शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फूर्तीदायी स्मृतींना वंदन

By admin | Updated: February 26, 2016 15:10 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, प्रकाण्ड पंडित, कायदेतज्ज्ञ, हिंदु धर्मसुधारक, भाषा शुद्धिकरण मोहिमेचे प्रणेते, साहित्यिक, नाटककार विनायक दामोदर सावरकर यांच्या प्राणार्पणाला आज ५० वर्षे झाली

भारत कुमार राऊत
 
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, प्रकाण्ड पंडित, कायदेतज्ज्ञ, हिंदु धर्मसुधारक, भाषा शुद्धिकरण मोहिमेचे प्रणेते, साहित्यिक, नाटककार विनायक दामोदर सावरकर यांच्या प्राणार्पणाला आज ५० वर्षे झाली. त्यांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना वंदन !
ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याचे त्यांनी केवळ स्वप्न पाहिले नाही, तर तसे प्रयत्नही चालू केले. लंडनमध्येच राहून त्यांनी समविचारी क्रांतिकारक तरुणांचा 'मित्रमेळा' स्थापन केला व क्रांतीकार्य चालवले. 
त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. त्यांना कडक बंदोबस्तात जहाजाने फ्रान्सला नेण्यात येत असता मोठ्या शिताफीने ते निसटले व  पोहोत फ्रान्सच्या किनाऱ्याला पोहोचले. तिथे ते दुर्दैवाने ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागले.
त्यांना अंदमानला ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तिथल्या सेल्युलर जेलमध्ये त्यांनी कठोर कारावास भोगला. अखेर राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर त्यांची मुक्तता झाली.
 
 
भगूर येथील सावरकर स्मारक
 
भारतात परतल्यावर रत्नागिरीत त्यांनी समाज सुधारणेचे कार्य आरंभले. समाजातील स्पृश्यास्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी त्यांनी पतितपावन चळवळ सुरू केली. तिथेच त्यांनी भाषाशुद्धी मोहिमही हाती घेतली.
मराठी भाषेत दैनंदिन वापरासाठी त्यांनी अनेक शब्द दिले. मंत्रालय, महापौर, फलंदाज, गोलंदाज आदी शब्द त्यांचेच.
लंडन, अंदमान व नंतरही सावरकरांनी अनेक देशभक्तीपर साहित्यकृती निर्माण केल्या. अंदमानला कैद्यांकडून ते उर्दू भाषा व लिपी शिकले व त्यांनी उर्दूत गझल रचनाही केल्या. सन्यस्त खड्ग सारखी त्यांची नाटके व त्यातील पदे आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
वैज्ञानिक दृष्टीने धर्माकडे पाहताना त्यांनी मांडलेले अनेक विचार वादग्रस्त ठरले. गाय हा उपयुक्त पशु आहे; हिंदू तरुणांनी ब्रिटिश सैन्यात दाखल व्हावे, या सारख्या त्यांच्या विधानांमुळे त्यांच्याविषयी गैरसमजच अधिक झाले.
सावरकरांनी हिंदु महासभेच्या कार्याशी नाते जोडले. असे वीर सावरकर. १९६६ मध्ये त्यांना वाटू लागले की यापुढे जगण्यात अर्थ नाही. त्यांनी प्रयोपवेशन सुरू केले व अखेर २६ फेब्रुवारी १९६६ ला देह ठेवला. आपल्या कार्याने, त्यागाने व प्रतिभेने वीर सावरकर अमर झाले.
 
 
खासदार पूनम महाजन यांनी फेसबुकच्या माध्यमातून सावरकरांनी आदरांजली वाहिली.