शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प

By admin | Updated: July 16, 2015 02:15 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या विरोधकांमुळे विधान परिषदेचे कामकाज आज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले.

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या विरोधकांमुळे विधान परिषदेचे कामकाज आज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले. बुधवारी दुपारी नियमित कामकाजाला सुरुवात होताच विरोधी बाकावरील सदस्यांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटला. सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी यासाठी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. या वेळी बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार अजिबात गंभीर नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील एका गावात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्या गावातील आत्महत्या थांबल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता पणाला लागल्याचे तटकरे म्हणाले.काँग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले की, सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न असो अथवा गिरणी कामगारांच्या घरांचा, सरकार मोघम उत्तरे देत आहे. जोपर्यंत कर्जमाफी असो अथवा गिरणी कामगारांची घरे; स्पष्ट आणि ठोस निर्णयाशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचे रणपिसे म्हणाले. यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, विरोधकांना चर्चा करायची नाही. गोंधळ घालायचे ठरवूनच ते सभागृहात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभागृहातील गोंधळ पाहून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. (प्रतिनिधी)