शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

शस्त्रांचे ‘ते’ ७३ घाव

By admin | Updated: November 11, 2014 01:14 IST

एकनाथ दुर्योधन चव्हाण (४२), सुमेध सुरेश करवाडे (३५), दिलीप महादेव शेंडे (४२), पंकज सुधाकर भगत (३६), सविता जितेंद्र वंजारी (३६), भागिरथा हरिचंद्र अडकिणे (६०), लीलाबाई रघुनाथ सांगोळे

१३ आॅगस्ट २००४ रोजी घडली होती घटना नागपूर : एकनाथ दुर्योधन चव्हाण (४२), सुमेध सुरेश करवाडे (३५), दिलीप महादेव शेंडे (४२), पंकज सुधाकर भगत (३६), सविता जितेंद्र वंजारी (३६), भागिरथा हरिचंद्र अडकिणे (६०), लीलाबाई रघुनाथ सांगोळे (५५), नितेश सीताराम मेश्राम (३१), मनीष शंकरराव लाबडे (३३), अ‍ॅड. विलास श्रीराम भांडे (४४), ईश्वर हरिचंद्र अडकिणे (४०), पिंकी अजय शंभरकर (३३), नीलेश सुखदेव हुमणे (३२), रितेश सुखदेव हुमणे (३५), राजेश चंद्रभान घोंगडे (४०), उषा मधुकर नारायणे (३६), विजय मयूर शिंदे (३५) आणि राजेश दत्तू उरकुडे, अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे असून ते सर्व कस्तुरबानगर येथील रहिवासी आहेत. अजय सुदाम मोहोड, अंजना किसन बोरकर आणि देवांगना सुखदेव हुमणे, अशी निधन झालेल्या आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षानुसार तब्बल दहा वर्षांपूर्वी १३ आॅगस्ट २००४ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमध्ये चालणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव या ३२ वर्षीय खतरनाक गुंडाचा संतप्त जमावाने डोळ्यात मिरची पावडर झोकून, चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून निर्घृण खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर जमावाने अक्कूचे घर जाळून टाकले होते. कस्तुरबानगर आणि परिसराला आपल्या गुन्हेगारी कृत्याने वेठीस धरणारा अक्कू हा १९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली, अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. १९९९ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा व घातक व्यक्ती विघातक कृत्य (एमपीडीए) या कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. बलात्कार आणि छेडखानीची अनेक प्रकरणे त्याच्या दहशतीमुळे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. तडीपार असतानाही तो कायदा मोडून मोहल्ल्यात यायचा आणि गुंडागर्दी करायचा. तक्रारीनंतरही पोलीस त्याला अटक करीत नव्हते. डोळ्यात मिरची पावडर झोकून केला होता खात्मा हिंमत करून अक्कूविरुद्ध तक्रार अ‍ॅड. विलास भांडे यांनी हिंमत करून अक्कूविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. परंतु पोलीस गुन्हा दाखल करीत नव्हते. त्यामुळे त्यांनी पत्रपरिषद घेतली होती. त्याची गुंडागर्दी चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत दहशत माजवणाऱ्या अक्कूला अटक केली होती. प्रारंभी सदर पोलिसांनी ७ आॅगस्ट २००४ रोजी अटक करून त्याला जरीपटका पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु त्याचा एक साथीदार बिपीन बालाघाटी हा अक्कूला जेवणाच्या डब्यात चाकू देताना पकडल्या गेल्याने त्याला पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्याला १० आॅगस्ट रोजी न्यायालयात आणण्यात आले होते. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली होती. याच दिवशी त्याचा खून करण्यासाठी जमाव आला होता. परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्यामुळे घटना टळली होती.कुख्यात डंगऱ्या आहे कुठे?अक्कू यादव याचा पुतण्या कुख्यात विजय ऊर्फ डंगऱ्या यादव हल्ली आहे कुठे, असा प्रश्न व्यक्त केल्या जात आहे. डंगऱ्या हा अक्कूपेक्षाही क्रूर होता. त्याच्याच बळावर अक्कूची गुंडागर्दी चालत होती. तो लुटमारी आणि बलात्कारासारखे गुन्हे करायचा. लुटमारीतून बऱ्याच जणांचा खून करून त्याने त्यांना रेल्वेखाली झोकले. त्यामुळे त्याचे हे गंभीर गुन्हे कधीही चव्हाट्यावर आलेच नाहीत. त्यावेळी जरीपटका पोलिसही रेल्वेने कटलेल्या मृतदेहांचीही गंभीर दखल घेत नव्हते. या क्रूरकर्म्यांच्या कृत्याने कस्तुरबानगरातील १८ ते २० कुटुंबांनी आपले घर सोडले होते. हे दोघे कस्तुरबानगरामागील एनआयटीच्या गाळ्यांमध्ये महिला व तरुणींना नेऊन बलात्कार करायचे. कस्तुरबानगर येथील त्रस्त नागरिकांची आधी क्रूरकर्म्या डंगऱ्याचा गेम करण्याची योजना होती. परंतु अखेरपर्यंत तो त्यांच्या हाती लागला नाही. अक्कूच्या खुनानंतर तो कधीही कस्तुरबानगरात फिरकला नाही. चोख पोलीस बंदोबस्तअनुचित घटना टाळण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. न्यायालयात येणाऱ्यांची कसून तपासणी केली जात होती. संशयास्पद व्यक्तींना आत जाण्यास मनाई केली जात होती. रस्त्यावर मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. प्रत्येकाला मेटल डिटेक्टरमधून जाणे बंधनकारक होते. पोलीस थोड्या-थोड्या वेळाने परिसरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत होते. मुख्य प्रवेशदारावरही मोठ्या संख्येत पोलीस तैनात होते.