शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रस्ता ओलांडताना करावी लागतेय कसरत

By admin | Updated: August 27, 2016 01:34 IST

येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे.

पिंपरी : येथील चौकात रिक्षाचालक रस्त्यातच रिक्षा उभ्या करतात. चौकामध्ये कोंडीची समस्या उद्भवत आहे. यामुळे पादचाऱ्यांनादेखील रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चौक परिसरात विविध शासकीय कार्यालये आहेत. दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरू असते. चौकामधील कोंडीची समस्या कमी करण्यासाठी चारही दिशांचे रस्ते प्रशस्त आहेत. तसेच दिवसभर या चौकात वाहतूक पोलीस असतात. मात्र, रिक्षाचालक बेशिस्तपणे रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. बँक आॅफ इंडियासमोर तर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पाच ते सात रिक्षावाले रस्त्यावर बेशिस्तरीत्या वाहने उभी करतात. जादा प्रवासी मिळण्यासाठी त्यांच्यात स्पर्धांच सुरू असते. यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बँकेत जाण्यासाठीदेखील रस्ता राहत नाही. दरम्यान, बँकेत येणाऱ्या ग्राहकांनादेखील पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्यामुळे कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच सिग्नल सुटल्यावर पाठीमागून वाहन धडकून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या चौकात विविध राजकीय पक्षांचेदेखील आंदोलन-उपोषण होत असतात. त्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागतात. महापालिकेत येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्याने या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. चौकातील पोलीस मात्र या वाहनांवर कारवाई न करता दुचाकीधारकांना अडवून दंड वसुलीत व्यस्त असल्याचे पादचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)>निगडी प्राधिकरण : मृत्यूचा सापळानिगडी : चौकातील कोंडी कमी करण्यासाठी प्रशस्त रस्ते करूनदेखील चौकातच बेशिस्तरीत्या वाहने उभे राहत असल्यामुळे टिळक चौकात अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे, असे असतानादेखील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील टिळक चौकात दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. या चौकातील कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलदेखील उभारण्यात आला असून, चौकातील चारही दिशांचे रस्तेदेखील प्रशस्त केले आहेत. मात्र, असे असतानादेखील या प्रशस्त रस्त्यांवर मोटारचालकांसह प्रवासी रिक्षा बेशिस्तपणे उभ्या राहत असल्यामुळे दररोज कोंडीची समस्या उद्भवत आहे.