शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

नव्या पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: March 3, 2017 06:07 IST

सरकारच्या नव्या पेन्शन योजनेविरोधात सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला

मुंबई : सरकारच्या नव्या पेन्शन योजनेविरोधात सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत प्रवेश केलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना या नव्या योजनेमुळे पेन्शन गमवावी लागेल, असा आरोप करत बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने या वेळी सरकारविरोधात निदर्शने केली.संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख म्हणाले की, सरकारने १९८२ सालची पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. त्याचा विपरीत परिणाम गेल्या १२ वर्षांत नियुक्त झालेल्या कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षकांच्या पेन्शनवर होणार आहे. नवीन पेन्शन योजनेतून प्राप्त होणारा हजारो कोटी रुपयांचा निधी खासगी क्षेत्रात गुंतविण्याचा शासनाचा डाव आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या योजनेत सुरुवातीची ५ वर्षे सरकारने निधी व्यवस्थापकांची नेमणूकच केली नव्हती. आता ८ निधी व्यवस्थापकीय कंपन्यांमार्फत देशातील ५३ लाख कर्मचाऱ्यांचा ३४ हजार ९३५ कोटी रुपयांचा निधी गुंतविण्यात आला आहे. या गुंतवणुकीपैकी २६ टक्के निधी थेट विदेशी गुंतवणूक होणार आहे, तर उरलेला निधी शेअर बाजार, सरकारी कर्जरोखे, शासन विकास योजना आणि कॉर्पोरेट बाँड यात गुंतविला जाणार आहे. ही गंभीर बाब असून त्याला संघटनेचा तीव्र विरोध आहे. अंशदायी पेन्शन योजनेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला जमा रकमेपैकी ६० टक्के रक्कम निवृत्तीच्या वेळी, तर ४० टक्के रक्कम गुंतवणुकीच्या स्वरूपात शासनाच्या प्राधिकरणाकडे ठेवणे सक्तीचे आहे. हा योजनेतील सर्वात मोठा तोटा असल्याचे संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले. ते म्हणाले की, नियत वयोमानापूर्वी सदर योजना सोडून दिल्यास जमा रकमेपैकी केवळ २० टक्केच रक्कम कर्मचाऱ्याला मिळणार असून उरलेली ८० टक्के रक्कम प्राधिकरणाकडेच ठेवावी लागणार आहे. या योजनेत धारकांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू नाही. (प्रतिनिधी)>गैरसोयीची योजनानव्या योजनेत रुग्णता, भरपाई, जखम किंवा इजा, अनुकंपा निवृत्तिवेतन मिळण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा एक ना अनेक त्रुटींमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा या योजनेला तीव्र विरोध राहील, असे अविनाश दौंड यांनी स्पष्ट केले.