शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कामगारांनो, हक्कांसाठी एकजूट ठेवा!

By admin | Updated: May 2, 2017 05:01 IST

विविध कामगार संघटनांनी संघर्ष करून तयार केलेल्या कामगारहिताय कायद्यात केंद्र व राज्य सरकार कामगारविरोधी बदल

मुंबई : विविध कामगार संघटनांनी संघर्ष करून तयार केलेल्या कामगारहिताय कायद्यात केंद्र व राज्य सरकार कामगारविरोधी बदल करत आहेत. परिणामी, कामगारांनी स्वत:च्या हक्कांसाठी एकजूटीने संघर्षष करण्याचे आवाहन कामगार संघटना कृती समितीने सोमवारी केले. कामगार दिनाच्या निमित्ताने कृती समितीने दादर पूर्वेकडून लोकमान्य टिळक उड्डाणपुलावरून काढलेल्या पदयात्रेचे रुपांतर वनमाळी सभागृहात आल्यावर जाहीर सभेत झाले. यावेळी कृती समितीच्या नेत्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.या निर्धार सभेमध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी, आयटकचे सुकुमार दामले, सिटुचे डॉ. विवेक मॉंन्टेरो, हिंद मजदूर सभेचे शंकर साळवी, गोदी कामगारांचे नेते मारुती विश्वासराव आणि अन्य कामगार नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या तळागाळातील कामगारांपर्यंत पोहचून एकजूट साधण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच एसटी व बीएसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, रेल्वेच्या विविध कामांचे होत असलेले खासगीकरण अशा विविध मुद्द्यांवर लढा देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.उटगी म्हणाले की, बहुमताच्या आधारावर कामगार विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारविरोधात सर्व कामगार संघटनांनी कृती समितीसोबत लढा द्यावा. त्यासाठी प्रथम कामगार नेत्यांनी आपापसातले मतभेद दूर ठेवावेत. केवळ कामगारहित डोळ््यासमोर ठेवल्यास एकजूट सहज शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. विश्वासराव यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १ हजार ८०० एकर जागेचा विकास करण्याचा प्रश्न यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)परिषदेचेही आयोजनकामगारविरोधी धोरण हाणून पाडताना सरकारविरोधात लढा उभारण्यासाठी कृती समितीची बैठक लवकरच पार पडेल. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. त्यानंतर महिन्याभरात प्रमुख कार्यकर्त्यांची परिषदही पार पडेल.