शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

किल्ल्यांवर नावे कोरणे चुकीचे

By admin | Updated: May 16, 2016 03:16 IST

प्रेमीयुगुलांकडून गड-किल्ल्यांवर नावे कोरली जाणे हा प्रकार दुदैवी

नवी मुंबई : प्रेमीयुगुलांकडून गड-किल्ल्यांवर नावे कोरली जाणे हा प्रकार दुदैवी असून अशा प्रकाराला सडेतोड उत्तर देण्याची गरज हिंदू जनजागृती समितीचे वक्ते सुमित सागवेकर यांनी व्यक्त केली आहे. गडसंवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने तसे कृत्य करणाऱ्यांना थांबवले जाण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. एपीएमसी येथे धर्मवीर संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्ताने तुर्भे येथे आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित होते.धर्मवीर संभाजी राजे उत्सव मंडळाच्या वतीने एपीएमसी येथे धर्मवीर संभाजी राजे यांची ३५९ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित महापौर सुधाकर सोनवणे यांनी संभाजीराजांचा इतिहास शाळांमधून पहिलीपासूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची गरज व्यक्त केली. तर हिंदू जनजागृती समितीचे वक्ते सुमित सागवेकर यांनी गड- किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज व्यक्त केली. सध्याचे तरुण-तरुणी जोडीने पर्यटनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांच्या ठिकाणी जातात. मात्र तिथे गेल्यावर ऐतिहासिक वास्तूंवर दगडाने कोरून अथवा रंगाने स्वत:ची नावे लिहिण्याचा लज्जास्पद प्रकार करतात. ज्यांनी गड-किल्ले उभारले, त्याचे संवर्धन केले अशांनी कधी स्वत:ची नावे लिहिली नाहीत. परंतु सध्याचा तरुणवर्ग असा प्रकार करत असल्याने त्यांना अडवून सडेतोड उत्तर देण्याची गरज सागवेकर यांनी व्यक्त केली. असाच प्रकार सणांच्या बाबतीत होत असून काही जण हिंदू सणांचा वेगळ्या घटनांशी संबंध जोडून अपप्रचार करण्याचे काम करीत आहेत. मात्र संस्कृतीला गालबोट लागेल असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचाही इशारा त्यांनी तुर्भे येथे कार्यक्रमात दिला. याप्रसंगी क्रीडा समिती सभापती प्रकाश मोरे, सोपान मेहेर, गणेश म्हांगरे, शंकर पिंगळे, विलास ताजणे, गणेश पावगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)