शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

रस्ता ओलांडताना करावी लागतेय कसरत

By admin | Updated: August 27, 2016 01:34 IST

येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे.

पिंपरी : येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे. यामुळे पादचाऱ्यांनादेखील रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चौक परिसरात विविध शासकीय कार्यालये आहेत. दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरू असते. चौकामधील कोंडीची समस्या कमी करण्यासाठी चारही दिशांचे रस्ते प्रशस्त आहेत. तसेच दिवसभर या चौकात वाहतूक पोलीस असतात. मात्र, रिक्षाचालक बेशिस्तपणे रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. बँक आॅफ इंडियासमोर तर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पाच ते सात रिक्षावाले रस्त्यावर बेशिस्तरीत्या वाहने उभी करतात. जादा प्रवासी मिळण्यासाठी त्यांच्यात स्पर्धांच सुरू असते. यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बँकेत जाण्यासाठीदेखील रस्ता राहत नाही. दरम्यान, बँकेत येणाऱ्या ग्राहकांनादेखील पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्यामुळे कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच सिग्नल सुटल्यावर पाठीमागून वाहन धडकून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या चौकात विविध राजकीय पक्षांचेदेखील आंदोलन-उपोषण होत असतात. त्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागतात. महापालिकेत येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्याने या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. चौकातील पोलीस मात्र या वाहनांवर कारवाई न करता दुचाकीधारकांना अडवून दंड वसुलीत व्यस्त असल्याचे पादचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)>निगडी प्राधिकरण : मृत्यूचा सापळानिगडी : चौकातील कोंडी कमी करण्यासाठी प्रशस्त रस्ते करूनदेखील चौकातच बेशिस्तरीत्या वाहने उभे राहत असल्यामुळे टिळक चौकात अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे, असे असतानादेखील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील टिळक चौकात दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. या चौकातील कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलदेखील उभारण्यात आला असून, चौकातील चारही दिशांचे रस्तेदेखील प्रशस्त केले आहेत. मात्र, असे असतानादेखील या प्रशस्त रस्त्यांवर मोटारचालकांसह प्रवासी रिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहत असल्यामुळे दररोज कोंडीची समस्या उद्भवत आहे.