शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

इतिहासातील सर्वात खराब कामगिरी

By admin | Updated: October 20, 2014 05:26 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. गेल्यावेळी ८२ जागा जिंकलेल्या प्रमुख सत्तारूढ पक्षाला ४२ जागांवर समाधान मानावे लागले

यदु जोशी, मुंबईविधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. गेल्यावेळी ८२ जागा जिंकलेल्या प्रमुख सत्तारूढ पक्षाला ४२ जागांवर समाधान मानावे लागले. राज्याच्या इतिहासात काँग्रेसची ही नीचांकी कामगिरी आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्षाने ही निवडणूक लढविली होती. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पावणेचार वर्षांत केलेली कामगिरी, घेतलेले निर्णय आणि जपलेली स्वच्छ प्रतिमा या भरवशावर काँग्रेस मैदानात उतरली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे पुत्रप्रेमामुळे यवतमाळमध्ये तळ ठोकून असल्यासारखे होते. निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला तो लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर दिला असता, तर काँग्रेसला पोषक ठरले असते. पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे हे एकत्रितपणे वा परस्पर समन्वयातून प्रचार करीत असल्याचे कुठेही दिसले नाही. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभाही कमीच झाल्या. प्रचार समितीचा आमच्याशी कुठलाही समन्वय नाही, अशी कुरबुर काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दररोज सुरू होती.