शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कामगार कल्याण मंडळ होणार डिजिटल!

By admin | Updated: June 19, 2017 02:49 IST

राज्यातील कामगारांसाठी विविध योजना राबविणारे कामगार कल्याण मंडळ आता डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. तसा प्रस्ताव मंडळाने शासनाकडे पाठवला आहे.

चेतन ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कामगारांसाठी विविध योजना राबविणारे कामगार कल्याण मंडळ आता डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. तसा प्रस्ताव मंडळाने शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावात कामगारांसाठी टोल फ्री क्रमांक, कामगार कल्याण केंद्रांचे संगणकीकरण, व्हिडीओ कॉन्फरन्स अशा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मागण्यांचा समावेश आहे.मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावात राज्यातील ७ विभागीय कार्यालये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडली जाणार आहेत. यामुळे मंडळाला राज्यभरातील कारभारावर मुंबईतून नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे. शिवाय प्रत्येक विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी वारंवार मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. याशिवाय मंडळाचे संकेतस्थळ (वेबसाइट) लवकरच सुरू होणार आहे. ‘डोमेननेम’च्या प्रतीक्षेत असलेले हे संकेतस्थळ प्राथमिक स्तरावर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे मंडळाच्या उपक्रमांसह, योजना आणि कार्यक्रमांची माहिती कामगारांना एका क्लिकवर मिळणार आहे.सध्या विविध क्षेत्रांतील ४१ लाख कामगार हे कामगार कल्याण निधीच्या माध्यमातून मंडळाशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासह राज्यातील इतर कामगार आणि कामगार कुटुंबीयांसाठी विविध योजना, कार्यक्रम आणि उपक्रम मंडळामार्फत राबविले जातात. मात्र बहुतेक उपक्रमांची माहिती कामगार किंवा त्यांच्या कुटुंबीयांपर्यत पोहोचत नाही. त्यामुळे कामगारांना सर्व माहिती मिळण्यासाठी मंडळाकडून एक टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.टोल फ्री क्रमांकाचा फायदा काय?टोल फ्री क्रमांकावर कामगार कल्याण निधी कशाप्रकारे आणि कुठे भरता येईल, याची माहिती कामगारांना मिळणार आहे. निधीअभावी लाखो कामगार मंडळाच्या योजनांपासून वंचित राहतात. परिणामी, मंडळाबाबतची खडान्खडा माहिती कामगारांना एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.कागदपत्रांचे होणार डिजिटायझेशन!मंडळाच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या विविध योजना आणि कार्यक्रमांची माहिती संकलित करण्यासाठी सर्व दस्तांऐवजांचे डिजिटायझेशन केले जाईल. यामध्ये मंडळाची जुनी कागदपत्रे, फोटो आणि व्हिडीओ स्कॅन करून त्यांचे जतन केले जाईल. त्यामुळे महत्त्वाचा ठेवा भविष्यातही उपलब्ध होऊ शकेल.इतिहासाचे जतन होणार!मंडळाच्या उपक्रमांचा फायदा घेऊन अनेक नामांकित व्यक्ती नावारूपाला आल्या असल्या, तरी सर्वांचीच माहिती मंडळाकडे उपलब्ध नाही. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. मंडळाच्या केंद्रामधील शिशु मंदिर वर्गाचे ते माजी विद्यार्थी आहेत. अशी अनेक उच्च पदस्थ मंडळी कामगार कल्याण मंडळांच्या उपक्रमांमधून नावारूपाला आलेली आहेत. मंडळाचे डिजिटायझेशन झाल्यावर हा सर्व इतिहास जतन केला जाईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.केंद्रांचे संगणकीकरण करणार!मंडळाची सर्व केंद्रे संगणकीकृत करण्याचा प्रस्तावही मंडळाने शासनाकडे दिला आहे. परिणामी, कोणत्या केंद्रांवर किती उपक्रम सुरू आहेत? व उपक्रमांचा फायदा किती कामगार व कुटुंबीय घेत आहेत, याची निश्चित आकडेवारी मंडळाकडे उपलब्ध राहणार आहे.