शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा

By admin | Updated: August 30, 2014 01:57 IST

आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे.

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. एक महिना होऊनही माळीण गावातील सुदैवाने बचावलेले लोक व त्यांचे नातेवाईक दु:खातून सावरलेले नाहीत. तात्पुरती घरे बांधण्याचे काम सुरू असून, सध्या हे लोक आसाणे आश्रमशाळेत आश्रयाला आहेत. माळीण ग्रामस्थांचे अडिवरे गावाजवळ कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत झाला आहे. मात्र, पुनर्वसनाबाबत त्यांच्यात एकमत नाही. बाहेरगावी राहणारे माळीणचे लोक डिंभे, घोडेगाव अशा सधन भागात पुनर्वसन करून मागत आहेत; तर माळीणमध्ये राहणारे लोक येथेच जवळपास पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करत आहेत. शासनाने अडिवरे गावाजवळ जागा निश्चित केली असली, तरी या जागेलाही सगळ्यांची पसंती नाही. तसेच, १५ तरुणांना नोकरीची गरज आहे. त्यांना शासनाने नोकरीत घ्यावे, अशी मागणीदेखील माळीण ग्रामस्थ करत आहेत. माळीण फाट्यावर असलेल्या शाळेच्या पटांगणात तात्पुरती पत्र्यांची ३० घरे बांधण्याचे काम सुरू असून, दि. १० सप्टेंबरपर्यंत ही घरे ताब्यात दिली जाणार आहेत. अडिवरे गावाजवळ भैरवनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत घोडेगाव येथील बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाला बैठकीत सर्वांनी मान्यता दिली. मात्र, सध्या या जागेला देखील विरोध होऊ लागला आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दहा ते अकरा लाख रुपये मिळणार आहेत. आर्थिक मदतीबरोबरच सर्व योजनांचा फायदाही माळीण ग्रामस्थांना देण्यात आला आहे. मृतांच्या वारसांची नोंद झाली असून, या मदतकार्यास सुरुवात झाली आहे. घटनास्थळी माळीणमध्ये कोणीही राहत नाही; मात्र माळीण पाहायला येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. (वार्ताहर)