शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

गिरणी कामगारांचा मोर्चा रोखला

By admin | Updated: July 27, 2016 02:38 IST

भायखळ्यातील राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारा गिरणी कामगारांचा मोर्चा, मंगळवारी भायखळा पोलिसांनी राणीबाग येथेच रोखला. उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने

मुंबई : भायखळ्यातील राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारा गिरणी कामगारांचा मोर्चा, मंगळवारी भायखळा पोलिसांनी राणीबाग येथेच रोखला. उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने मोर्चा काढता येणार नाही, असे खोटे कारण पोलिसांनी दिल्याचा आरोप संतप्त झालेले शिवसंग्रामचे नेते उदय आंबोणकर यांनी केला आहे.आंबोणकर म्हणाले की,‘लवकरात लवकर घरे मिळावी, म्हणून कामगार आणि वारसांनी राणीबाग येथून धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी आवश्यक परवानगीही घेतली होती. मात्र, मोर्चा काढण्यासाठी राणीबाग येथे जमलेल्या कामगार आणि वारसांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोर्चा काढता येणार नाही, असे कारण सांगत वृद्ध कामगारांना पोलिसांनी गाडीत बसवले. शेकडो वारस आणि कामगारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी थेट आझाद मैदानात सोडले. (प्रतिनिधी)गिरणी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात संघटनेने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून, विधानसभा सत्र संपल्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री, महसूलमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे उदय आंबोणकर यांनी सांगतिले. ते म्हणाले की, ‘या बैठकीनंतरच्या आठ दिवसांत संघटनेच्या शिष्टमंडळालाही चर्चेसाठी बोलावू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले; शिवाय सर्व गिरणी कामगारांना घरे देण्याची सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.’मुंबईबाहेर घरे न देता, सरकारने सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची मागणी संघटनेने केली आहे. घरे उभारण्यासाठी आवश्यक जागांचा तपशील सरकारला निवेदनाद्वारे पाठवल्याचे संघटनेने स्पष्ट केले. तरी गिरणी कामगारांसोबत त्यांच्या वारसांचा अंत न पाहता, तत्काळ घरे देण्यासाठी नव्याने धोरण आखण्याची मागणी संघटनेने केली.