादन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘१८व्या शतकातील मराठी सत्तेचा विस्तार’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मोरे बोलत होते. सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज रामचंद्र जाधवराव, प्राचार्य नंदकुमार निकम, शांतीलाल बोरा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य किशोर देसरडा, इतिहास विभागप्रमुख भूषण फडतरे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले की, अठरावे शतक हे पूर्णपणे मराठ्यांच्या कर्तबगारीचे होते. मात्र, याची दखल कोणीही घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर अठरापगड जाती असलेला मराठा समाज चवताळून निघाला होता. चोवीस तास लढाई करून मराठ्यांनी दक्षिण प्रांताबरोबरच उत्तरेकडील तख्तदेखील काबीज केले. या काळामध्ये मराठा समाजाची दहशत मुघलांमध्ये निर्माण झाली होती.’’ते म्हणाले, ‘व्यवसाय करण्यासाठी अनेक समाजातील नागरिक स्थलांतर करीत असतात. परंतु इतर राज्य काबीज करून चालविण्यासाठी जाणारे एकमेव मराठे होते. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना सर्वाधिक धोका मराठ्यांकडून होता. त्यामुळे मराठे स्वकीयांची कशा प्रकारे पिळवणूक करीत आहे याचे चित्र मांडले. स्वत:च्या फायद्यासाठी इंग्रजांनी केलेल्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठ्यांची बदनामी होत आहे. मराठे स्वकियांशी लढले अशी परिस्थिती दाखवीत असताना मराठे स्वकियांशी का लढले, याचे कारण मात्र अधांतरीत ठेवण्यात येते. सूत्रसंचालन सहदेव चव्हाण यांनी केले. आभार रूपाली गुलालकारी यांनी मानले.>शासनाची १२ लाखांची मदतइंग्रजानंतर भारतातील इतिहासकरांनी इतिहास लिहिला. परंतु समग्र मराठा इतिहास लिहिण्याऐवजी विशिष्ट जातीवर इतिहास लिहिले गेले. त्यामुळे समग्र मराठा इतिहास आजही लिहिला गेला नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा इतिहास लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १२ लाखांची मदत केली असल्याचे सदानंद मोरे यांनी सांगितले. प्राचार्य नंदकुमार निकम म्हणाले की, पानिपतमध्ये मराठे हरले हे दाखविले जाते. परंतु मराठे कशा प्रकारे लढले, याची माहिती सांगितली जात नाही. मराठा उदात्तीकरण करण्यापेक्षा विश्लेषण करण्याची गरज आहे.‘कर्नाटकात मराठी साम्राज्याचा विस्तार’ या विषयावर श्रीकांत रणदिवे यांनी, तर ‘पानिपतची मोहीम’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. नामदेवराव ढाले यांनी शोधनिबंधाचे वाचन केले.