शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

इंग्रजांनी लिहिलेला इतिहास चुकीचा

By admin | Updated: January 7, 2017 01:10 IST

इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले

वाघोली : अठरापगड जाती असलेल्या मराठ्यांच्या कर्तबगारीचा इतिहास जगाला कळू नये म्हणून इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले, असे प्रतिपादन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘१८व्या शतकातील मराठी सत्तेचा विस्तार’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मोरे बोलत होते. सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज रामचंद्र जाधवराव, प्राचार्य नंदकुमार निकम, शांतीलाल बोरा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य किशोर देसरडा, इतिहास विभागप्रमुख भूषण फडतरे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले की, अठरावे शतक हे पूर्णपणे मराठ्यांच्या कर्तबगारीचे होते. मात्र, याची दखल कोणीही घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर अठरापगड जाती असलेला मराठा समाज चवताळून निघाला होता. चोवीस तास लढाई करून मराठ्यांनी दक्षिण प्रांताबरोबरच उत्तरेकडील तख्तदेखील काबीज केले. या काळामध्ये मराठा समाजाची दहशत मुघलांमध्ये निर्माण झाली होती.’’ते म्हणाले, ‘व्यवसाय करण्यासाठी अनेक समाजातील नागरिक स्थलांतर करीत असतात. परंतु इतर राज्य काबीज करून चालविण्यासाठी जाणारे एकमेव मराठे होते. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना सर्वाधिक धोका मराठ्यांकडून होता. त्यामुळे मराठे स्वकीयांची कशा प्रकारे पिळवणूक करीत आहे याचे चित्र मांडले. स्वत:च्या फायद्यासाठी इंग्रजांनी केलेल्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठ्यांची बदनामी होत आहे. मराठे स्वकियांशी लढले अशी परिस्थिती दाखवीत असताना मराठे स्वकियांशी का लढले, याचे कारण मात्र अधांतरीत ठेवण्यात येते. सूत्रसंचालन सहदेव चव्हाण यांनी केले. आभार रूपाली गुलालकारी यांनी मानले.>शासनाची १२ लाखांची मदतइंग्रजानंतर भारतातील इतिहासकरांनी इतिहास लिहिला. परंतु समग्र मराठा इतिहास लिहिण्याऐवजी विशिष्ट जातीवर इतिहास लिहिले गेले. त्यामुळे समग्र मराठा इतिहास आजही लिहिला गेला नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा इतिहास लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १२ लाखांची मदत केली असल्याचे सदानंद मोरे यांनी सांगितले. प्राचार्य नंदकुमार निकम म्हणाले की, पानिपतमध्ये मराठे हरले हे दाखविले जाते. परंतु मराठे कशा प्रकारे लढले, याची माहिती सांगितली जात नाही. मराठा उदात्तीकरण करण्यापेक्षा विश्लेषण करण्याची गरज आहे.‘कर्नाटकात मराठी साम्राज्याचा विस्तार’ या विषयावर श्रीकांत रणदिवे यांनी, तर ‘पानिपतची मोहीम’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. नामदेवराव ढाले यांनी शोधनिबंधाचे वाचन केले.