शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिसऱ्या दिवशी कामकाज ठप्प

By admin | Updated: August 3, 2016 03:33 IST

सलग तिस-या दिवशी विधान परिषदेत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले.

मुंबई : अखंड महाराष्ट्राच्या मुद्यावरून मंगळवारी सलग तिस-या दिवशी विधान परिषदेत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वेळा तेच निवेदन केले. या निवेदनाने आमचे समाधान झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच अखंड महाराष्ट्राचा ठराव दोन्ही सभागृहात मांडावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. सकाळी कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी बोलायला सुरुवात केली. विरोधी बाकांवरून अखंड महाराष्ट्राच्या घोषणा सुुरुच राहिल्यामुळे सभापती रामराजे नाईक झ्रनिंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरु होताच तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. राज्याच्या स्थापनेपासून विविध शक्तींनी महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न केले. आता भाजपा सत्तेत आल्यापासून वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरु आहे. शुक्रवारी भाजपा खासदाराने लोकसभेत अशासकीय ठरावाद्वारे वेगळ्या विदर्भाचा ठराव मांडला. हा अशासकीय ठराव मांडला तरी तो सत्ताधारी सदस्यांनी मंजूर केला तर तसा ठराव राज्याकडे येऊ शकतो, असे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे अखंड महाराष्ट्राबाबत चर्चेला परवानगी देण्याची मागणी तटकरे यांनी केली. शेकापचे जयंत पाटील यांनी देखील अखंड महाराष्ट्रावरील चर्चेची मागणी केली. मात्र सभापतींनी ही सूचना फेटाळल्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. चर्चेच्या मागणीसाठी हा गोंधळ सुरूच राहिल्यामुळे चार वेळा सभागृह तहकूब करावे लागले. ठराव दोन्ही सभागृहात आणा अखंड महाराष्ट्राचा विषय मांडत असताना चार-चार मंत्री उभे राहून विरोध करत आहेत. ही बाब लाजिरवाणी आहे. जोपर्यंत दोन्ही सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव मुख्यमंत्री मांडत नाहीत तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. (प्रतिनिधी)>आता काय छाती फाडून सांगायचे का?एरव्ही शांत आणि संयमी असणारे सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज विरोधकांच्या अडवणुकीमुळे संतप्त झाले. वेगळ्या विदर्भाचा कोणताच प्रस्ताव नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्टपणे खुलासा केला आहे. तरीही वारंवार हा विषय सभागृहात मांडून कामकाज रोखले जात आहे. त्यामुळे आता हनुमानासारखे छाती फाडून सांगायचे का, असा सवाल पाटील यांनी विरोधकांना उद्देशून केला. >मराठी जनतेचा हा चौथा लढा स्वातंत्र्यानंतर मराठी जनतेला तीन महत्वाचे लढे लढावे लागले. एक निजामाविरुद्ध, दुसरं पोतुर्गीजांविरुद्ध , तर तिसरा स्वतंत्र महाराष्ट्रासाठी लढावा लागला. आता सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेमुळं अखंड महाराष्ट्रासाठी चौथा लढा लढावा लागण्याची वेळ आली आहे, असे कॉंग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले.