शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प

By admin | Updated: July 16, 2015 02:15 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या विरोधकांमुळे विधान परिषदेचे कामकाज आज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले.

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या विरोधकांमुळे विधान परिषदेचे कामकाज आज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले. बुधवारी दुपारी नियमित कामकाजाला सुरुवात होताच विरोधी बाकावरील सदस्यांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटला. सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी यासाठी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. या वेळी बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार अजिबात गंभीर नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील एका गावात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्या गावातील आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता पणाला लागल्याचे तटकरे म्हणाले.काँग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले की, सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न असो अथवा गिरणी कामगारांच्या घरांचा, सरकार मोघम उत्तरे देत आहे. जोपर्यंत कर्जमाफी असो अथवा गिरणी कामगारांची घरे; स्पष्ट आणि ठोस निर्णयाशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचे रणपिसे म्हणाले. यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, विरोधकांना चर्चा करायची नाही. गोंधळ घालायचे ठरवूनच ते सभागृहात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभागृहातील गोंधळ पाहून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. (प्रतिनिधी)