शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

सभागृहांचे कामकाजाचे दिवस कमी होऊ लागलेत - शिवराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 20:21 IST

अगोदरच्या वेळी पहाटे पाचपर्यंत कामकाज चालत असे, पण आता सभागृहांचे कामकाजाचे दिवस आणि वेळ कमी कमी होऊ लागले आहेत अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - अगोदरच्या वेळी  पहाटे पाचपर्यंत कामकाज चालत असे, पण आता सभागृहांचे कामकाजाचे दिवस आणि वेळ कमी कमी होऊ लागले आहेत अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी व्यक्त केली आहे. लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने शिवराज पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. लोकमतचे पॉलिटिकल एडिटर सुरेश भटेवरा यांनी शिवराज पाटील यांची मुलाखत घेतली. 
 
आम्ही जेव्हा विधान परिषद, विधानसभा सुरु झाली तेव्हा 90- 100 दिवस काम करायचो. पंडितजींच्या काळात कमीत कमी 150 दिवस काम चालायचे. सध्या 70 दिवस , महाराष्ट्रात 45 ते 50 दिवस , आणि काही राज्यात 9 दिवस काम सुरु असते. लोकसभेचं कामकाज जेव्हा टीव्हीवर दाखवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना गोंधळ जास्त दाखवला,  लोकसभा सभापतीच्या परवानगीने कोणी बोलत नसेल, तेव्हा कॅमेरा फिरवून इतर दाखवा तर गोंधळ कमी होईल असं मत शिवराज पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
 
पुरस्कार सोहळा आयोजन करण्यामागचं प्रयोजन
 
संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.