शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

काळजी वाटते कारण...

By admin | Updated: August 21, 2016 03:02 IST

सर्वोच्च न्यायालयाने थरांसाठी २० फुटांची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय, १८ वर्षांखील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. २०१४ साली दहीहंडी उत्सवाविषयी

- स्वाती पाटील, याचिकाकर्त्यासर्वोच्च न्यायालयाने थरांसाठी २० फुटांची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय, १८ वर्षांखील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. २०१४ साली दहीहंडी उत्सवाविषयी जनहित याचिका दाखल केली. या संघर्षाला दोन वर्षांनंतर काहीसे यश आले आहे. गोविंदांची काळजी वाटण्यामागे कारण आहे. देशाची लोकसंख्या जरी १२३ कोटी असली, तरी या देशाच्या तरुणाचा एक जीवदेखील अनमोल आहे. तो मला जेवढा अनमोल वाटतो, त्याच्या कित्येक पटीने तुमच्या आई-वडिलांना तो अनमोल आहे. तुमच्या जिवापेक्षा त्यांना अधिक काही नाही. ज्यांच्या सगळ््या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत, ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावले टाकायची आहेत, ते लहानगे यांना तुमची नितांत गरज आहे, हे लक्षात असू द्या.दहीहंडी उत्सवाच्या दिवशी आपण ७-८ थर ही लावता, परंतु त्या दिवशी आपल्या सुरक्षिततेसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते. आपणच आपली स्वत:ची काळजी घेतो. थरांवर थर रचतो, पण थरातील दुसऱ्याच्या चुकीमुळे तिसऱ्यालाच जीव गमवावा लागतो किंवा गंभीर दुखापत होते. या उत्सवाचे बाजारीकरण करण्यामागे स्पर्धा आणि उत्सव स्पर्धा वाढविण्यास आयोजक कारणीभूत आहेत. ते आयोजक आपल्या सुरक्षेबाबत आजदेखील काही बोलत नाहीत किंवा पूर्ण जबाबदारी घेत नाहीत.वीस फुटांवर दहीहंडी बांधायची आहे, त्याने उत्सव समाप्त होत नाही. उत्सवावर बंदी येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. मग आयोजक आपल्या चार ते पाच थरांच्या सलामीला का तयार होत नाहीत? त्यांना दहीहंडी रद्द करण्याचे कारणच काय? वीस फुटांवरील दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांचे तेवढ्याच भव्य-दिव्यपणे स्वागत केले जाईल. त्यांना योग्य मानधन दिले जाईल, अशी घोषणा एकही आयोजक का करीत नाही? अनेक लोकप्रतिनिधीच उत्सवाच्या व्यापारीकरणासाठी, स्वत:ला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आपली व्होटबँक भरण्यासाठी गोविंदांचा सर्रास वापर करतात. गोविंदांना एकच आवाहन आहे, कशाला न्यायालयाने सांगितले पाहिजे? आपण स्वत: विचार करा. आपला स्वत:चा, आपल्या मित्रांच्या कुटुंबांचा आणि आपल्या गोविंदा पथकांचा. कारण आपल्यातीलच एखादा गोविंदा अपंग झाला किंवा मृत्यू झाला, तर आपणही ते दु:ख अखेरपर्यंत विसरू शकत नाही, परंतु या निष्ठुर आयोजकांना या नेत्यांच्या हृदयाला मात्र पाझर फुटत नाही.