शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

इंग्रजांनी लिहिलेला इतिहास चुकीचा

By admin | Updated: January 7, 2017 01:10 IST

इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले

वाघोली : अठरापगड जाती असलेल्या मराठ्यांच्या कर्तबगारीचा इतिहास जगाला कळू नये म्हणून इंग्रजांनी स्वत:च्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास लिहून मराठ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले, असे प्रतिपादन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘१८व्या शतकातील मराठी सत्तेचा विस्तार’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मोरे बोलत होते. सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज रामचंद्र जाधवराव, प्राचार्य नंदकुमार निकम, शांतीलाल बोरा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य किशोर देसरडा, इतिहास विभागप्रमुख भूषण फडतरे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले की, अठरावे शतक हे पूर्णपणे मराठ्यांच्या कर्तबगारीचे होते. मात्र, याची दखल कोणीही घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर अठरापगड जाती असलेला मराठा समाज चवताळून निघाला होता. चोवीस तास लढाई करून मराठ्यांनी दक्षिण प्रांताबरोबरच उत्तरेकडील तख्तदेखील काबीज केले. या काळामध्ये मराठा समाजाची दहशत मुघलांमध्ये निर्माण झाली होती.’’ते म्हणाले, ‘व्यवसाय करण्यासाठी अनेक समाजातील नागरिक स्थलांतर करीत असतात. परंतु इतर राज्य काबीज करून चालविण्यासाठी जाणारे एकमेव मराठे होते. इंग्रजांनी भारतात पाय रोवण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना सर्वाधिक धोका मराठ्यांकडून होता. त्यामुळे मराठे स्वकीयांची कशा प्रकारे पिळवणूक करीत आहे याचे चित्र मांडले. स्वत:च्या फायद्यासाठी इंग्रजांनी केलेल्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठ्यांची बदनामी होत आहे. मराठे स्वकियांशी लढले अशी परिस्थिती दाखवीत असताना मराठे स्वकियांशी का लढले, याचे कारण मात्र अधांतरीत ठेवण्यात येते. सूत्रसंचालन सहदेव चव्हाण यांनी केले. आभार रूपाली गुलालकारी यांनी मानले.>शासनाची १२ लाखांची मदतइंग्रजानंतर भारतातील इतिहासकरांनी इतिहास लिहिला. परंतु समग्र मराठा इतिहास लिहिण्याऐवजी विशिष्ट जातीवर इतिहास लिहिले गेले. त्यामुळे समग्र मराठा इतिहास आजही लिहिला गेला नाही. महाराष्ट्राबाहेरील मराठा इतिहास लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १२ लाखांची मदत केली असल्याचे सदानंद मोरे यांनी सांगितले. प्राचार्य नंदकुमार निकम म्हणाले की, पानिपतमध्ये मराठे हरले हे दाखविले जाते. परंतु मराठे कशा प्रकारे लढले, याची माहिती सांगितली जात नाही. मराठा उदात्तीकरण करण्यापेक्षा विश्लेषण करण्याची गरज आहे.‘कर्नाटकात मराठी साम्राज्याचा विस्तार’ या विषयावर श्रीकांत रणदिवे यांनी, तर ‘पानिपतची मोहीम’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. नामदेवराव ढाले यांनी शोधनिबंधाचे वाचन केले.